शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 01:05 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत बुधवारी देशभरात प्लास्टिक कचरा संकलनासाठी महाश्रमदान करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र शासनाच्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत बुधवारी देशभरात प्लास्टिक कचरा संकलनासाठी महाश्रमदान करण्यात आले. या अभियानाला जिल्ह्यातून ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक गावांमध्ये प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. तर काही ग्रामपंचायतींनी प्लास्टिक वापरणा-या दुकानदारांना नोटिसा बजावल्या.११ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान जिल्हास्तरावर राबविण्याचे निर्देश शासनाने दिले होते. या कालावधीत गावात स्वच्छता शपथ घेणे, गाव पातळीवर निर्माण होणा-या प्लास्टिक कच-याचे योग्य पद्धतीने निर्मूलन करणे आदी बाबी करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतस्तरावर तीन टप्प्यांत या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली.बुधवारी जिल्ह्यातील ७७९ ग्रामपंचायतींमध्ये गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी स्वच्छतेची शपथ घेऊन सार्वजनिक ठिकाणी पडलेला प्लास्टिक कचरा महाश्रमदानाद्वारे संकलित करून त्याचे वर्गीकरण करण्यात आले. यात महिला बचत गट, युवक मंडळ, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. के. नंदनवनकर यांनी घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव व रांजणी येथे प्लास्टिक कचरा मुक्त कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी ग्रामस्थांना कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले.काटखेडा व रांजणी येथील ग्रामपंचायतींना सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजल मशीन बसविण्यात आल्या आहे. आणखी काही ग्रामपंचायतींना हे मशीन देण्यात येणार असून, तालुका व गावनिहाय कार्यक्रम राबविण्यासाठी संपर्क अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जामखेड, देवीदहे, राजूर, माहोरा येथे प्लास्टिक वापरणा-या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती स्वच्छ भारत मिशन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

 

 

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानgovernment schemeसरकारी योजना