शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीत एक लाख ३० हजार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 23:45 IST

शनिवारी प्रसिध्द झालेल्या दुस-या यादीत ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील १ लाख ३० हजार १५८ लाभार्थी शेतकऱ्यांची नावे दोन याद्यांमध्ये प्रसिध्द झाली आहेत. शनिवारी प्रसिध्द झालेल्या दुस-या यादीत ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर शनिवारी दुपारपर्यंत १७०० हून अधिक शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण करून कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे.महाआघाडी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत ज्या शेतक-यांचे बँक कर्ज खात्याशी आधार क्रमांक संलग्न नाहीत. त्या शेतक-यांचे आधार क्रमांक संलग्निकरण करून घेण्यात आले. त्यानंतर शासनाच्या कर्जमुक्ती पोर्टलवर १ लाख ८१ हजार शेतक-यांची नावे अपलोड करण्यात आली होती. २४ फेब्रुवारी रोजी प्राथमिक टप्प्यात घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी या दोन गावांमधील ११०२ शेतक-यांची पहिली यादी प्रसिध्द करण्यात आली होती.शनिवारी २९ फेब्रुवारी रोजी दुसरी यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या दुस-या यादीत जालना जिल्ह्यातील ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतक-यांचा समावेश करण्यात आला आहे. यात अंबड तालुक्यातील १३७ गावातील १९ हजार २९९, बदनापूर तालुक्यातील ९० गावातील १२ हजार ३५१ शेतकरी, भोकरदन तालुक्यातील १५२ गावातील २३ हजार ९८० शेतकरी, घनसावंगी तालुक्यातील ११४ गावातील १६ हजार ७२ शेतकरी, जाफराबाद तालुक्यातील १०३ गावातील १५ हजार ६४८ शेतकरी, जालना तालुक्यातील १४३ गावातील १९ हजार ४४३ शेतकरी, मंठा तालुक्यातील ११२ गावांमधील १० हजार ०६ शेतकरी तर परतूर तालुक्यातील ९७ गावातील १३ हजार ३५९ शेतक-यांचा या दोन्ही यादीत समावेश करण्यात आला आहे. कर्जमुक्तीच्या दोन्ही याद्यांमध्ये जालना जिल्ह्यातील १ लाख ३० हजार १५८ शेतक-यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. याद्या गावस्तरावर प्रसिध्द झाल्यानंतर शेतक-यांनी आधार प्रमाणिकरणासाठी आपलं सरकार केंद्रावर एकच गर्दी केली होती.कर्जमुक्तीची दुसरी यादी शनिवारी प्रसिध्द करण्यात आली. या यादीत आपले नाव आल्याचे समजताच गेवराई बाजार (ता. बदनापूर) येथील गंगूबाई भगवान जोशी या शेतकरी महिलेने आधार प्रमाणिकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला. या योजनेंतर्गत त्यांचे ७१ हजार ९२ रूपयांचे कर्ज माफ झाले आहे.१११३ केंद्रावर प्रक्रियाकर्जमुक्तीच्या याद्या प्रसिध्द केल्यानंतर जिल्ह्यातील १११३ आपलं सरकार केंद्रावर शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण करून घेतले जात आहे. आधार प्रमाणिकरणासाठी जाताना शेतक-यांनी यादीत आपल्या आपल्या नावासमोर आलेला विशिष्ट क्रमांक, आपले बँकेतील कर्ज खाते क्रमांक, आधार क्रमांक व मोबाईल सोबत नेणे गरजेचे आहे.आधार क्रमांकाच्या ३६ तक्रारीकर्जमाफीच्या पहिल्या यादीत आधार क्रमांक चुकल्याबाबत ३६ आॅनलाईन तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. पैकी ५ तक्रारींचे निरसण करण्यात आले आहे. तर ४ तक्रारी जिल्हा समितीकडे प्रलंबित आहेत. तर २७ तक्रारी तहसीलदारांकडे प्रलंबित आहेत. यात बदनापूर तालुक्यात ३, भोकरदन २, घनसावंगी १५, जाफराबाद ५, जालना व परतूर तालुक्यातून प्रत्येकी १ अशा एकूण २७ तक्रारी आहेत. एकूण ३१ तक्रारींचा निपटारा होणे बाकी आहे.पाच कोटी कर्जखात्यात वर्गटेंभुर्णी व तीर्थपुरी येथील लाभार्थी शेतक-यांची यादी प्रथम प्रसिध्द झाली होती. या दोन गावातील ६९५ शेतक-यांच्या कर्ज खात्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत ४ कोटी ९७ लाख २२ हजार ४९६ रूपये वर्ग करण्यात आले आहेत.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी