शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

पान चारचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

जालना : जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी, यासाठी जागर उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे-मुंबई येथील दानशूर व्यक्ती ...

जालना : जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी, यासाठी जागर उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे-मुंबई येथील दानशूर व्यक्ती व प्रकाशन संस्थेमार्फत उपक्रमशील शाळांसाठी मोफत पुस्तकसंच भेट देण्यात येत आहे. रंगनाथराव पाटील विद्यालय जामवाडी, जिल्हा परिषद शाळा काजळा, सरस्वती विद्यालय गोंदेगाव, रंगनाथ महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघ्रुळ, संस्कार प्रबोधिनी विद्यालय आदी शाळांना मोफत पुस्तकसंच देण्यात आले आहेत.

रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी

अंबड : तालुक्यातील मार्डी- हस्तपोखरी- अंबड या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. या रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे नायब तहसीलदार बाबुराव चंडोल यांच्याकडे केली आहे. निवेदनावर वंचितचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने, माजी सरपंच ओमप्रकाश राऊत, भाऊराव बनसोडे, गणेश मुंजाळ, बाबासाहेब जाधव, भगवान तायडे, कृष्णा तायडे, राजेंद्र भडक, रामेश्वर मोटकर, बप्पासाहेब पाटील, संदीपान मुंजाळ, शफी पटेल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, या रस्त्याच्या कामाला गतवर्षी सुरुवात केली होती. त्यावर मातीमिश्रीत मुरूम, खडी तसेच विहिरीचे ढब्बर वापरण्यात आले आहे.

ओकार तोष्णीवाल बीडीएस परीक्षेत उतीर्ण

जालना: शहरातील डॉ. कमलकिशोर तोष्णीवाल यांचा चिरंजीव ओंकार तोष्णीवाल याने बीडीएसच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळवत यश संपादन केले. लातूर येथील महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ डेंटल सायन्स ॲण्ड रिसर्च येथून बीडीएस उतीर्ण झाला आहे. त्याच्या यशाबद्दल राजुरी स्टीलचे उद्योजक कैलास लोय, शिवरतन मुंदडा आदींनी कौतुक केले.

जालना जिल्ह्यातील एटीएममध्ये खडखडाट

जालना : जिल्हाभरातील एटीएटीमध्ये मागील काही दिवसांपासून खडखडाट आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच ताराबंळ उडत आहे. शुक्रवार ते रविवार अशा सलग तीन शासकीय सुट्या आल्याने पैशांसाठी नागरिक एटीएमकडे वळाले, पण शहरातील बहुतांश एटीएममध्ये रक्कमच उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय झाली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालनही बँकांकडून केले जात नाही.

विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांची गैरसोय

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी गावासह परिसरात विजेचा लपंडाव व भारनियमनामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतात जावे लागत आहे. परिसरातील विजेची गरज पूर्ण करण्यासाठी आष्टी, लोणी, काऱ्हाळा, कोकाटे हदगाव ही चार ३३ केव्ही उपकेंद्र असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे येथे १३२ केव्हीची गरज असून, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांनी पाळीव जनावरे सोडली कपाशीत

अंबड : अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात यावर्षी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कपाशीचे पीक जोमात आले होते. परंतु, सततच्या पावसामुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले. बोंडे सडल्याने दोन वेच्यातच कापूस संपला. तसेच बोंडअळीने थैमान घातल्याने शेतकऱ्यांनी कपाशी उपटून गहू, हरभरा पिकांची पेरणी केली. अजूनही काही शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीचे पीक उभे आहे. या पिकात जनावरे चरण्यासाठी सोडण्यात आली आहेत.

दाट धुक्याचा कांदा पिकावर परिणाम

जालना : जिल्ह्यात गतवर्षी कांदा बियाण्याला दीड ते दोन लाख रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे. यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने कांदा पीक चांगले आले आहे. काही शेतकरी सध्या कांदा लागवड करीत आहेत. मात्र, मागील चार दिवसांपासून ग्रामीण भागात पडत असलेल्या दाट धुक्याचा कांदा पिकावर परिणाम होत आहे. नवीन पाती वाकड्या होत आहेत तसेच कांदा जळून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

पशुगणना जाहीर होईना

भोकरदन : तब्बल दोन वर्षांनी हाती घेण्यात आलेल्या २० व्या पशुगणनेचे काम तालुकानिहाय नेमण्यात आलेल्या प्रगणकांनी पूर्ण केले आहे. परंतु, पशुसंवर्धन विभागाकडून पशुगणना जाहीर केली जात नाही.

रस्त्याची दुरवस्था

आष्टी : येथील परतूर - आष्टी रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गतिरोधक उभारावा

जालना : अंबड तालुक्यातील जामखेड येथून बदनापूर ते जामखेड मार्ग गेला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ग्रामस्थांची घरे आहेत. घरातील लहान मुले रस्त्यालगतच खेळत असतात. त्यामुळे रस्त्यावर गतिरोधक उभारावा, अशी मागणी होत आहे.