शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

कापूस खरेदी केंद्रावर वाहनधारक शेतकऱ्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST

बैलगाड्यांना प्राधान्य : शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर येथे सुरू असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर दिवसभरात ...

बैलगाड्यांना प्राधान्य : शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर येथे सुरू असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर दिवसभरात पाचशे क्विंटल पर्यंत कापसाची खरेदी करण्यात येत आहे. यात बैलगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहनधारक शेतकऱ्यांना अनेक दिवस ताटकळत थांबावे लागत आहे. यात वाहनांच्या भाड्याचा शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

राजूर येथील कापूस खरेदी केंद्र १७ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. यानंतर १६ डिसेंबर रोजी कापूस साठवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने कारण सांगून कापसाची खरेदी बंद करण्यात आली होती. याचा शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे २८ डिसेंबर रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेऊन कापूस खरेदी पूर्ववत सुरू करण्यात आली. परंतु, खरेदी केंद्रावर सीसीआयचे अधिकारी मनमानी कारभार करीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात पाचशे क्विंटल कापूस खरेदी केला जात आहे. यात बैलगाड्यांना प्राधान्य असल्याने ट्रॅक्टर, टेम्पो वाहनातून आणलेल्या कापसाची खरेदी रखडून पडत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी किरायाने वाहने आणली आहेत. यातच दहा ते बारा दिवस मोजमाप होत नसल्याने शेतकऱ्यांना किरायाच्या वाहनांचा मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. असे असतानाही खरेदी केंद्रावर उशिरा कापूस खरेदी केली जात असून, सायंकाळी लवकर खरेदी बंद करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सीसीआय जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बुधवारपर्यंत केंद्रावर २०७ वाहनांची नोंद झालेली असून, खरेदी केंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात वाहने उभी आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सीसीआयने दिवसभरात कापसाची खरेदी वाढवण्यासह गती द्यावी, अन्यथा येत्या काही दिवसांमध्ये आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनावर शिवाजी ढाकणे, रामेश्वर नागवे, विलास मीसाळ, गोरख मोरवळे, ऋषिंदर बनकर, दत्ता काफरे, आत्माराम नागवे, शिवाजी सहाने, नानासाहेब ढाकणे, देविदास नागवे, विठ्ठल शेजुळ, आण्णा ढाकणे, समाधान ढाकणे, दत्तू बकाल, सिद्धेश्वर मोरे, लक्ष्मण कढवणे, दौलतराव नागवे यांच्यासह ४५ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.