शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

परतूरच्या रेल्वे उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:24 IST

आष्टी रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे कायम असून यामुळे वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी कधीही मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आष्टी रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे कायम असून यामुळे वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी कधीही मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे. या पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांसह वाहनधारकांतून होत आहे.परतूर शहरासह ग्रामीण भागातील वाहनधारकांसाठी आष्टी रेल्वेगेट ओलांडून जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून या उड्डाणपुलाच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासन चालढकल करीत आहे. यातच राजकीय हितसंबंध जपण्याचाही प्रकार होत आहे. मात्र, सद्यस्थितीत रेल्वे गेट ओलांडणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे. दहा-दहा मिनिटांनी हे गेट बंद होेते. दैनंदिन वाहतूक व बागेश्वरी साखर कारखाना सुरू झाल्याने उसाने भरलेले, ट्रक व ट्रॅक्टर त्यात दोन-दोन ट्रॉली ही जड वाहनेही याच रस्त्याने धावत आहेत. या रेल्वे गेटजवळ पडलेले खड्डे व गतिरोधक यामुळे उसाने भरलेली वाहने अडकून उलटत आहेत. तर काही वाहने या ठिकाणी अडकून पडत आहेत.वीस- पंचवीस खेड्यांची वाहतूक या गेटमधून होत आहे. वेळोवेळी बंद होणारे रेल्वे गेट व वाढलेली वाहनांची संख्या यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडतो. अनेकदा हे रेल्वे गेट तोडून, या गेटला धडकून वाहनांचे अपघात घडले आहेत. तरीही संबंधितांना याचे सोयरसुतक नाही. या पुलासाठी निधी उपलब्ध आहे. तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.खडकांच्या तपासण्या झाल्या आहेत. नकाशा तयार आहे. तरीही काम मागील तीन वर्षांपासून रखडले आहे. रेल्वे गेट बंद झाल्याने ग्रामीण भागातील अत्यवस्थ असलेले रुग्ण वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्याने अनेकदा दगावले आहेत. अपघात घडले आहेत.ही खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेकदा रेल्वे सेवाही विस्कळीत होत आहे. तरी या उड्डाणपुलाचे काम तात्काळ हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.