शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
2
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
3
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
4
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
5
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
6
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
7
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
8
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
9
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
10
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
11
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
12
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
13
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
14
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
15
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
16
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
17
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
18
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
19
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
20
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण

पिकांवर नवे संकट ! बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 11:30 IST

डिसेंबरपूर्वी सर्व कापसाची वेचणी करणे गरजेचे

ठळक मुद्देकामगंध सापळे ठरतील संजीवनी 

जालना : जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून बोंडअळीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळपास ४० टक्के क्षेत्र या अळीने व्यापले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. 

यावर उपाय करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुचिवले आहेत. त्यात प्रामुख्याने कामगंध सापळे लावणे, फरदड कापूस न वेचणे, तसेच डिसेंबरपूर्वी सर्व कापसाची वेचणी करणे गरजेचे असल्याचे  कपाशी विषयाच्या तज्ज्ञांनी नमूद केेले आहे. जिल्ह्यात यंदा जवळपास तीन लाख १० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली आहे. आता कापूस वेचणी होऊन अनेक शेतकऱ्यांचा कापूस बाजारात दाखल झाला आहे. अनेक शेतकरी आता मिळेल त्या दराने कापासाची विक्री करताना दिसून येत आहेत. अद्याप बहुतांश शेतकऱ्यांची कापूस वेचणी शिल्लक आहे. त्यामुळे ती त्यांनी तातडीने करून बोंड अळीपासून बचाव करणे शक्य होणार आहे. 

जिल्ह्यात यापूर्वी २०१६ मध्ये बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर हल्ला चढवून ८० टक्के कपाशीचे नुकसान झाले होते. याहीवेळी तशीच अवस्था असून, आजघडीला ४० टक्के क्षेत्र प्रभावित झाले आहे, यात गुणोत्तर पद्धतीने वाढ होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या हंगामाचा विचार न करता, पुढील वर्षाचा विचार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकरी थेट फेब्रुवारीपर्यंत कापसाची वेचणी करून तो विक्री करतात; परंतु हे आता धोकादायक ठरू शकते. आजही शेतकऱ्यांनी जो कापूस बाजारात आणला आहे, त्यातही काही प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही गंभीर बाब असून, या बाेंडअळीची  जनन साखळी तोडण्यासाठी खबरदारी हाच एक ठोस पर्याय असल्याचे सांगण्यात आले. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कापूस उत्पादकांनी उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कामगंध सापळे ठरतील संजीवनी जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी ज्यावेळी बोंडअळीने थैमान घातले होते. त्यावेळी सर्वात मोठी भूमिका ही कामगंध सापळ्यांनी निभावली होती. आता ही वेळ निघून गेली असली तरी, शेतकऱ्यांनी आहे त्या कपाशीची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी, तसेच शेतात असलेल्या पऱ्हाटीच्या झाडांचा भुसा करून  त्यापासून खताचे उत्पादन घेता येईल. यासाठी कृषी विज्ञान केंद्राने जालना तालुक्यातील वखारी आणि बदनापूर तालुक्यातील वानडगाव येथे लावलेले कामगंध सापळे यशस्वी झाले आहेत. आतापर्यंत जवळपास दोन लाख कामगंध सापळे लावण्यात आले होते. -अजय मिटकरी, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी