शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

५० ग्रामपंचायतींच्या मतदानाची शांततेत मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST

मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रियेची सोमवारी मंठा तहसील कार्यालयात मतमोजणी शांततेत पार पडली. मात्र, यानंतर काही गावांमध्ये ...

मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रियेची सोमवारी मंठा तहसील कार्यालयात मतमोजणी शांततेत पार पडली. मात्र, यानंतर काही गावांमध्ये किरकोळ वादावादी, मारामाऱ्या झाल्याच्या घटना घडल्या; पण तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे आले नसल्याची माहिती देण्यात आली.

खोराड सावंगी, सोनुनकरवाडी आणि दुधा- सासखेडा येथील प्रत्येकी एका जागेसाठी सारखेच मतदान झाले. त्यामुळे चिठ्ठ्या टाकून निर्णय देण्यात आला. अंभोरा जहागीर येथील वॉर्ड नंबर एकच्या बूथवरील ईव्हीएम मशीनमध्ये मतदानाच्या दिवशी झालेले ३६३ मतदान आज मतमोजणीच्या वेळी ३५७ भरत असल्यामुळे अंभोरा जहागीर येथील उमेदवार आणि एजंटनी आक्षेप घेतला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी मध्यस्थी केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तेथील ग्रामस्थांना मशीनमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे लेखी दिले. निकाल लागलेल्या ग्रामपंचायतींवर विविध पक्षांचे नेते आपापला दावा करीत आहेत. यात भाजपच्या ताब्यात २८ ग्रामपंचायती आल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले, तर काँग्रेसचा १७ ठिकाणी विजय झाल्याचे आमदार राजेश राठोड यांनी सांगितले. शिवसेनेच्या १३ ग्रामपंचायती असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले.

कोट

अंभोरा जहागीर येथील वॉर्ड नंबर १ मधील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचण असल्यामुळे मतदानाच्या दिवशी ३६३ मतदान झाले होते; परंतु मत मोजणीच्या दिवशी ३५७ मतदान निघाल्याने ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. त्यांना मशीनमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे लेखी दिले आहे.

चंद्रकांत सेवक, निवडणूक निर्णय अधिकारी, अंभोरा जहागीर.