शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

आता तालुकानिहाय शास्त्रज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:00 IST

जालना जिल्ह्यात बोंड अळीच्या हल्लयाने हैराण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता तालुका निहाय शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय जिल्हास्तरीय आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कृषी अधीक्षक विजय माईनकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात बोंड अळीच्या हल्लयाने हैराण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता तालुका निहाय शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय जिल्हास्तरीय आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कृषी अधीक्षक विजय माईनकर यांनी दिली. दरम्यान हा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनासुार घेण्यात आला.जालना जिल्ह्यात एकूण दोन लाख ९४ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झालेली आहे. पैकी ११३ गावांमध्ये या बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अंदाजित या बोंड अळीमुळे २० हजार २०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे शेतकºयांनी घाबरून जाता ज्या कपाशीच्या झाडात या बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसतो ते फूल खोडून टाकण्याचे आवाहन कृषी विभागा कडून करण्यात येत आहे. जेणेकरून त्या अळीची उत्पत्ती वाढ रोखण्यात मोठी मदत होणार आहे.यासाठी नेमके काय केले पाहिजे यासाठी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून खरपूडी येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच बदनापूर येथील कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येणार येणार आहे. शास्त्रज्ञांप्रमाणे कृषी महाविद्यालयातील जवळपास २०० पेक्षा अधिक विद्यार्थी थेट बांधावर भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीस कृषी विस्तार अधिकारी हरिश्चंद्र झनझन, प्रा. अजय मिटकरी यांचीही उपस्थिती होती असे माईनकर यांनी नमूद केले.युरियाचा वापर कमी करासध्या पाऊस पडून गेल्याने बहुतांश शेतकरी हे पिकांना युरिया देण्यासाठी लगबग करत आहे. मात्र युरियामुळे रसशोषण किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे शेतक-यांनी युरीयाचा कमीत कमी वापर करावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे याची गंभीर दखल शेतक-यांनी घ्यावी असे आवाहनही त्यावेळी करण्यात आले. एकूणच बोंड अळीमुळे शेतकरी आणि प्रशासन हादरले आहे.बोंड अळीपासून कपशीचे रक्षण कसे करावे यासाठी कृषी विभागाने माहिती पत्रक काढले आहे. हे जवळपास एक हजार शेतक-यांपर्यंत पोहोचविले असल्याची माहिती कृषी अधीक्षक माईनकर यांनी दिली आहे. तसेच गावागावात मोठे पोस्टर लावूनही जाणीव जागृती करण्यात येत आहे.

टॅग्स :cottonकापूसscienceविज्ञान