शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

प्लास्टिकमुक्तीचे स्वप्न धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:02 IST

शासनाने प्लास्टिक बंदी लागू करुन २२ दिवस झाले. मात्र अद्यापही शहरात याची प्रभावीपणे अंमलबजावणी होतांना दिसून येत नसल्याने प्लास्टिक मुक्तीचे स्वप्न धुसर दिसू लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाने प्लास्टिक बंदी लागू करुन २२ दिवस झाले. मात्र अद्यापही शहरात याची प्रभावीपणे अंमलबजावणी होतांना दिसून येत नसल्याने प्लास्टिक मुक्तीचे स्वप्न धुसर दिसू लागले आहे.प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असल्याने शासनाने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली. यामुळे शहरात सुध्दा याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र आधीच सुस्त असलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व्यावसायिकांवर वचक बसावा ऐवढीही कारवाई नाही. कडक अंमलबजावणी होऊन प्लास्टिक मुक्त जालना होईल, असे वाटले होते. मात्र २२ दिवस उलटूनही शहरात प्लास्टिकचा वापर कमी होण्यापेंक्षा अधिक वाढत असल्याचे दिसत आहे. शहरातील दुकाने असो वा पानटपरी येथे सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होत आहे. यामुळे शहर प्लास्टिकमुक्त होईल का, असा प्रश्न निर्माण होत आहे.प्लास्टिकचा घातक परिणाम लक्षात घेता प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत. मात्र, ही सूचना जालना नगरपालिकेने म्हणावी, तशी मनावर घेतलेली दिसत नाही. तसेच शहरातील व्यावसायिकांनी सुध्दा ही गांभिर्याने घेतली नाही. त्यांनी प्लास्टिकचा वापर सुरुच ठेवला आहे. अलिकडच्या काळात प्लास्टिकचा वापर दैनदिन व्यवहारातील अविभाज्य घटक बनला आहे. यामुळे प्लास्टिकचा वापर चांगलाच वाढलेला आहे. प्लास्टिक नष्ट होत नसल्याने याचे लोण शहरासह ग्रामीण भागात पसरले आहे. यामुळे प्रदूषणात वाढ होऊन मुक्या जनावरांना सुध्दा धोका निर्माण होत आहे. यामुळे शासनाने प्लास्टिक बंदीची घोषणा केली होती. आणि व्यावसायिक आणि वितरकांना आपल्याकडील साठवलेला प्लास्टिकचा साठा संपवून दुसरा व्यवसाय करण्यासाठी तीन महिन्याची मुदत दिली होती. तरी सुध्दा शहरातील प्लास्टिकचा साठा अद्यापही संपलेला नाही. उलट त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. एकीकडे पालिका प्रशासन २ टन प्लास्टिक पकडल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र शहरात प्लास्टिकचा वापर सर्रासपणे वापर सुरु आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीenvironmentवातावरण