शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

धुवाँधार, मुसळधार, संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:56 IST

गेल्या वीस दिवसानंतर जिल्ह्यात पावसाने गुरूवारी जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जालना : गेल्या वीस दिवसानंतर जिल्ह्यात पावसाने गुरूवारी जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पिके माना टाकू लगले असतानाच हा दमदार पाऊस पडल्याने या पिकांना जीवनदान मिळणार आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटले आहेत. मात्र गुरूवारी प्रथमच नदी-नाले ओथंबून वाहिले.गुरूवारी पहाटेपासूनच दमदार पावसाचे पुनरागमन झाल्याने जालनेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जालना शहरासह आठही तालुक्यात या पावसाची सर्वदूर हजेरी असल्याने संपूर्ण जिल्हा ओलाचिंब झाला होता. गुरूवारी जालनेकरांना सूर्यदर्शनही झाले नाही. कधी हलका तर कधी मुसळधार पाऊस बरसल्याने संपूर्ण वातावरणात गारवा निर्माण झाला होता.जालन्यातील कुंडलिका नदीवर असलेल्या रामतीर्थ बंधारा पूर्णक्षमतेने भरल्याने भरून वाहिला. तर नदीलाही पूर आला होता.जालन्यातील अनेक सखल भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. जालना शहरासह परतूर, भोकरदन, अंबड, कुंभारपिंपळगाव, घनसावंगी, तीर्थपूरी, बदनापूर, जाफराबाद तसेच मंठा तालुक्यातही दमदार पावसाने हजेरी लावली होती. केदारखेडा परिसरातही मुसळधार पाऊस झाला, राजूर, दाभाडी, टेंभूणी हसनाबाद, वाटूरफाटा, वीरेगाव, रामनगर आदी गावांमध्येही गुरूवारी जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, या पावसामुळे पिकांप्रमाणेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. जिल्ह्यात सध्या ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ही टँकरची संख्या आता कमी होणारआहे.

टॅग्स :RainपाऊसJalanaजालना