शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

निवडणुकीची चिंता नाही, दुष्काळग्रस्तांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:53 IST

सामान्य माणसाला पिण्याचे पाणी, जनावरांना चारा मिळाला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आम्हाला यंदा लोकसभा निवडणुकीची चिंता नाही, ती आम्ही जिंकणारच आहोत. मात्र आम्हाला मराठवाड्यातील दुष्काळाची चिंता आहे. सामान्य माणसाला पिण्याचे पाणी, जनावरांना चारा मिळाला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर  बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्याची कामे कार्यकर्त्यांनी करायला हवीत. मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपल्या सरकारने गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिण्याच्या पाण्याच्या योजना, सिंचन विषयक कामे, मराठवाडा ग्रीड आदी क्षेत्रात भरीव कामे केलेली आहेत.जालना आणि औरंगाबादमधुन जाणारा समृद्धी हायवे त्यामुळे या भागात होणारी औद्योगिक प्रगती यामुळे जालना- औरंगाबाद हे उद्योगाचे केंद्र तयार होणार आहे. ही कामे कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेपर्यंत पोहोचविण्याण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन देविदास देशमुख यांनी केले.यावेळी भाजप, शिवसेना युतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवारी मामाचौकामधून शक्तीप्रदर्शन करत दानवेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला.रावसाहेब दानवे : जालना- औरंगाबाद मेट्रोने जोडणारजालना आणि औरंगाबाद ही लवकरच जुळी शहर होणार आहेत. औद्योगिक विकासामुळे शेंद्रा आणि जालन्यातील अंतर हे केवळ ४० किलोमीटर एवढेच अंतर राहिले आहे. त्यामुळे आगामी काळात या शहरांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून मेट्रोने जोडण्याचे आपले ध्येय आहे.गेल्या पाच वर्षात जालना जिल्ह्याच्या विकासासाठी हजारो कोटी रूपये आणल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवेंनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली.युतीचा धर्म पाळणार - अर्जुन खोतकरमध्यंतरी माझ्यात आणि रावसाहेब दानवेंमध्ये काही मुद्यावरून मतभेद होते, परंतु मनभेद नव्हते. आमच्या दोघांमध्ये वाद व्हावा, हे विरोधकांना हवेच होते. परंतु कुठे थांबायचे हे आपल्याला कळते. त्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम असतो, त्यांनी युतीधर्म पाळण्याचे सांगितले, अन् आपण दानवेंसोबत पूर्ण ताकदीनिशी उभे राहणार असल्याचा विश्वास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.आठवलेंकडून काँग्रेस लक्ष्यप्रारंभी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत कविता सादर केल्या. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी डॉ. बाबासाहेबांनी यापूर्वीच सांगितले आहे की, काँग्रेस हे जळते घर आहे. त्यामुळेच काँग्रेसने त्यांना दोन्ही निवडणुकीत पराभूत करण्यासाठी मदत केली होती. मला देखील शिर्डी मतदार संघात असाच दगा दिल्याचे आठवले म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकChief Ministerमुख्यमंत्रीraosaheb danveरावसाहेब दानवे