शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

रस्ता चौपदरीकरणासाठी जनहित याचिका; मुख्य सचिवांना हजर राहण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 13:36 IST

जालना-अंबड-वडीगोद्री रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या मागणीसाठी अ‍ॅड. किशोर राऊत यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेप्रकरणी न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह मुख्य अभियंत्यांना ६ फेब्रुवारीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्दे मराठवाडा- विदर्भ यांना जोडणारा  मार्ग असणार्‍या जालना-अंबड-वडीगोद्री रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी कृती समितीने जनआंदोलन उभारले. याच आंदोलनाचा भाग म्हणून खंडपीठात जनहित याचिका

अंबड ( जालना ): जालना-अंबड-वडीगोद्री रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या मागणीसाठी अ‍ॅड. किशोर राऊत यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेप्रकरणी न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह मुख्य अभियंत्यांना ६ फेब्रुवारीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. अ‍ॅड. राऊत यांनी अंबडमध्ये रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. 

अ‍ॅड. राऊत म्हणाले की, मराठवाडा- विदर्भ यांना जोडणारा  मार्ग असणार्‍या जालना-अंबड-वडीगोद्री रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी कृती समितीने जनआंदोलन उभारले. याच आंदोलनाचा भाग म्हणून खंडपीठात जनहित याचिका अ‍ॅड. प्रशांत कातनेश्वरकर यांच्यामार्फत दाखल करण्यात आली होती. सदरील याचिका न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांच्यासमोर सुनावणीस आली असता, जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष का, असा थेट प्रश्न करून राज्याच्या मुख्य सचिवांसह, सा. बां. विभागाचे प्रधान सचिव, औरंगाबाद सा. बां. विभागाचे मुख्य अभियंता यांना हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या. यावेळी भाऊसाहेब पाऊलबुद्धे, व्यापारी महासंघाचे चंद्रप्रकाश सोडाणी, शिवप्रसाद चांगले, ओमप्रकाश उबाळे, विठ्ठलसिंग राजपूत, प्रकाश नारायणकर, कुमार रुपवते, सतीश सोडाणी यांची उपस्थिती होती.

म्हणून जनहित याचिकाजालना-अंबड-वडीगोद्री रस्ता हा मंजूर झाला असल्याचे विचारले असता, अ‍ॅड. राऊत म्हणाले की, या रस्त्यावरील वाहतूक पाहता हा रस्ता चौपदरी होणे आवश्यक असताना हा रस्ता १० मीटरचा मंजूर झाल्याची माहिती आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण होण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :JalanaजालनाAurangabadऔरंगाबाद