शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जालना लोकसभेसाठी बाहेरचा उमेदवार नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:38 IST

लोकसभेच्या निवडणुका अद्याप सहा महिने दूर असल्यानतरी सर्वच राजकीय पक्षांकडून आतापासूनच उमेदवारांची चाचपणी करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभेच्या निवडणुका अद्याप सहा महिने दूर असल्यानतरी सर्वच राजकीय पक्षांकडून आतापासूनच उमेदवारांची चाचपणी करत आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरूवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी थेट भूमिका घेत काँग्रेसला यंदा जालना लोकसभा मतदारसंघात पोषक वातावरण असून, सरकारच्या धोरणांवर जनता प्रचंड नाराज आहे. त्यामुळे काँग्रेसमधीलच उमेदवाराला प्राधान्य देऊन यावेळी बाहेरील उमेदवार लादू नये असे स्पष्ट मत बैठकीत व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान कैलास गोरंट्याल यांच्या या वक्तव्याचे दुहेरी अर्थ निघत आहेत. बाहेरील उमेदवार म्हणजे जालना जिल्ह्याबाहेरील का काँग्रेस पक्षाबाहेरील या बबतचा संभ्रम अद्याप कायम असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू आहे.या बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विमलताई आगलावे, ज्ञानेश्वर भांदरगे, माजी आ. धोडींराम राठोड, माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी राजेश राठोड आदींसह अन्य काँग्रेस नत्यांची उपस्थिती होती. जालना लोकसभेचा १९९९ पासूनचा विचार केल्यास खा.रावसाहेब दानवे यांच्य विरूध्द १९९९ मध्ये ज्ञानदेव बांगर हे होते, २००४ मध्ये माजी खा. उत्तमसिंग पवार तर २००९ मध्ये कल्याण काळे यांनी निवडणुक लढवली होती. त्यांनी प्रचंड ताकद लावून दानवेंचे मताधिक्य ८ हजारांवर आणले होते. २०१४ मध्ये देखील औरंगाबाद येथील विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी मोदी लाटेवर स्वार होत, रावसाहेब दानवे यांनी थेट दोन लाखाच्या मताधिक्याने विजय मिळविला होता.ज्ञानदेव बांगर वगळता अन्य तीनही निवडणुकीत दानवेंविरूध्द अन्य जिल्ह्यातील म्हणजेच औरंगाबाद येथील उमेदवारांना उमेदवारी दिली होती. परंतु ते जालना लोकसभा मतदार संघातीलच होते.निवडणुकांच्या तयारीला आला वेगमुंबईतील टिळक भवनमध्ये मराठवाड्यातील लोकसभेच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी जालना लोकसभा मतदार संघातून यंदा लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली. त्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव बांगर, डॉ.संजय लाखे पाटील, राजाभाऊ देशमुख, भीमराव डोंगरे, सत्संग मुंडे, यांनी तयारी दर्शविली. यावेळी २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविणारे कल्याण काळे यांनी मात्र यंदा लोकसभा निवडणुक लढविण्यास नकार दिला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. रावसाहेब दानवे यांनी सलग चारवेळेस जालना लोकसभा मतदार संघातून विजय संपादन केला आहे. त्यामुळे त्यांच्या पाचव्या टर्मला त्यांच्या विरोधात नेमका कोणता उमेदार रिंगणात उतरणार आहे, या बाबत आतापासूनच तर्कवितर्क लावले जात आहेत. दानवेंचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधकांना तगड्या उमेदवाराला निवडणुक रिंंगणात उतरविण्याची गणिते जुळविण्याची गरज आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस