शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा - हर्षवर्धन जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:52 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने अध्यादेश काढून समाला दिलासा देण्याचे काम करावे, घटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये याचा नंतर समावेश करून विशेष अधिवेशन बोलावून त्यासाठी कायदा केल्यास तो न्यायालयात रद्द होणार नाही, अशी मागणी आ. हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने अध्यादेश काढून समाला दिलासा देण्याचे काम करावे, घटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये याचा नंतर समावेश करून विशेष अधिवेशन बोलावून त्यासाठी कायदा केल्यास तो न्यायालयात रद्द होणार नाही, अशी मागणी आ. हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.बुधवारी जालन्यातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्या जवळ मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलनास त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्यांना स्पर्श केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संपूर्ण समाज एकवटला आहे. असे असताना राजकीय पक्ष हे सोयीची भूमिका घेत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच यासाठी आता मराठा समाजाचा स्वतंत्र राजकीय पक्ष काढून आरक्षण मिळविण्यासाठी दबाव टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. एकूणच त्यांनी यावेळी सरकार आरक्षणा बाबत दिशाभूल करत असल्याचे सांगून, न्यायालय आणि मागास आयोगाकडे बोट दाखवत आहे. यावर उपाय म्हणून अध्यादेश काढून युवकांना हिंमत देण्याचे काम होऊ शकते. असे ते म्हणाले. पूर्वी दिलेली अनेक आश्वासने ही कशी फोल ठरली याची जंत्रीच आ. जाधव यांनी सादर केली. आपण या मुद्यावरून आक्रमक आणि भावनिक असल्याने राजीनामा देण्याचे धाडस केले. तसेच धाडस मराठा समाजाच्या खासदार आणि आमदारांनी दाखवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी शिवप्रहार संघटनेचे पदाधिकारी संजीव भोर यांनी मराठा समाजाच्या युवकांवर हिंसक आंदोलनाचे निमित्त करून जे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत, त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा देतानाच नऊ आॅगस्टच्या आंदोलनासाठी गावागावात जाऊन आम्ही हे आंदोलन ऐतिहासिक करणार असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस संजय लाखे पाटील, भास्कर दानवे, संजय खोतकर, विष्णू पाचफुले, जगन्नाथ काकडे, प्रशांत वाढेकर, तुळशीदास चंद, राजेंद्र गोरे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.लाडू येतील या भ्रमात राहू नयेआजचे सरकार हे आरक्षणाच्या मुद्यावरून चालढकल करत आहे, हे जरी मान्य असले तरी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा नामोल्लेख न करता जाधव यांनी त्यांच्यावरही टीका केली. पंधरा वर्षे सत्तेत असताना आरक्षणा संदर्भात काही केले नसल्याचे सांगून, या आंदोनलाचा फटका हा भाजपला बसणारच आहे, त्यामुळे आपोआपच आपल्याकडे सहा महिन्यांनी सत्तेचा लाडू हा आपल्याकडेच येईल, या भ्रमात कोणी राहू नये असा टोला त्यांनी लगावल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकाला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव