शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

एरंडीच्या बिया खाल्याने १४ विद्यार्थ्यांना विषबाधा; बठाण येथील जिप शाळेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 18:21 IST

तालुक्यातील बठाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बुधवारी दुपारी १४ विद्यार्थ्यांनी एरंडीच्या बिया खाल्ल्याने त्यांना वांत्या व जुलाबाचा त्रास सुरु झाला.प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जालना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देजालना तालुक्यातील बठाण बुद्रुक येथे जिल्हा परिषद शिक्षण घेणा-या या विद्यार्थ्यांनी दुपारी परिसरात असलेल्या एरंडीच्या झाडावरील बिया खाल्या.शाळेतील शिक्षक आणि परिसरातील ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर लगेचच त्यांना जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जालना : तालुक्यातील बठाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बुधवारी दुपारी १४ विद्यार्थ्यांनी एरंडीच्या बिया खाल्ल्याने त्यांना वांत्या व जुलाबाचा त्रास सुरु झाला.प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जालना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात १२ मुले आणि २ मुलींचा समावेश आहे. उपचारानंतर या मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक मधुकर राठोड यांनी सांगितले. 

जालना तालुक्यातील बठाण बुद्रुक येथे जिल्हा परिषद शिक्षण घेणा-या या विद्यार्थ्यांनी दुपारी परिसरात असलेल्या एरंडीच्या झाडावरील बिया खाल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना वांत्या आणि जुलाब होऊ लागले. शाळेतील शिक्षक आणि परिसरातील ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर लगेचच त्यांना जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा शल्यचिकीत्सक मधुकर राठोड यांनी तात्त्काळ उपचार सुरु केले. काही वेळानंतर या विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारली. दरम्यान, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी रुग्णालयास भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिका-यांना मुलांवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

चैतन्य गणेश देवडे (८), पृथ्वीराज वसंत बांदल (८), भक्ती सोपान देवडे (९), गोपाल परमेश्वर देवडे (८), ओंकार प्रधान देवडे (८), प्रतिक रामनाथ देवडे (८), कृष्णा विष्णू बागल (९), दीपक भरत बागल (९), अनिकेत अर्जुन बागल (९), भारती राजेंद्र सिरसाठ (९), प्रशांत राजेंद्र शिरसाठ (६), ओमप्रकाश ऋषिधर पाटेकर (८), ओंकार दत्तात्रय वीर (८), जीवन जनार्दन उजाड (९)अशी विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.