शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

५० ग्रामपंचायतींच्या मतदानाची शांततेत मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST

मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रियेची सोमवारी मंठा तहसील कार्यालयात मतमोजणी शांततेत पार पडली. मात्र, यानंतर काही गावांमध्ये ...

मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रियेची सोमवारी मंठा तहसील कार्यालयात मतमोजणी शांततेत पार पडली. मात्र, यानंतर काही गावांमध्ये किरकोळ वादावादी, मारामाऱ्या झाल्याच्या घटना घडल्या; पण तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे आले नसल्याची माहिती देण्यात आली.

खोराड सावंगी, सोनुनकरवाडी आणि दुधा- सासखेडा येथील प्रत्येकी एका जागेसाठी सारखेच मतदान झाले. त्यामुळे चिठ्ठ्या टाकून निर्णय देण्यात आला. अंभोरा जहागीर येथील वॉर्ड नंबर एकच्या बूथवरील ईव्हीएम मशीनमध्ये मतदानाच्या दिवशी झालेले ३६३ मतदान आज मतमोजणीच्या वेळी ३५७ भरत असल्यामुळे अंभोरा जहागीर येथील उमेदवार आणि एजंटनी आक्षेप घेतला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी मध्यस्थी केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तेथील ग्रामस्थांना मशीनमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे लेखी दिले. निकाल लागलेल्या ग्रामपंचायतींवर विविध पक्षांचे नेते आपापला दावा करीत आहेत. यात भाजपच्या ताब्यात २८ ग्रामपंचायती आल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले, तर काँग्रेसचा १७ ठिकाणी विजय झाल्याचे आमदार राजेश राठोड यांनी सांगितले. शिवसेनेच्या १३ ग्रामपंचायती असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले.

कोट

अंभोरा जहागीर येथील वॉर्ड नंबर १ मधील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचण असल्यामुळे मतदानाच्या दिवशी ३६३ मतदान झाले होते; परंतु मत मोजणीच्या दिवशी ३५७ मतदान निघाल्याने ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. त्यांना मशीनमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे लेखी दिले आहे.

चंद्रकांत सेवक, निवडणूक निर्णय अधिकारी, अंभोरा जहागीर.