शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

दोन दिवसात केवळ दोनच अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST

जालना : तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नामनिर्देशन पत्र सादर दोन दिवसात केवळ दोनच उमेदवारांचे अर्ज ...

जालना : तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नामनिर्देशन पत्र सादर दोन दिवसात केवळ दोनच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर असल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली.

२३ डिसेंबर पासून ग्रामपंचायतीसाठीचे नामनिर्देशनपत्र सादर करणे सुरू झाले आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची डेडलाईन ३० डिसेंबर आहे. शुक्रवारी ख्रिसमसनिमित्त सुटी होती. तर नंतर शनिवार आणि रविवारीही सुटी राहणार आहे. त्यामुळे सुटीचे दिवस वगळून उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. सुट्या वगळून आता केवळ तीन दिवस उमेदवारांच्या हाती राहिले आहेत. २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत ८६ ग्रामपंचायतीसाठी ७४० सदस्यांच्या जागेसाठी इच्छुकांना अर्ज भरावे लागणार आहेत. बहुतांश गावांमध्ये सरळ लढत होणार असली तरी अद्याप पॅनलमधील उमेदवार फिक्स न झाल्याने उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला नाही.

ज्या उमेदवाराचा अर्ज भरत असलेल्या प्रभागाच्या यादीत नाव आहे हे त्यांना प्रमाणित प्रत वेगळी सादर करण्याची गरज नाही. त्यांच्या मतदार यादीच्या छायांकित प्रतीवर संबंधित टेबलवरील निवडणूक निर्णय अधिकारी हे पडताळणी करून तशी नोंद करणार आहेत. ज्या उमेदवाराचे नाव नामनिर्देशन भरत असलेल्या प्रभागाच्या मतदार यादीत नाही केवळ अशा उमेदवारांना मतदार यादीची प्रमाणित प्रत सादर करणे आवश्यक आहे. सदरील प्रमाणीत प्रत ही तहसीलमधील अभिलेख कक्षातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सुटीच्या दिवशीही तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष यासाठी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार असल्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी सांगितले.

सातवी पासची अट

१ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या उमेदवारांनी सातवी पास असणे, ही अट घालण्यात आली आहे. त्यापूर्वी जन्मलेल्या उमेदवारांना ही अट बंधनकारक नाही. उमेदवारांना राष्ट्रीयकृत बँकेत नवीन खाते उघडणे बंधनकारक करण्यात आले आहे.