शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

जुना जालन्यात चार दिवस निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:14 IST

जुना जालन्यात प्रत्येक झोनमधील पाणीपुरवठा चार दिवस विलंबाने होणार आहे.

जालना : शहराला पाणीपुरवठा करणा-या जायकवाडी-जालना योजनेवरील एअर व्हॉल्व्ह थेरगाव (ता.पाचोड) येथे मंगळवारी काी जणांनी फोडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. व्हॉल्व्ह दुरुस्तीसाठी जुना जालन्यातील झोननिहाय पाणीपुरवठा चार दिवस विलंबाने होणार आहे.जायकवाडी-जालना योजनेवरील व्हॉल्व्ह फोडून पाणी घेण्याचे प्रकार अंबड, पाचोड परिसरात वारंवार घडत आहेत. स्थानिक नागरिकांना सूचना दिल्यानंतरही हे प्रकार सुरूच असल्याने जालना शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. मंगळवारी दुपारी पाचोड तालुक्यातील थेरगाव परिसरात स्थानिकांनी एअरव्हॉल्व्ह फोडला. त्यामुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. याबाबत माहिती मिळताच नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे पथक थेरगावात पोहोचले. व्हॉल्व्ह दुरुस्तीसाठी जायकवाडी योजनेपासून शिरनेर टेकडीपर्यंत संपूर्ण जलवाहिनी रिकामी करावी लागणार आहे. यासाठी सुमारे बारा तासांचा वेळ लागणार आहे. बुधवारी जलवाहिनी रिकामी झाल्यानंतर प्रत्यक्ष व्हॉल्व्ह दुरुस्ती काम करता येणार आहे. या सर्व प्रक्रियेस चार दिवस लागणार असल्याने जुना जालन्यात प्रत्येक झोनमधील पाणीपुरवठा चार दिवस विलंबाने होणार आहे. शहरातील काही भागांत अंतर्गत जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू असल्याने जुनी जलवाहिनी फुटत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विलंबाने होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच आता व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.------------जलवाहिनीची सुरक्षा वाºयावरजायकवाडी- जालना योजनेवर सुमारे अडीचशे व्हॉल्व्ह आहेत. अनेक गावांमध्ये नागरिक जलवाहिनीतून वाया जाणाºया पाण्याचा विचार न करता व्हॉल्व्ह लिकेज करून पाणी घेत आहेत. यामध्ये काही शेतकºयांचाही समावेश आहे. हे पाणी थेट विहिरीत सोडले जात असल्याचे काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या तपासणीत दिसले होते. त्यानंतर जलवाहिनीच्या देखरेखीसाठी बंदूकधारी पोलीस तैनात करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या. तसे पत्रही पोलीस प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र, पुढे काहीच झाले नाही. व्हॉल्व्ह सुरक्षेसाठी वरील बाजूस पत्रे बसविण्याचे नियोजनही पालिकेने केले होते. परंतु हा निर्णयही हवेत विरला.--------------नागरिकांनी सहकार्य करावेनादुरुस्त झालेला व्हॉल्व्ह दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. यासाठी तीन ते चार दिवसांचा वेळ लागणार असल्याने नागरिकांनी पाण्याची बचत करून नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केले आहे.