शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पान दोनवरी बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:40 IST

जालना : शहरातील बडीसडक रस्त्यावरील दधीमाता मंदिरास सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र अग्रवाल यांनी दानपेटी भेट देऊन बसवून घेतली आहे. दानपेटी ...

जालना : शहरातील बडीसडक रस्त्यावरील दधीमाता मंदिरास सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र अग्रवाल यांनी दानपेटी भेट देऊन बसवून घेतली आहे. दानपेटी देताना राजेश अग्रवाल, दीपक भरतीया, दीपक दायमा, संतोष लाड, रमेश काळे आदींची उपस्थिती होती. याबद्दल अग्रवाल यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

बागल परिवारच्यावतीने रक्तदान शिबिर

परतूर : बागल परिवाराच्यावतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १३४ जणांनी रक्तदान केले. ॲड. माणिक काळे, शंकर पवार यांच्याहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. जालना येथील जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी शिवराज जाधव व त्यांच्या पथकाने रक्त संकलन केले. रक्तदान शिबिर घेण्यामागील उद्देश विशाल बागल यांनी सांगितला.

सेवानिवृत्तीबद्दल बोर्डे यांचा गौरव

दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शिवाजी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुधाकर बोर्डे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. याबद्दल शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. बोर्डे शिवाजी विद्यालयात ५ नोव्हेंबर १९९० रोजी कार्यरत झाले होते. त्यांच्या कार्यकाळातील बहुतांशी विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात तालुकास्तरीय ते राज्यपातळीपर्यंत क्रीडा क्षेत्राची चुणूक दाखविली आहे.

जालना शहरात कुत्र्यांचा उपद्रव वाढला

जालना : शहर परिसरात मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. अनेकदा कुत्रे दुचाकींसह इतर वाहनांमागे धावतात. त्यामुळे अपघात घडण्याची भीती नाकारता येत नाही. शहरातील भोकरदन नाका, शनी मंदिर, गांधी चमन, औरंगाबाद चौफुली, लक्कडकोट, चंदनझिरा आदी परिसरात रात्री मोकाट कुत्रे फिरतात. वेळीच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे.

जगताप यांचा गौरव

जालना : शहरातील जेईएस कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक टी. आर. जगताप नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. याबद्दल शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संघटनेचे विभागीय सचिव व्ही. बी. गौड, बी. जी. सोळुंके, शेख अब्बास, अशोक झिने, महेश लोकलकर, विलास खरवडे आदींची उपस्थिती होती. सोळुंके यांनी जगताप यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

रस्त्याची दुरवस्था

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री ते भांबेरी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. असे असतानाही रस्त्याचे काम करण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे मध्यंतरी सदरील रस्त्याचे काम सुरू झाले होते; परंतु परत काम बंद पडले असल्याने ग्रामस्थांमधून तर्क- वितर्क लावले जात आहेत. वेळीच रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.