शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

पान एकचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:40 IST

जालना : नवीन वर्षाचे स्वागत करण्यास यंदा निर्बंधाचे बंध ठेवण्यात आले आहे. यामुळे नेहमीसारखा जल्लोष पाहयला मिळणार नाही. कोरोना ...

जालना : नवीन वर्षाचे स्वागत करण्यास यंदा निर्बंधाचे बंध ठेवण्यात आले आहे. यामुळे नेहमीसारखा जल्लोष पाहयला मिळणार नाही. कोरोना परिस्थितीनंतर शासनाने अनेक बाबतीत निर्बंध ठेवले आहेत. यातच हॉटेल आणि ढाबा यांना वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळेच नवीन वर्षाचे स्वागताला उत्तर रात्रीच्या मर्यादा ठेवण्यात आलेल्या आहेत.

स्मशानभूमीसाठी आरक्षण

जालना : शहराचा वाढलेला विस्तार आणि चोहोबाजूने वाढलेले शहरीकरण पाहता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह नगर पालिकेने शहराच्या चारही बाजूने नवीन व अद्ययावत स्मशानभूमीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. त्यापैकी डीपीमध्ये दोन ठिकाणी स्मशानभूमीसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. तर दोन ठिकाणी जागांचा शोध घेवून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवून स्मशानभूमीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितले.

मुख्य जलवाहिनी फुटली ; पाणी वाया

भोकरदन : शहरातील बसस्थानक प्रवेशद्वाराजवळील मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहेत. या गळतीमुळे बसस्थानक परिसरात रस्त्यावरच पाणीच पाणी झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भोकरदन शहरासाठी दानापूर येथील जुई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या योजनेच्या पाईलाईनची व्यवस्थित देखभाल केली जात नाही.

संगणकीय प्रणाली योजनेला मुदतवाढ

वडीगोद्री : कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योनजा या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता शासनाने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहेत. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबीकरिता अर्ज करावयाचा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

साष्टपिंपळगावात आरक्षणासाठी आंदोलन

अंकुशनगर : अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी एका शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असून, आरक्षणाअभावी सुशिक्षित तरूणांमध्ये नैराश्य पसरले आहे. केंद्र सरकारने एक विचाराने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. या निवेदनावर संजय कटारे, ज्ञानेश्वर बोचरे, उमेश औटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.