शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नंदापूर ठरतेय विकासाचे रोल मॉडेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:00 IST

आदर्श ग्रामसंसद योजनेत जालना तालुक्यातील नंदापूर गाव राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दत्तक घेऊन गत अडीच वर्षांत जलयुक्त शिवार, आमदार निधी आणि जिल्हा परिषदेतील विविध योजनांच्या माध्यमातून मुलभूत सुविधांसह विकास कामे सुरु केली आहेत. २०१९ पर्यंत बहुतांश कामे पूर्ण केली जाणार असल्याचा दावा खोतकर यांनी केला.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आदर्श ग्रामसंसद योजनेत जालना तालुक्यातील नंदापूर गाव राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दत्तक घेऊन गत अडीच वर्षांत जलयुक्त शिवार, आमदार निधी आणि जिल्हा परिषदेतील विविध योजनांच्या माध्यमातून मुलभूत सुविधांसह विकास कामे सुरु केली आहेत. २०१९ पर्यंत बहुतांश कामे पूर्ण केली जाणार असल्याचा दावा खोतकर यांनी केला.जालना तालुक्यातील द्राक्ष पंढरी म्हणून उदयास येत असलेल्या कडवंची गावाजवळ नंदापूर हे गाव असून, या गावात पूर्वी मूलभूत सुविधा योग्य त्या प्रमाणात नव्हत्या. महामार्गाशी संलग्न असलेल्या या गावात आता द्राक्षाची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामविकास हा केंद्रबिंदू ठेवून राज्यमंत्री खोतकर यांनी नंदापूर या गावाची आदर्श ग्रामसंसद योजनेसाठी निवड केली. गत अडीच वर्षांत जलयुक्त शिवार योजनेतून ३० लाख रुपये खर्चांचे सिमेंट बंधारे आणि २० लाख रुपये खर्चाचे नदी-नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. तसेच दहा लाख रुपये खर्चाचे सामाजिक सभागृह, १० लाख रुपये खर्चाचे दलित वस्ती योजनेतून सिमेंट रस्ते बांधले आहेत.तर ग्रामपंचायत कार्यालयासाठी १२ रुपये खर्चाची इमारत, राष्ट्रीय पेयजल योजनेतून ५० लाख रुपये खर्चाचे काम आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून ५ कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या थार-नंदापूर-अंभोरेवाडी-कडवंची या मार्गाचे काम मंजूर झाले आहे. सदरील कामे आगामी दोन महिन्यांत सुरु होतील, अशी माहिती सरपंच दत्तात्रय भानुदास चव्हाण यांनी सांगितले.विधानसभा मतदार संघातील एक गाव आदर्श संसद योजनेसाठी निवडायचे होते. नजरेसमोर अनेक गावे होती. मात्र, नंदापूर हे गाव सर्वच बाबतीत विकासात तुलनेने मागे होते. या गावातील अनेक शेतकरी प्रगतीशील आहेत. या गावात इतर मूलभूत सुविधांसह आवश्यक ती कामे सुरू झालेली आहे. लवकरच ती पूर्ण होतील. तर विकासाच्या दृष्टीने रस्त्यांची सुविधा आवश्यक होती. यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून पाच कोटी रुपये खर्चाचा रस्ता मंजूर झाला आहे. याचे काम लवकरच सुरु केले जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतgovernment schemeसरकारी योजना