शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

प्लास्टिकमुक्तीचे स्वप्न धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:02 IST

शासनाने प्लास्टिक बंदी लागू करुन २२ दिवस झाले. मात्र अद्यापही शहरात याची प्रभावीपणे अंमलबजावणी होतांना दिसून येत नसल्याने प्लास्टिक मुक्तीचे स्वप्न धुसर दिसू लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाने प्लास्टिक बंदी लागू करुन २२ दिवस झाले. मात्र अद्यापही शहरात याची प्रभावीपणे अंमलबजावणी होतांना दिसून येत नसल्याने प्लास्टिक मुक्तीचे स्वप्न धुसर दिसू लागले आहे.प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असल्याने शासनाने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली. यामुळे शहरात सुध्दा याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र आधीच सुस्त असलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व्यावसायिकांवर वचक बसावा ऐवढीही कारवाई नाही. कडक अंमलबजावणी होऊन प्लास्टिक मुक्त जालना होईल, असे वाटले होते. मात्र २२ दिवस उलटूनही शहरात प्लास्टिकचा वापर कमी होण्यापेंक्षा अधिक वाढत असल्याचे दिसत आहे. शहरातील दुकाने असो वा पानटपरी येथे सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होत आहे. यामुळे शहर प्लास्टिकमुक्त होईल का, असा प्रश्न निर्माण होत आहे.प्लास्टिकचा घातक परिणाम लक्षात घेता प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत. मात्र, ही सूचना जालना नगरपालिकेने म्हणावी, तशी मनावर घेतलेली दिसत नाही. तसेच शहरातील व्यावसायिकांनी सुध्दा ही गांभिर्याने घेतली नाही. त्यांनी प्लास्टिकचा वापर सुरुच ठेवला आहे. अलिकडच्या काळात प्लास्टिकचा वापर दैनदिन व्यवहारातील अविभाज्य घटक बनला आहे. यामुळे प्लास्टिकचा वापर चांगलाच वाढलेला आहे. प्लास्टिक नष्ट होत नसल्याने याचे लोण शहरासह ग्रामीण भागात पसरले आहे. यामुळे प्रदूषणात वाढ होऊन मुक्या जनावरांना सुध्दा धोका निर्माण होत आहे. यामुळे शासनाने प्लास्टिक बंदीची घोषणा केली होती. आणि व्यावसायिक आणि वितरकांना आपल्याकडील साठवलेला प्लास्टिकचा साठा संपवून दुसरा व्यवसाय करण्यासाठी तीन महिन्याची मुदत दिली होती. तरी सुध्दा शहरातील प्लास्टिकचा साठा अद्यापही संपलेला नाही. उलट त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. एकीकडे पालिका प्रशासन २ टन प्लास्टिक पकडल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र शहरात प्लास्टिकचा वापर सर्रासपणे वापर सुरु आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीenvironmentवातावरण