शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

धुवाँधार, मुसळधार, संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:56 IST

गेल्या वीस दिवसानंतर जिल्ह्यात पावसाने गुरूवारी जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जालना : गेल्या वीस दिवसानंतर जिल्ह्यात पावसाने गुरूवारी जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पिके माना टाकू लगले असतानाच हा दमदार पाऊस पडल्याने या पिकांना जीवनदान मिळणार आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटले आहेत. मात्र गुरूवारी प्रथमच नदी-नाले ओथंबून वाहिले.गुरूवारी पहाटेपासूनच दमदार पावसाचे पुनरागमन झाल्याने जालनेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जालना शहरासह आठही तालुक्यात या पावसाची सर्वदूर हजेरी असल्याने संपूर्ण जिल्हा ओलाचिंब झाला होता. गुरूवारी जालनेकरांना सूर्यदर्शनही झाले नाही. कधी हलका तर कधी मुसळधार पाऊस बरसल्याने संपूर्ण वातावरणात गारवा निर्माण झाला होता.जालन्यातील कुंडलिका नदीवर असलेल्या रामतीर्थ बंधारा पूर्णक्षमतेने भरल्याने भरून वाहिला. तर नदीलाही पूर आला होता.जालन्यातील अनेक सखल भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. जालना शहरासह परतूर, भोकरदन, अंबड, कुंभारपिंपळगाव, घनसावंगी, तीर्थपूरी, बदनापूर, जाफराबाद तसेच मंठा तालुक्यातही दमदार पावसाने हजेरी लावली होती. केदारखेडा परिसरातही मुसळधार पाऊस झाला, राजूर, दाभाडी, टेंभूणी हसनाबाद, वाटूरफाटा, वीरेगाव, रामनगर आदी गावांमध्येही गुरूवारी जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, या पावसामुळे पिकांप्रमाणेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. जिल्ह्यात सध्या ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ही टँकरची संख्या आता कमी होणारआहे.

टॅग्स :RainपाऊसJalanaजालना