चंद्राकार यांच्या उपस्थितीत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी कृषी. वनविभाग तसेच रेशीम विभागासह सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी हजर होते. प्रारंभी रोजगार हमी योजनेचे येथील उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांची माहिती देऊन पुढील नियोजन केले असल्याचे सांगितले.
जालना जिल्ह्यात जवळपास २४३ ग्रामपंचायतीत ९९१ कामे सुरू असून, त्यात ९ हजार ७५ मजुरांची उपस्थिती आहे. सर्वात जास्त उपस्थिती ही कृषी तसेच वनिकरण विभागात असून, रोपवाटीकेतील रोपांची निगा राखण्यासह अन्य कामांचा समावेश आहे. आता जवळपास प्रत्येक मजुराचे ऑनलाइन बँक खाते असल्याने त्यांना शासनाने ठरवून दिलेला सरसरी २०० रुपये रोज या प्रमाणे मोबदला देण्यात येत असल्याचे परळीकर यांनी सांगितले. वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींची जवळपास ६००पेक्षा अधिकची कामे सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सध्या शेतातील कामे कुठलीच नसल्याने रोजगार हमी योजनेवर ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मजूर येत आहेत. त्यांच्या मागणीनुसार कामे देण्यासाठीचे नियोजन जिल्हा परिषदेने दिलेल्या आराखड्यानुसार करण्यात आले आहे. या आढावा बैठकीस सर्व आवश्यक यंत्रणांचे विभागप्रमुख आणि कर्मचारी हजर होते.
चौकट
वृक्षलागवडीवर भर
रोजगार हमी योजनतून अपूर्ण असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. तसेच माझे गाव सुंदर गाव या योजनेतून गावातील मोकळ्या जागेत जास्तीत जास्त वृक्षलागवड करून पर्यावरण संरक्षणास हातभार लावण्याची गरजही आयुक्त चंद्रकार यांनी या बैठकीत व्यक्त केली. राज्य सरकारची शरद पवार ग्राम समृद्धा योजनेअंतर्गत पशुपालनासह गाय, म्हैस यांच्यासाठी गोठे बांधणे कुक्कुटपालनाला चालना देणे आदी कामे या योजनेतून पूर्ण करता येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.