शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी केंद्रावर वाहनधारक शेतकऱ्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST

बैलगाड्यांना प्राधान्य : शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर येथे सुरू असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर दिवसभरात ...

बैलगाड्यांना प्राधान्य : शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर येथे सुरू असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर दिवसभरात पाचशे क्विंटल पर्यंत कापसाची खरेदी करण्यात येत आहे. यात बैलगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहनधारक शेतकऱ्यांना अनेक दिवस ताटकळत थांबावे लागत आहे. यात वाहनांच्या भाड्याचा शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

राजूर येथील कापूस खरेदी केंद्र १७ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. यानंतर १६ डिसेंबर रोजी कापूस साठवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने कारण सांगून कापसाची खरेदी बंद करण्यात आली होती. याचा शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे २८ डिसेंबर रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेऊन कापूस खरेदी पूर्ववत सुरू करण्यात आली. परंतु, खरेदी केंद्रावर सीसीआयचे अधिकारी मनमानी कारभार करीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात पाचशे क्विंटल कापूस खरेदी केला जात आहे. यात बैलगाड्यांना प्राधान्य असल्याने ट्रॅक्टर, टेम्पो वाहनातून आणलेल्या कापसाची खरेदी रखडून पडत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी किरायाने वाहने आणली आहेत. यातच दहा ते बारा दिवस मोजमाप होत नसल्याने शेतकऱ्यांना किरायाच्या वाहनांचा मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. असे असतानाही खरेदी केंद्रावर उशिरा कापूस खरेदी केली जात असून, सायंकाळी लवकर खरेदी बंद करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सीसीआय जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बुधवारपर्यंत केंद्रावर २०७ वाहनांची नोंद झालेली असून, खरेदी केंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात वाहने उभी आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सीसीआयने दिवसभरात कापसाची खरेदी वाढवण्यासह गती द्यावी, अन्यथा येत्या काही दिवसांमध्ये आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनावर शिवाजी ढाकणे, रामेश्वर नागवे, विलास मीसाळ, गोरख मोरवळे, ऋषिंदर बनकर, दत्ता काफरे, आत्माराम नागवे, शिवाजी सहाने, नानासाहेब ढाकणे, देविदास नागवे, विठ्ठल शेजुळ, आण्णा ढाकणे, समाधान ढाकणे, दत्तू बकाल, सिद्धेश्वर मोरे, लक्ष्मण कढवणे, दौलतराव नागवे यांच्यासह ४५ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.