शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीमुळे तीर्थपुरीतील विकासकामाला येणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST

गाव असो की शहर, राजकीय पुढारी आणि अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर विकासाचा मार्ग खुला होतो. त्यात राज्याचे आरोग्यमंत्री तथा ...

गाव असो की शहर, राजकीय पुढारी आणि अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर विकासाचा मार्ग खुला होतो. त्यात राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्यासारख्या नेतृत्वाची साथ मिळाली तर विकासाला गती येते. विकासाभिमुख नेतृत्व असलेले पालकमंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून आणि सहकार्याने तीर्थपुरी (ता.घनसावंगी) येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार, सरपंच शैलेंद्र पवार यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. नगरपंचायत रूपांतराची ही प्रक्रिया शासनस्तरावर सुरू असून, नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर तीर्थपुरीच्या विकासाला मोठी गती येणार आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे. टोपे यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावला. कारखान्यामुळे अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. कोरोनाच्या लढाईत कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणून जबाबदारी सांभाळणे आणि राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी अहोरात्र धडपड करणारे राजेश टोपे! आईच्या निधनानंतर सर्व विधी केवळ तीन दिवसांमध्ये पूर्ण करून राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला कोरोनाकाळात आधार देण्यासाठी काम सुरू केले. विकासाभिमुख नेतृत्व असलेले राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार्यातून तीर्थपुरी ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. ग्रामपंचायतस्तरावर सध्या ४० एलपीसीडी पाणी मिळते. नगरपंचायत झाल्यानंतर तब्बल १३५ एलपीसीडी पाणी मिळणार आहे. ग्रामपंचायतस्तरावर घरकुल योजनेसाठी सध्या १.२० लाख रुपये मिळतात तर नगरपंचायत झाल्यानंतर २.५० लाख रुपये अनुदान मिळणार आहे. नगरपंचायतीच्या जागेत तीन वर्षांपेक्षा जास्त काळ अतिक्रमण केलेल्यांना किंवा त्या जागेचा कर भरलेल्यांना मुख्याधिकारी यांच्या अधिकारात भोगवटदार-२ म्हणून ती जागा प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देता येते. अनुसूचित जाती व जमातीमधील नागरिकांना ५०० चौरस फुटापर्यंत जागा मोफत देता येते. सर्वसाधारण प्रवर्गातील गोरगरकबांना पक्क्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविता येते. बांधकाम परवाना काढण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे न मारता मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून बांधकाम परवाना मिळू शकतो. नगरपंचायतीच्या ठिकाणी २४ तास कार्यरत असलेला स्वतंत्र अग्निशमन विभाग अग्निशमन वाहन, कर्मचाऱ्यांसह कार्यरत ठेवता येतो. कोणत्याही अनुचित घटनेला सामोरे जाण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन व्यवस्था विभागही नगरपंचायतीमध्ये उपलब्ध होतो.

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत महिला बचत गटांना १० लाखांपर्यंत अल्पव्याजी मदत करता येते. हातगाडी/ढकलगाडीच्या माध्यमातून छोटे-छोटे व्यवसाय करणाऱ्यांसाठी २० हजारांपर्यंत बिनव्याजी अनुदान मिळू शकणार आहे. नगरपंचायतस्तरावर गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी गोरगरिबांना शौचालय बांधता यावे म्हणून १७ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. जिल्हा नियोजन समिती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार अभियान यांच्यासह विविध योजनांच्या माध्यमांतून वैशिष्ट्यपूर्ण योजना राबविण्यासाठी तसेच रस्ते, गटारांच्या कामांसाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद शासनस्तरावरून करण्यात येते. गावाचा रोल मॉडेल ठरवणाऱ्या विविध वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवण्यासाठीही शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळविता येतो. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निधीच्या उपलब्धतेअभावी पगार वेळेवर मिळत नाही. नगरपंचायत झाल्यावर सर्व कर्मचाऱ्यांचा पगार शासनाकडून होतो आणि तो वेळेवर मिळतो. नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यावर शहरामध्ये पोलीस ठाणे, शेती/जमीन खरेदी, विक्रीसाठीचे दस्त-नोंदणी कार्यालये सुरू होवू शकतात. शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारी विकास योजना राबविणे आणि त्याचे प्राधान्यक्रम ठरवणे हे सर्व अधिकार नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर त्यांच्या सभागृहाला मिळतात. त्यामुळे शहराचा सर्वांगीण आणि संतुलित विकास होण्यासाठी आणि त्या निवड आणि नियंत्रण प्रक्रियेमध्ये आणि निश्चित करण्याच्या प्रक्रियेमध्ये नागरिकांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष सहभाग नोंदविता येतो. स्वच्छतेसाठी तसेच पाणीपुरवठा या दोन अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी १५ व्या वित्त आयोगातून कोट्यवधी रुपयांचे अनुदान नगरपंचायतीस मिळू शकते.

चौकट

विकासक्रम निश्चित करण्याचे अधिकार स्थानिक सदस्यांना

शहराच्या विकासाचे क्रम निश्चित करण्याचे अधिकार हे स्थानिक पातळीवरील सदस्यांनाच प्राप्त होतात. त्यामुळे ग्रामपंचायत तीर्थपुरीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यास निश्चितच नागरिकांना मूलभूत सुविधांबरोबरच पायाभूत सुविधा मिळतील. तसेच तीर्थपुरी परिसरात पाण्याचे प्रमाण मुबलक असल्याने व दळणवळणाच्या दृष्टीने तीर्थपुरी शहर केंद्रस्थानी असल्याने येथे औद्योगिक वसाहत उभारण्यास वाव आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.