शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

पान एकचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:40 IST

जालना : नवीन वर्षाचे स्वागत करण्यास यंदा निर्बंधाचे बंध ठेवण्यात आले आहे. यामुळे नेहमीसारखा जल्लोष पाहयला मिळणार नाही. कोरोना ...

जालना : नवीन वर्षाचे स्वागत करण्यास यंदा निर्बंधाचे बंध ठेवण्यात आले आहे. यामुळे नेहमीसारखा जल्लोष पाहयला मिळणार नाही. कोरोना परिस्थितीनंतर शासनाने अनेक बाबतीत निर्बंध ठेवले आहेत. यातच हॉटेल आणि ढाबा यांना वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळेच नवीन वर्षाचे स्वागताला उत्तर रात्रीच्या मर्यादा ठेवण्यात आलेल्या आहेत.

स्मशानभूमीसाठी आरक्षण

जालना : शहराचा वाढलेला विस्तार आणि चोहोबाजूने वाढलेले शहरीकरण पाहता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह नगर पालिकेने शहराच्या चारही बाजूने नवीन व अद्ययावत स्मशानभूमीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. त्यापैकी डीपीमध्ये दोन ठिकाणी स्मशानभूमीसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. तर दोन ठिकाणी जागांचा शोध घेवून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवून स्मशानभूमीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितले.

मुख्य जलवाहिनी फुटली ; पाणी वाया

भोकरदन : शहरातील बसस्थानक प्रवेशद्वाराजवळील मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहेत. या गळतीमुळे बसस्थानक परिसरात रस्त्यावरच पाणीच पाणी झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भोकरदन शहरासाठी दानापूर येथील जुई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या योजनेच्या पाईलाईनची व्यवस्थित देखभाल केली जात नाही.

संगणकीय प्रणाली योजनेला मुदतवाढ

वडीगोद्री : कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योनजा या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता शासनाने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहेत. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबीकरिता अर्ज करावयाचा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

साष्टपिंपळगावात आरक्षणासाठी आंदोलन

अंकुशनगर : अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी एका शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असून, आरक्षणाअभावी सुशिक्षित तरूणांमध्ये नैराश्य पसरले आहे. केंद्र सरकारने एक विचाराने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. या निवेदनावर संजय कटारे, ज्ञानेश्वर बोचरे, उमेश औटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.