शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

परतूरच्या रेल्वे उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:24 IST

आष्टी रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे कायम असून यामुळे वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी कधीही मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आष्टी रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे कायम असून यामुळे वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी कधीही मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे. या पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांसह वाहनधारकांतून होत आहे.परतूर शहरासह ग्रामीण भागातील वाहनधारकांसाठी आष्टी रेल्वेगेट ओलांडून जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून या उड्डाणपुलाच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासन चालढकल करीत आहे. यातच राजकीय हितसंबंध जपण्याचाही प्रकार होत आहे. मात्र, सद्यस्थितीत रेल्वे गेट ओलांडणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे. दहा-दहा मिनिटांनी हे गेट बंद होेते. दैनंदिन वाहतूक व बागेश्वरी साखर कारखाना सुरू झाल्याने उसाने भरलेले, ट्रक व ट्रॅक्टर त्यात दोन-दोन ट्रॉली ही जड वाहनेही याच रस्त्याने धावत आहेत. या रेल्वे गेटजवळ पडलेले खड्डे व गतिरोधक यामुळे उसाने भरलेली वाहने अडकून उलटत आहेत. तर काही वाहने या ठिकाणी अडकून पडत आहेत.वीस- पंचवीस खेड्यांची वाहतूक या गेटमधून होत आहे. वेळोवेळी बंद होणारे रेल्वे गेट व वाढलेली वाहनांची संख्या यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडतो. अनेकदा हे रेल्वे गेट तोडून, या गेटला धडकून वाहनांचे अपघात घडले आहेत. तरीही संबंधितांना याचे सोयरसुतक नाही. या पुलासाठी निधी उपलब्ध आहे. तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.खडकांच्या तपासण्या झाल्या आहेत. नकाशा तयार आहे. तरीही काम मागील तीन वर्षांपासून रखडले आहे. रेल्वे गेट बंद झाल्याने ग्रामीण भागातील अत्यवस्थ असलेले रुग्ण वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्याने अनेकदा दगावले आहेत. अपघात घडले आहेत.ही खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेकदा रेल्वे सेवाही विस्कळीत होत आहे. तरी या उड्डाणपुलाचे काम तात्काळ हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.