शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पावसाने खंड दिलेल्या मंडळात पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश

By दिपक ढोले  | Updated: August 22, 2023 20:27 IST

पीकविम्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

जालना : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानुषंगाने पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार तीन ते चार आठवड्यांचा पावसाचा खंड (साधरणपणे २१ दिवसांपेक्षा जास्त) असलेल्या जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांबाबत पीकविमा अधिसूचना निर्गमित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पीकविमा कंपनी व कृषी विभागास सोयाबीन व कापूस पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले.

पावसाच्या खंडामुळे उत्पादनात मागील सात वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट होण्याची शक्यता आढळून आल्यास सदर मंडळातील शेतकऱ्यांना आगाऊ २५ टक्के नुकसान भरपाई रक्कम अदा करण्याची तरतूद शासन निर्णयात आहे. त्यानुषंगाने तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना विमा कंपनी व कृषी विभागास देण्यात आल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, कृषी विभागातील अधिकारी, विमा प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.

या मंडळांमध्ये पावसाचा खंड१ बदनापूर, दाभाडी, रोषनगाव २३ दिवस खंड

२ जालना शहर, पाचनवडगाव, रामनगर २३ दिवस खंड३ राणीउंचेगाव २३ दिवस खंड४ सातोना (खु.) २१ दिवस खंड