शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

परतूर-आष्टी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:05 IST

शहरातील परतूर-आष्टी मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्याने या मार्गावर नियमीत अपघात होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. एकूणच हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहरातील परतूर-आष्टी मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्याने या मार्गावर नियमीत अपघात होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. एकूणच हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.दिवसेदिवस या मार्गावर वाहनांची सख्या वाढत आहे. मात्र रस्त्याचे रूंदीकरण अद्यापही करण्यात आले नाही. त्यातच वाहनधारकही आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करत असल्याने वाहनाला जाण्यासाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. परिणामी रात्रीच्या वेळी अनेक वेळा या मार्गावर अपघात होऊन जायबंदी झाले आहेत. वाढती वाहनांची गर्दी बघता या मार्गाचे रूंदीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिक , वाहनधारकांनी केली आहे.मात्र याकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. एकेरी रस्ता त्यातचही मोठी खड्डे यामुळे वाहने चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. या मार्गावर साखर कारखाना असल्याने या मार्गावरून नियमित जड वाहनांची गर्दी असते.खड्डा चुकविण्याच्या नादात अनेकवेळा उसाची ट्रॉली उलटून अपघात होत आहे. तसेच वाळूने भरलेलेल हायवा ट्रक सुध्दा ये जा करीत असल्याने रस्त्याची चाळणी झाली आहे.मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. सध्या परिक्षेचे दिवस असल्याने या मार्गावरून विद्यार्थ्यांची ये जा वाढली आहे.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांची गैरसोय बघता या मार्गाची पक्के डांबरीकरण करण्याची मागण नागरिकांतून होत आहे.याचा मार्गावर आष्टी रेल्वे गेट आहे. या गेटवरील उड्डाण पुलाचे काम अद्यापही हाती घेण्यात आले नाही. यामुळे या गेटवर दर दहा मिनिटाला वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे हा मार्ग अडथळयाबरोबरच धोकादायकही बनला आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन परिसरात लवकरात लवकर उड्डाणपुलाचे काम सुरू करून वाहतूक कोेंडी सोडविण्याची गरज आहे.