शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

नंदापूर ठरतेय विकासाचे रोल मॉडेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:00 IST

आदर्श ग्रामसंसद योजनेत जालना तालुक्यातील नंदापूर गाव राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दत्तक घेऊन गत अडीच वर्षांत जलयुक्त शिवार, आमदार निधी आणि जिल्हा परिषदेतील विविध योजनांच्या माध्यमातून मुलभूत सुविधांसह विकास कामे सुरु केली आहेत. २०१९ पर्यंत बहुतांश कामे पूर्ण केली जाणार असल्याचा दावा खोतकर यांनी केला.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आदर्श ग्रामसंसद योजनेत जालना तालुक्यातील नंदापूर गाव राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दत्तक घेऊन गत अडीच वर्षांत जलयुक्त शिवार, आमदार निधी आणि जिल्हा परिषदेतील विविध योजनांच्या माध्यमातून मुलभूत सुविधांसह विकास कामे सुरु केली आहेत. २०१९ पर्यंत बहुतांश कामे पूर्ण केली जाणार असल्याचा दावा खोतकर यांनी केला.जालना तालुक्यातील द्राक्ष पंढरी म्हणून उदयास येत असलेल्या कडवंची गावाजवळ नंदापूर हे गाव असून, या गावात पूर्वी मूलभूत सुविधा योग्य त्या प्रमाणात नव्हत्या. महामार्गाशी संलग्न असलेल्या या गावात आता द्राक्षाची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामविकास हा केंद्रबिंदू ठेवून राज्यमंत्री खोतकर यांनी नंदापूर या गावाची आदर्श ग्रामसंसद योजनेसाठी निवड केली. गत अडीच वर्षांत जलयुक्त शिवार योजनेतून ३० लाख रुपये खर्चांचे सिमेंट बंधारे आणि २० लाख रुपये खर्चाचे नदी-नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. तसेच दहा लाख रुपये खर्चाचे सामाजिक सभागृह, १० लाख रुपये खर्चाचे दलित वस्ती योजनेतून सिमेंट रस्ते बांधले आहेत.तर ग्रामपंचायत कार्यालयासाठी १२ रुपये खर्चाची इमारत, राष्ट्रीय पेयजल योजनेतून ५० लाख रुपये खर्चाचे काम आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून ५ कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या थार-नंदापूर-अंभोरेवाडी-कडवंची या मार्गाचे काम मंजूर झाले आहे. सदरील कामे आगामी दोन महिन्यांत सुरु होतील, अशी माहिती सरपंच दत्तात्रय भानुदास चव्हाण यांनी सांगितले.विधानसभा मतदार संघातील एक गाव आदर्श संसद योजनेसाठी निवडायचे होते. नजरेसमोर अनेक गावे होती. मात्र, नंदापूर हे गाव सर्वच बाबतीत विकासात तुलनेने मागे होते. या गावातील अनेक शेतकरी प्रगतीशील आहेत. या गावात इतर मूलभूत सुविधांसह आवश्यक ती कामे सुरू झालेली आहे. लवकरच ती पूर्ण होतील. तर विकासाच्या दृष्टीने रस्त्यांची सुविधा आवश्यक होती. यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून पाच कोटी रुपये खर्चाचा रस्ता मंजूर झाला आहे. याचे काम लवकरच सुरु केले जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतgovernment schemeसरकारी योजना