शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
5
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
6
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
7
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
8
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
9
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
10
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
11
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
12
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
13
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
14
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
15
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
16
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
18
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
19
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
20
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

कापूस खरेदी केंद्रावर वाहनधारक शेतकऱ्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST

बैलगाड्यांना प्राधान्य : शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर येथे सुरू असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर दिवसभरात ...

बैलगाड्यांना प्राधान्य : शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर येथे सुरू असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर दिवसभरात पाचशे क्विंटल पर्यंत कापसाची खरेदी करण्यात येत आहे. यात बैलगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहनधारक शेतकऱ्यांना अनेक दिवस ताटकळत थांबावे लागत आहे. यात वाहनांच्या भाड्याचा शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

राजूर येथील कापूस खरेदी केंद्र १७ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. यानंतर १६ डिसेंबर रोजी कापूस साठवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने कारण सांगून कापसाची खरेदी बंद करण्यात आली होती. याचा शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे २८ डिसेंबर रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेऊन कापूस खरेदी पूर्ववत सुरू करण्यात आली. परंतु, खरेदी केंद्रावर सीसीआयचे अधिकारी मनमानी कारभार करीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात पाचशे क्विंटल कापूस खरेदी केला जात आहे. यात बैलगाड्यांना प्राधान्य असल्याने ट्रॅक्टर, टेम्पो वाहनातून आणलेल्या कापसाची खरेदी रखडून पडत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी किरायाने वाहने आणली आहेत. यातच दहा ते बारा दिवस मोजमाप होत नसल्याने शेतकऱ्यांना किरायाच्या वाहनांचा मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. असे असतानाही खरेदी केंद्रावर उशिरा कापूस खरेदी केली जात असून, सायंकाळी लवकर खरेदी बंद करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सीसीआय जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बुधवारपर्यंत केंद्रावर २०७ वाहनांची नोंद झालेली असून, खरेदी केंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात वाहने उभी आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सीसीआयने दिवसभरात कापसाची खरेदी वाढवण्यासह गती द्यावी, अन्यथा येत्या काही दिवसांमध्ये आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनावर शिवाजी ढाकणे, रामेश्वर नागवे, विलास मीसाळ, गोरख मोरवळे, ऋषिंदर बनकर, दत्ता काफरे, आत्माराम नागवे, शिवाजी सहाने, नानासाहेब ढाकणे, देविदास नागवे, विठ्ठल शेजुळ, आण्णा ढाकणे, समाधान ढाकणे, दत्तू बकाल, सिद्धेश्वर मोरे, लक्ष्मण कढवणे, दौलतराव नागवे यांच्यासह ४५ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.