शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

पान एकचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:40 IST

जालना : नवीन वर्षाचे स्वागत करण्यास यंदा निर्बंधाचे बंध ठेवण्यात आले आहे. यामुळे नेहमीसारखा जल्लोष पाहयला मिळणार नाही. कोरोना ...

जालना : नवीन वर्षाचे स्वागत करण्यास यंदा निर्बंधाचे बंध ठेवण्यात आले आहे. यामुळे नेहमीसारखा जल्लोष पाहयला मिळणार नाही. कोरोना परिस्थितीनंतर शासनाने अनेक बाबतीत निर्बंध ठेवले आहेत. यातच हॉटेल आणि ढाबा यांना वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळेच नवीन वर्षाचे स्वागताला उत्तर रात्रीच्या मर्यादा ठेवण्यात आलेल्या आहेत.

स्मशानभूमीसाठी आरक्षण

जालना : शहराचा वाढलेला विस्तार आणि चोहोबाजूने वाढलेले शहरीकरण पाहता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह नगर पालिकेने शहराच्या चारही बाजूने नवीन व अद्ययावत स्मशानभूमीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. त्यापैकी डीपीमध्ये दोन ठिकाणी स्मशानभूमीसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. तर दोन ठिकाणी जागांचा शोध घेवून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवून स्मशानभूमीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितले.

मुख्य जलवाहिनी फुटली ; पाणी वाया

भोकरदन : शहरातील बसस्थानक प्रवेशद्वाराजवळील मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहेत. या गळतीमुळे बसस्थानक परिसरात रस्त्यावरच पाणीच पाणी झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भोकरदन शहरासाठी दानापूर येथील जुई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या योजनेच्या पाईलाईनची व्यवस्थित देखभाल केली जात नाही.

संगणकीय प्रणाली योजनेला मुदतवाढ

वडीगोद्री : कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योनजा या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता शासनाने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहेत. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबीकरिता अर्ज करावयाचा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

साष्टपिंपळगावात आरक्षणासाठी आंदोलन

अंकुशनगर : अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी एका शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असून, आरक्षणाअभावी सुशिक्षित तरूणांमध्ये नैराश्य पसरले आहे. केंद्र सरकारने एक विचाराने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. या निवेदनावर संजय कटारे, ज्ञानेश्वर बोचरे, उमेश औटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.