शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

परतूरच्या रेल्वे उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:24 IST

आष्टी रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे कायम असून यामुळे वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी कधीही मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आष्टी रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे कायम असून यामुळे वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी कधीही मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे. या पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांसह वाहनधारकांतून होत आहे.परतूर शहरासह ग्रामीण भागातील वाहनधारकांसाठी आष्टी रेल्वेगेट ओलांडून जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून या उड्डाणपुलाच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासन चालढकल करीत आहे. यातच राजकीय हितसंबंध जपण्याचाही प्रकार होत आहे. मात्र, सद्यस्थितीत रेल्वे गेट ओलांडणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे. दहा-दहा मिनिटांनी हे गेट बंद होेते. दैनंदिन वाहतूक व बागेश्वरी साखर कारखाना सुरू झाल्याने उसाने भरलेले, ट्रक व ट्रॅक्टर त्यात दोन-दोन ट्रॉली ही जड वाहनेही याच रस्त्याने धावत आहेत. या रेल्वे गेटजवळ पडलेले खड्डे व गतिरोधक यामुळे उसाने भरलेली वाहने अडकून उलटत आहेत. तर काही वाहने या ठिकाणी अडकून पडत आहेत.वीस- पंचवीस खेड्यांची वाहतूक या गेटमधून होत आहे. वेळोवेळी बंद होणारे रेल्वे गेट व वाढलेली वाहनांची संख्या यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडतो. अनेकदा हे रेल्वे गेट तोडून, या गेटला धडकून वाहनांचे अपघात घडले आहेत. तरीही संबंधितांना याचे सोयरसुतक नाही. या पुलासाठी निधी उपलब्ध आहे. तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.खडकांच्या तपासण्या झाल्या आहेत. नकाशा तयार आहे. तरीही काम मागील तीन वर्षांपासून रखडले आहे. रेल्वे गेट बंद झाल्याने ग्रामीण भागातील अत्यवस्थ असलेले रुग्ण वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्याने अनेकदा दगावले आहेत. अपघात घडले आहेत.ही खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेकदा रेल्वे सेवाही विस्कळीत होत आहे. तरी या उड्डाणपुलाचे काम तात्काळ हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.