शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
2
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
3
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
4
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
5
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
6
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
7
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
8
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
9
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
10
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
11
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
12
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
13
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
14
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
15
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
18
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
19
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
20
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार

पान चारचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

जालना : जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी, यासाठी जागर उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे-मुंबई येथील दानशूर व्यक्ती ...

जालना : जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी, यासाठी जागर उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे-मुंबई येथील दानशूर व्यक्ती व प्रकाशन संस्थेमार्फत उपक्रमशील शाळांसाठी मोफत पुस्तकसंच भेट देण्यात येत आहे. रंगनाथराव पाटील विद्यालय जामवाडी, जिल्हा परिषद शाळा काजळा, सरस्वती विद्यालय गोंदेगाव, रंगनाथ महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघ्रुळ, संस्कार प्रबोधिनी विद्यालय आदी शाळांना मोफत पुस्तकसंच देण्यात आले आहेत.

रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी

अंबड : तालुक्यातील मार्डी- हस्तपोखरी- अंबड या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. या रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे नायब तहसीलदार बाबुराव चंडोल यांच्याकडे केली आहे. निवेदनावर वंचितचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने, माजी सरपंच ओमप्रकाश राऊत, भाऊराव बनसोडे, गणेश मुंजाळ, बाबासाहेब जाधव, भगवान तायडे, कृष्णा तायडे, राजेंद्र भडक, रामेश्वर मोटकर, बप्पासाहेब पाटील, संदीपान मुंजाळ, शफी पटेल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, या रस्त्याच्या कामाला गतवर्षी सुरुवात केली होती. त्यावर मातीमिश्रीत मुरूम, खडी तसेच विहिरीचे ढब्बर वापरण्यात आले आहे.

ओकार तोष्णीवाल बीडीएस परीक्षेत उतीर्ण

जालना: शहरातील डॉ. कमलकिशोर तोष्णीवाल यांचा चिरंजीव ओंकार तोष्णीवाल याने बीडीएसच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळवत यश संपादन केले. लातूर येथील महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ डेंटल सायन्स ॲण्ड रिसर्च येथून बीडीएस उतीर्ण झाला आहे. त्याच्या यशाबद्दल राजुरी स्टीलचे उद्योजक कैलास लोय, शिवरतन मुंदडा आदींनी कौतुक केले.

जालना जिल्ह्यातील एटीएममध्ये खडखडाट

जालना : जिल्हाभरातील एटीएटीमध्ये मागील काही दिवसांपासून खडखडाट आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच ताराबंळ उडत आहे. शुक्रवार ते रविवार अशा सलग तीन शासकीय सुट्या आल्याने पैशांसाठी नागरिक एटीएमकडे वळाले, पण शहरातील बहुतांश एटीएममध्ये रक्कमच उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय झाली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालनही बँकांकडून केले जात नाही.

विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांची गैरसोय

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी गावासह परिसरात विजेचा लपंडाव व भारनियमनामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतात जावे लागत आहे. परिसरातील विजेची गरज पूर्ण करण्यासाठी आष्टी, लोणी, काऱ्हाळा, कोकाटे हदगाव ही चार ३३ केव्ही उपकेंद्र असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे येथे १३२ केव्हीची गरज असून, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांनी पाळीव जनावरे सोडली कपाशीत

अंबड : अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात यावर्षी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कपाशीचे पीक जोमात आले होते. परंतु, सततच्या पावसामुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले. बोंडे सडल्याने दोन वेच्यातच कापूस संपला. तसेच बोंडअळीने थैमान घातल्याने शेतकऱ्यांनी कपाशी उपटून गहू, हरभरा पिकांची पेरणी केली. अजूनही काही शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीचे पीक उभे आहे. या पिकात जनावरे चरण्यासाठी सोडण्यात आली आहेत.

दाट धुक्याचा कांदा पिकावर परिणाम

जालना : जिल्ह्यात गतवर्षी कांदा बियाण्याला दीड ते दोन लाख रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे. यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने कांदा पीक चांगले आले आहे. काही शेतकरी सध्या कांदा लागवड करीत आहेत. मात्र, मागील चार दिवसांपासून ग्रामीण भागात पडत असलेल्या दाट धुक्याचा कांदा पिकावर परिणाम होत आहे. नवीन पाती वाकड्या होत आहेत तसेच कांदा जळून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

पशुगणना जाहीर होईना

भोकरदन : तब्बल दोन वर्षांनी हाती घेण्यात आलेल्या २० व्या पशुगणनेचे काम तालुकानिहाय नेमण्यात आलेल्या प्रगणकांनी पूर्ण केले आहे. परंतु, पशुसंवर्धन विभागाकडून पशुगणना जाहीर केली जात नाही.

रस्त्याची दुरवस्था

आष्टी : येथील परतूर - आष्टी रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गतिरोधक उभारावा

जालना : अंबड तालुक्यातील जामखेड येथून बदनापूर ते जामखेड मार्ग गेला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ग्रामस्थांची घरे आहेत. घरातील लहान मुले रस्त्यालगतच खेळत असतात. त्यामुळे रस्त्यावर गतिरोधक उभारावा, अशी मागणी होत आहे.