शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

जुना जालन्यात चार दिवस निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:14 IST

जुना जालन्यात प्रत्येक झोनमधील पाणीपुरवठा चार दिवस विलंबाने होणार आहे.

जालना : शहराला पाणीपुरवठा करणा-या जायकवाडी-जालना योजनेवरील एअर व्हॉल्व्ह थेरगाव (ता.पाचोड) येथे मंगळवारी काी जणांनी फोडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. व्हॉल्व्ह दुरुस्तीसाठी जुना जालन्यातील झोननिहाय पाणीपुरवठा चार दिवस विलंबाने होणार आहे.जायकवाडी-जालना योजनेवरील व्हॉल्व्ह फोडून पाणी घेण्याचे प्रकार अंबड, पाचोड परिसरात वारंवार घडत आहेत. स्थानिक नागरिकांना सूचना दिल्यानंतरही हे प्रकार सुरूच असल्याने जालना शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. मंगळवारी दुपारी पाचोड तालुक्यातील थेरगाव परिसरात स्थानिकांनी एअरव्हॉल्व्ह फोडला. त्यामुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. याबाबत माहिती मिळताच नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे पथक थेरगावात पोहोचले. व्हॉल्व्ह दुरुस्तीसाठी जायकवाडी योजनेपासून शिरनेर टेकडीपर्यंत संपूर्ण जलवाहिनी रिकामी करावी लागणार आहे. यासाठी सुमारे बारा तासांचा वेळ लागणार आहे. बुधवारी जलवाहिनी रिकामी झाल्यानंतर प्रत्यक्ष व्हॉल्व्ह दुरुस्ती काम करता येणार आहे. या सर्व प्रक्रियेस चार दिवस लागणार असल्याने जुना जालन्यात प्रत्येक झोनमधील पाणीपुरवठा चार दिवस विलंबाने होणार आहे. शहरातील काही भागांत अंतर्गत जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू असल्याने जुनी जलवाहिनी फुटत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विलंबाने होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच आता व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.------------जलवाहिनीची सुरक्षा वाºयावरजायकवाडी- जालना योजनेवर सुमारे अडीचशे व्हॉल्व्ह आहेत. अनेक गावांमध्ये नागरिक जलवाहिनीतून वाया जाणाºया पाण्याचा विचार न करता व्हॉल्व्ह लिकेज करून पाणी घेत आहेत. यामध्ये काही शेतकºयांचाही समावेश आहे. हे पाणी थेट विहिरीत सोडले जात असल्याचे काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या तपासणीत दिसले होते. त्यानंतर जलवाहिनीच्या देखरेखीसाठी बंदूकधारी पोलीस तैनात करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या. तसे पत्रही पोलीस प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र, पुढे काहीच झाले नाही. व्हॉल्व्ह सुरक्षेसाठी वरील बाजूस पत्रे बसविण्याचे नियोजनही पालिकेने केले होते. परंतु हा निर्णयही हवेत विरला.--------------नागरिकांनी सहकार्य करावेनादुरुस्त झालेला व्हॉल्व्ह दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. यासाठी तीन ते चार दिवसांचा वेळ लागणार असल्याने नागरिकांनी पाण्याची बचत करून नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केले आहे.