शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:26 IST

राणी उंचेगाव परिसरातील सामान्य शेतकरी व्यापाऱ्यांच्या लुटीतून वाचण्यासाठी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर कापसाची विक्री करीत आहेत. यात घनसावंगी कृषी ...

राणी उंचेगाव परिसरातील सामान्य शेतकरी व्यापाऱ्यांच्या लुटीतून वाचण्यासाठी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर कापसाची विक्री करीत आहेत. यात घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीने आठवड्यामधील केवळ बुधवारी या एकाच दिवशी बैलगाड्यांमधील कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बुधवारी या केंद्रावर १६० बैलगाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी कृउबा समितीचे नियोजन कोलमडले असल्याचे दिसून आले. बुधवारी आलेल्या बैलगाड्या गुरुवारी दुपारपर्यंतदेखील खाली झाल्या नव्हत्या. तर काही शेतकऱ्यांना टोकनदेखील मिळालेले नव्हते.

शेतकऱ्यांनी बैलगाड्यांमधून आणलेल्या कापूस तपासणीमध्ये सीसीआयकडून अडवणूक केली जाते. केंद्रावर आलेल्या अनेक बैलगाड्यांमधील कापूस अर्धाच खाली करून घेण्यात आला होता. उर्वरित कापूस परत पाठवण्यात आला. शेवगळ येथील काकासाहेब शिंदे म्हणाले, मी बैलगाडीमध्ये आणलेल्या कापसापैकी केवळ २ क्विंटल ५० किलो कापूस खरेदी करून घेण्यात आला. उर्वरित कापूस या ठिकाणी चालत नसल्याचे ग्रेडरकडून सांगण्यात आले. यानंतर मी विनवणी करूनही उर्वरित कापूस खरेदी करण्यात आला नाही. शिवाय प्रत्येक दिवशी राणी उंचेगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर बैलगाडीमधील कापसाची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

बैलाच्या पाण्याची असुविधा

राणी उंचेगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर अनेक शेतकरी बैलगाडीमधून कापूस घेऊन येत आहेत; परंतु येथे बैलाच्या पाण्याची सोय कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी परिसरात मिळेल तेथे बैलांना पाणी पाजतात. याविषयी घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाहेकर म्हणाले की, खरेदी केंद्रावर बैलाच्या पाण्याची व्यवस्था लवकरच केली जाईल. या बरोबरच प्रत्येक दिवशी बैलगाड्यांमधील कापूस खरेदी करण्याबाबतचाही निर्णय लवकरच घेतला जाईल.