शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पान दोनचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील गायरान जमिनीवर उभारण्यात आलेल्या ३३ केव्ही उपकेंद्राचे काम तीन वर्षापासून रेंगाळले असून, परिसरात ...

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील गायरान जमिनीवर उभारण्यात आलेल्या ३३ केव्ही उपकेंद्राचे काम तीन वर्षापासून रेंगाळले असून, परिसरात विजेचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. शेतकरी व ग्राहक त्रस्त झाले आहे. तीन वर्षापूर्वी या केंद्राचे थाटात उद्घाटन होऊनही कामाला सुरूवात करण्यात आली नाही. या उपकेंद्राचे तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी तुकाराम चंडोल, अनिल चंडोल, अशोक पवार यांनी केली.

दाभाडी परिसरात कडाक्याची थंडी

जालना : बदनापूर तालुक्यातील दाभाडी परिसर गेल्या दोन दिवसापासून धुक्यात हरवला आहे. दाभाडी परिसरात ढगाळ वातावरणानंतर पाऊस झाला. आता धुके पडू लागले आहे. त्याचबरोबर कडाक्याची थंडीही वाढली आहे. यंदा अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. आता दाट धुके पडत आहे. हे धुके पिकांना धोेकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रेल्वे संघर्ष समितीचे केंद्रीय पथकाला निवेदन

जालना : जालना- खामगाव या नवीन रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. या मार्गाला तातडीने मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी मागणी जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने केंद्रीय पथकाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर गणेशलाल चौधरी, उपाध्यक्ष सुभाषचंद्र देविदान, महासचिव फेरोजअली, रमेश अग्रवाल, अशोक मिश्रा, ॲड. कुलकर्णी, मनोहर तलरेजा, बाबूराव सतकर, गेंदालाल झुंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पर्यवेक्षक जगताप सेवानिवृत्त

जालना : जेईएस कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक टी.आर. जगताप नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे विभागीय सचिव बी.बी. गौड, बी.जी. सोळुंके, सचिव शेख अब्बास, उपाध्यक्ष अशोक झिने, कोषाध्यक्ष महेश लोंकलकर, उपाध्यक्ष गणेश जाधव, शाम राठोड, विलास खऱ्वडे, राजेश एंगाटे, राजेंद्र ठोंबरे, पुरूषोत्तम दायमा, नवनाथ गिते आदींची उपस्थिती होती.

अंजानीआई फाउंडेशनला पुरस्कार

जालना : अंजानीआई फाउंडेशन जालना शहरात वयोवृध्दांसाठी कार्य करत आहे. फाउंडेशनकडून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. या कार्याची दखल घेऊन नांदेड येथील कल्याणी एज्यूकेशन सोशल वेलफेअर सोसायटीने फाउंडेशनला स्त्री भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. ज्योती आडेकर, विद्या जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती.

विद्या केंद्र सुरू करणार

जालना : जिल्ह्यात जास्तीत-जास्त समाज विद्या केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शांतीलाल मुथ्था फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष हस्तीमल बंब यांनी दिली. भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.