शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जालना लोकसभेसाठी बाहेरचा उमेदवार नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:38 IST

लोकसभेच्या निवडणुका अद्याप सहा महिने दूर असल्यानतरी सर्वच राजकीय पक्षांकडून आतापासूनच उमेदवारांची चाचपणी करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभेच्या निवडणुका अद्याप सहा महिने दूर असल्यानतरी सर्वच राजकीय पक्षांकडून आतापासूनच उमेदवारांची चाचपणी करत आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरूवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी थेट भूमिका घेत काँग्रेसला यंदा जालना लोकसभा मतदारसंघात पोषक वातावरण असून, सरकारच्या धोरणांवर जनता प्रचंड नाराज आहे. त्यामुळे काँग्रेसमधीलच उमेदवाराला प्राधान्य देऊन यावेळी बाहेरील उमेदवार लादू नये असे स्पष्ट मत बैठकीत व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान कैलास गोरंट्याल यांच्या या वक्तव्याचे दुहेरी अर्थ निघत आहेत. बाहेरील उमेदवार म्हणजे जालना जिल्ह्याबाहेरील का काँग्रेस पक्षाबाहेरील या बबतचा संभ्रम अद्याप कायम असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू आहे.या बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विमलताई आगलावे, ज्ञानेश्वर भांदरगे, माजी आ. धोडींराम राठोड, माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी राजेश राठोड आदींसह अन्य काँग्रेस नत्यांची उपस्थिती होती. जालना लोकसभेचा १९९९ पासूनचा विचार केल्यास खा.रावसाहेब दानवे यांच्य विरूध्द १९९९ मध्ये ज्ञानदेव बांगर हे होते, २००४ मध्ये माजी खा. उत्तमसिंग पवार तर २००९ मध्ये कल्याण काळे यांनी निवडणुक लढवली होती. त्यांनी प्रचंड ताकद लावून दानवेंचे मताधिक्य ८ हजारांवर आणले होते. २०१४ मध्ये देखील औरंगाबाद येथील विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी मोदी लाटेवर स्वार होत, रावसाहेब दानवे यांनी थेट दोन लाखाच्या मताधिक्याने विजय मिळविला होता.ज्ञानदेव बांगर वगळता अन्य तीनही निवडणुकीत दानवेंविरूध्द अन्य जिल्ह्यातील म्हणजेच औरंगाबाद येथील उमेदवारांना उमेदवारी दिली होती. परंतु ते जालना लोकसभा मतदार संघातीलच होते.निवडणुकांच्या तयारीला आला वेगमुंबईतील टिळक भवनमध्ये मराठवाड्यातील लोकसभेच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी जालना लोकसभा मतदार संघातून यंदा लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली. त्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव बांगर, डॉ.संजय लाखे पाटील, राजाभाऊ देशमुख, भीमराव डोंगरे, सत्संग मुंडे, यांनी तयारी दर्शविली. यावेळी २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविणारे कल्याण काळे यांनी मात्र यंदा लोकसभा निवडणुक लढविण्यास नकार दिला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. रावसाहेब दानवे यांनी सलग चारवेळेस जालना लोकसभा मतदार संघातून विजय संपादन केला आहे. त्यामुळे त्यांच्या पाचव्या टर्मला त्यांच्या विरोधात नेमका कोणता उमेदार रिंगणात उतरणार आहे, या बाबत आतापासूनच तर्कवितर्क लावले जात आहेत. दानवेंचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधकांना तगड्या उमेदवाराला निवडणुक रिंंगणात उतरविण्याची गणिते जुळविण्याची गरज आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस