शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:27 IST

ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधीक्षकाचे पद रिक्त झाले असून, या रूग्णालयात अनेक असुविधा असल्यामुळे रूग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : येथील ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधीक्षकाचे पद रिक्त झाले असून, या रूग्णालयात अनेक असुविधा असल्यामुळे रूग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.शहर व तालुक्यातील सर्वसामान्य व गरीब जनतेला कमी खर्चात रोगनिदान व औषधी उपचार होण्यासाठी शासनाने तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रूग्णालयाची सुरूवात केली. त्यानंतर या रूग्णालयातील विविध विभागांसाठी व डॉक्टर कर्मचा-यांच्या निवासस्थानांसाठी कोटयवधी रूपये खर्च करून स्वतंत्र अशी भव्य इमारत व निवासस्थाने उभारली आहेत. या ग्रामीण रूग्णालयात एक वैद्यकीय अधिक्षक, ३ वैद्यकीय अधिकारी, एक सहायक अधीक्षक, दोन कनिष्ठ लिपिक, ७ अधिपरिचारिका,एक प्रयोग शाळा तंत्रज्ञ व एक सहायक, एक क्षकिरण तंत्रज्ञ, एक औषध निर्माता, एक शिपाई, चार कक्षसेवक, दोन सफाई कामगार अशी एकुण २५ पदे मंजूर असतांना यापैकी एक वैद्यकिय अधिक्षक,एक कक्षसेवक,एक शिपाई,एक सफाई कामगार अशी चार पदे रिक्त असुन २१ पदे भरलेली आहेत, यातील दोन, चार कर्मचारी वगळता सर्व डॉक्टर व कर्मचा-यांना येथील शासकीय निवासस्थानांचीही सुविधा दिलेली आहे.असे असताना येथे येण्यास कोणीच उत्सुक नसल्याने हे रूग्णालय म्हणजे रेफर रूग्णालय म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.ओपीडीची वेळ वाढविण्याची मागणीसध्या ओपीडीची सकाळी ९ ते १२.३० ते सायंकाळी ४ ते ५ अशी वेळ आहे. मात्र कडक उन्हाळा असल्याने दुपारच्या वेळेत रूग्णांना ग्रामीण रुग्णालयात येण्यास अडचण येते. यामुळे ओपीडीच सकाळची वेळ १२.३० ऐवजी २ वाजेपर्यंत करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.अपडाऊन बनले डोकेदुखी४या ग्रामीण रूग्णालयाचे अंतर हे शहरापासून तीन ते चार किलोमीटर दूर आहे. त्यामुळे येथे रूग्णांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. तसेच अनेक डॉक्टर हे बदनापूरमध्ये राहत नसल्याने रूग्णांसाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरत आहे. याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष देण्याची गरज रूग्णांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर