शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

सत्संगातून आत्मकल्याणाचा मार्ग - रमेश महाराज कस्तुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:24 IST

सुख हे केवळ संतवाणीत असून आत्मकल्याणाचा मार्ग देखील सत्संगातच आहे, असा हितोपदेश रमेश महाराज कस्तुरे यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : टीव्ही, मोबाईलचा नाद सोडा, त्यात इतकं गुरफटून जाऊ नका. त्यानं काहीही मिळणार नाही. सुख हे केवळ संतवाणीत असून आत्मकल्याणाचा मार्ग देखील सत्संगातच आहे, असा हितोपदेश रमेश महाराज कस्तुरे यांनी येथे बोलताना दिला.अंबड रोडवरील श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिर परिसरात अखंड शिवनाम सप्ताहातील संगीतमय शिवकथेचे तिसरे पुष्प गुंफताना कस्तुरे महाराज बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, मोबाईल, टीव्हीतून काय मिळतं? काही क्षणाची करमणूक करणारी ही साधनं मनुष्य जीवन कधी नष्ट करुन टाकतात हेही कळत नाही. हा नरदेह क्षणभंगुर असल्याने त्याचा उपयोग असा करुन घ्या की, चार- चौघांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. काही मुलं- मुली आणि माणसं देखील मोबाईलमध्ये इतकी गरफटून जातात की त्यांना शेजारी काय चालू आहे हेही कळत नाही. अनेकदा तर रस्त्याने चालतानाही हातातला मोबाईल सुटत नाही. चालता- चालता देखील मोबाईल हाताळतात. अनेक अपघात मोबाईलमुळं होऊ लागली आहेत. मोबाईल हा मानसिक रोगाचं साधन बनला आहे. हजारोंच्या संख्येने माणसोपचार तज्ज्ञांची रुग्णालये खचाखच भरु लागली आहेत. मोबाईलचा चांगला परिणाम किती हे माहीत नाही. परंतु दुष्परिणामाच्या गोष्टी कानावर आल्या की, वाईट वाटते. गृहिणी देखील मोबाईलबरोबरच टीव्हीच्या कार्यक्रमात व्यस्त झालेल्या दिसतात. परंतु हे बरोबर नाही. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की तेथे वाईट घडण्यास वेळ लागत नाही. म्हणूनच अनेकदा वाटते की, पूर्वीचा काळ खरंच चांगला होता. राहायला चांगली घरं नव्हती, अंगावर चांगली कापडं नव्हती, नाना प्रकारचे पदार्थ नव्हते, मात्र आनंद आणि प्रेम इतकं होतं की, आप- पर भेदाला छेद देण्याची शक्ती प्रेमात होती.माणूस- माणसाला ओळखत होता. आज मोबाईल- टीव्हीने प्रत्येकात आणि घरातल्या कुटुंबात देखील परकेपणा आणला आहे. कुटुंबातील प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुंतलेले असतात हे कुठे तरी थांबविण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक