शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

परतूर-आष्टी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:03 AM

शहरातील परतूर-आष्टी मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्याने या मार्गावर नियमीत अपघात होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. एकूणच हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहरातील परतूर-आष्टी मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्याने या मार्गावर नियमीत अपघात होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. एकूणच हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.दिवसेदिवस या मार्गावर वाहनांची सख्या वाढत आहे. मात्र रस्त्याचे रूंदीकरण अद्यापही करण्यात आले नाही. त्यातच वाहनधारकही आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करत असल्याने वाहनाला जाण्यासाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. परिणामी रात्रीच्या वेळी अनेक वेळा या मार्गावर अपघात होऊन जायबंदी झाले आहेत. वाढती वाहनांची गर्दी बघता या मार्गाचे रूंदीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिक , वाहनधारकांनी केली आहे.मात्र याकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. एकेरी रस्ता त्यातचही मोठी खड्डे यामुळे वाहने चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. या मार्गावर साखर कारखाना असल्याने या मार्गावरून नियमित जड वाहनांची गर्दी असते.खड्डा चुकविण्याच्या नादात अनेकवेळा उसाची ट्रॉली उलटून अपघात होत आहे. तसेच वाळूने भरलेलेल हायवा ट्रक सुध्दा ये जा करीत असल्याने रस्त्याची चाळणी झाली आहे.मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. सध्या परिक्षेचे दिवस असल्याने या मार्गावरून विद्यार्थ्यांची ये जा वाढली आहे.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांची गैरसोय बघता या मार्गाची पक्के डांबरीकरण करण्याची मागण नागरिकांतून होत आहे.याचा मार्गावर आष्टी रेल्वे गेट आहे. या गेटवरील उड्डाण पुलाचे काम अद्यापही हाती घेण्यात आले नाही. यामुळे या गेटवर दर दहा मिनिटाला वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे हा मार्ग अडथळयाबरोबरच धोकादायकही बनला आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन परिसरात लवकरात लवकर उड्डाणपुलाचे काम सुरू करून वाहतूक कोेंडी सोडविण्याची गरज आहे.