शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

निवडणुकीची चिंता नाही, दुष्काळग्रस्तांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:53 IST

सामान्य माणसाला पिण्याचे पाणी, जनावरांना चारा मिळाला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आम्हाला यंदा लोकसभा निवडणुकीची चिंता नाही, ती आम्ही जिंकणारच आहोत. मात्र आम्हाला मराठवाड्यातील दुष्काळाची चिंता आहे. सामान्य माणसाला पिण्याचे पाणी, जनावरांना चारा मिळाला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर  बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्याची कामे कार्यकर्त्यांनी करायला हवीत. मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपल्या सरकारने गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिण्याच्या पाण्याच्या योजना, सिंचन विषयक कामे, मराठवाडा ग्रीड आदी क्षेत्रात भरीव कामे केलेली आहेत.जालना आणि औरंगाबादमधुन जाणारा समृद्धी हायवे त्यामुळे या भागात होणारी औद्योगिक प्रगती यामुळे जालना- औरंगाबाद हे उद्योगाचे केंद्र तयार होणार आहे. ही कामे कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेपर्यंत पोहोचविण्याण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन देविदास देशमुख यांनी केले.यावेळी भाजप, शिवसेना युतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवारी मामाचौकामधून शक्तीप्रदर्शन करत दानवेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला.रावसाहेब दानवे : जालना- औरंगाबाद मेट्रोने जोडणारजालना आणि औरंगाबाद ही लवकरच जुळी शहर होणार आहेत. औद्योगिक विकासामुळे शेंद्रा आणि जालन्यातील अंतर हे केवळ ४० किलोमीटर एवढेच अंतर राहिले आहे. त्यामुळे आगामी काळात या शहरांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून मेट्रोने जोडण्याचे आपले ध्येय आहे.गेल्या पाच वर्षात जालना जिल्ह्याच्या विकासासाठी हजारो कोटी रूपये आणल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवेंनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली.युतीचा धर्म पाळणार - अर्जुन खोतकरमध्यंतरी माझ्यात आणि रावसाहेब दानवेंमध्ये काही मुद्यावरून मतभेद होते, परंतु मनभेद नव्हते. आमच्या दोघांमध्ये वाद व्हावा, हे विरोधकांना हवेच होते. परंतु कुठे थांबायचे हे आपल्याला कळते. त्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम असतो, त्यांनी युतीधर्म पाळण्याचे सांगितले, अन् आपण दानवेंसोबत पूर्ण ताकदीनिशी उभे राहणार असल्याचा विश्वास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.आठवलेंकडून काँग्रेस लक्ष्यप्रारंभी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत कविता सादर केल्या. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी डॉ. बाबासाहेबांनी यापूर्वीच सांगितले आहे की, काँग्रेस हे जळते घर आहे. त्यामुळेच काँग्रेसने त्यांना दोन्ही निवडणुकीत पराभूत करण्यासाठी मदत केली होती. मला देखील शिर्डी मतदार संघात असाच दगा दिल्याचे आठवले म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकChief Ministerमुख्यमंत्रीraosaheb danveरावसाहेब दानवे