शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

निम्न दुधनाचे पाणी झेपावले परभणीकडे; प्रकल्पातून पाणी सोडण्याची दुसरी वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:28 IST

निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी परभणी शहराची तहान भागवण्यासाठी मंगळवारी झेपावले असून, धरणाच्या चार दरवाजातून एक हजार १८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. प्रकल्पातून पाणी सोडण्याची ही दुसरी ही वेळ आहे.

परतूर: निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी परभणी शहराची तहान भागवण्यासाठी मंगळवारी झेपावले असून, धरणाच्या चार दरवाजातून एक हजार १८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. प्रकल्पातून पाणी सोडण्याची ही दुसरी ही वेळ आहे.परभणी व पूर्णा शहराला यावर्षी हिवाळ्यातच पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. दोन महिन्यांपासून या शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने या शहराची तहान भागवण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. दाने महिन्यांपूर्वी पूर्णापर्यंत धरणातील पाणी सोडण्यात आले होते. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता प्रकल्पाचे सात, १६, १३ आणि २० क्रमांकाचे दरवाजे परभणीच्या जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये उघडण्यात आले आहेत. या दरवाजातून एक हजार १८१ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. चारही दरवाजातून ४८ ते ५० तास पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. धरणात सध्या एकूण पाणी साठा ७२ टक्के आहे. यावर्षी या धरणावर परतूर, सेलू, परभणी व पूर्णा या मोठ्या शहरांसह आजूबाजूची गावे, तसेच सिंचनासाठी अवलंबून राहावे लागणार आहे. .त्यामुळे या धरणातील पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.-----------पाणी झेपावताच पात्र भरलेया धरणाचे चार दरवाजे उघडताच धरणाखालील कोरडे पडलेले नदीचे पात्र क्षणार्धात पाण्याने खळखळून वाहू लागले. यामुळे पात्रात सर्वत्र पाणीच पाणी दिसत होेते.