शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

सीईओंच्या ‘अ‍ॅक्शन’मुळे अधिकारी, कर्मचारी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:24 IST

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी आठ जणांचे पथक तयार केले असून, हे पथक दर आठवड्याला आरोग्य केंद्रे, शाळा, अंगणवाड्या व मनरेगाचा कामांना अचानक भेटी देत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी आठ जणांचे पथक तयार केले असून, हे पथक दर आठवड्याला आरोग्य केंद्रे, शाळा, अंगणवाड्या व मनरेगाचा कामांना अचानक भेटी देत आहे. यावेळी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, सीईओंच्या या ‘अ‍ॅक्शन’मुळे अधिकारी व कर्मचारी चांगले धास्तावले आहेत. दरम्यान, आरोग्याच्या कामात निष्काळजीपणा करणाºया १२ वैद्यकीय अधिका-यांसह कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खंतगावकर यांनी दिली.मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सध्या कामात तेजी आणली असून, कामात हलगर्जीपणा करणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर त्या कडक अ‍ॅक्शन घेत आहे. यासाठी त्यांनी आठ अधिका-यांची नेमणूक केली आहे. आठवड्यातील एका दिवशी हे अधिकारी आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतीचा कारभार, रोजगारी हमीच्या कामांची पाहणी करत आहेत. यात अधिकारी व कर्मचा-यांनी हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.या पथकांनी आतापर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी तीन वेळेस भेटी दिल्या असून, या भेटीत या पथकाला काही अधिकारी व कर्मचारी कामात हलगर्जीपणा करत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईमुळे सर्वच अधिकारी व कर्मचा-यांमध्ये धास्ती बसली असल्याचे चित्र सध्या जिल्हाभरात पाहायला मिळत आहे.दरम्यान, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीत ग्रामस्थांच्या हाताला काम मिळावे, त्यांचे स्थलांतर थांबावे, यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत नागरिकांना कामे देण्यात येत आहे. परंतु, दुष्काळात कामाची मागणी करूनही काही ग्रामसेवक मजुरांना काम देत नाही. तसेच कामाचा सेल्फही तयार करत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी आठ ग्रामसेवकांची सोमवारीच विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे.त्या अगोदर शौचालयाचा कामात हलगर्जीपणा करणा-या १३८ ग्रामसेवकांवर वेतनवाढ कमी करण्याची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे ग्रामसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.बडगा : या ठिकाणी झाली कारवाईया पथकाने वाटूर, पाटोदा, धनगर पिंपळगाव, राणी उंचेगाव, श्रीष्टी, सातोना, माहोरा, टोणगाव या गावातील आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी काही अधिकारी गैरहजर दिसले. तर काही आरोग्य केंद्रांमध्ये औषधी उपलब्ध नसल्याचे आढळून आल्याने १२ वैद्यकीय अधिका-यांसह कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली आहे.कुठे काय आढळले ?श्रीष्टी येथील आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिका-यांसह कर्मचारी अनुपस्थित आढळले.धनगर पिंपळगाव येथील वैद्यकीय अधिका-याने १ वर्षांपासून अंगणवाडी तपासली नाही.पाटोदा येथील आरोग्य केंद्रात नोंद वह्या अद्ययावत नसल्याचे दिसले.राणीउंचेगाव येथील आरोग्य केंद्रात अस्वच्छता आढळूली.माहोरा येथील आरोग्य केंद्रात नोंदवह्या अद्ययावत नव्हत्या.टोणगाव येथे दहा वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आला नसल्याचे दिसून आले.वाटूर आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांनी ओंपीडीची फिस भरलीच नाही. तसेच येथे औषधांचा तुटवडाही जाणवला.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजना