शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:32 IST

अभंग माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, अशा अभंगांसह विविध गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अभंग माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, अशा अभंगांसह विविध गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पंडित भीमसेन जोशीसंगीत महोत्सवाचे.दर्दी रसिकांनी खचाखच भरलेले सभागृह, वाहवाची दाद आणि उत्स्फूर्त टाळ्यांच्या साथीने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सायंकाळी गायन व वादनाची मेजवानी कानसेन जालनेकरांनी अनुभवली.गायिका भक्ती गुरव हिने राग यमन सादर केला. तसेच या भवनातील गीत पुराणे हे नाट्यगीतही सादर केले. तिला तबल्यावर विनायक चंदन, संवादिनीवर यश खडके व प्रतिक साळुंके या बालकलाकाराने उत्तम साथ दिली. भारत सरकारची सीसीआयटी फेलोशिप प्राप्त गायिका शाश्वती चव्हाण हिने राग बिहाग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शाश्वती चव्हाणने अत्यंत कसदार आवाजात केलेले गायन सर्वांना खूप काळ स्मरणात राहील, असेच होते.गायक सुधीर दाभाडकर यांनी दोन अभंग व राग भूपमधील बंदीश सादर केली. त्यांना तबल्यावर संभाजी तरासे व संवादिनीवर संदीप गुरव यांनी साथ केली. या महोत्सवाचे विशेष आकर्षण असलेले किराणा आणि धारवाड घराण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद रईसखाँ यांनी राग शिवरंजनी सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. या महोत्सवात संस्कृती मंच (जालना) व कलाश्रीसंगीत मंडळ (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने बालाजी नाईक चव्हाण कलाश्री युवा पुरस्कार मराठवाड्यातील संगीत क्षेत्रात कार्यरत नामवंत कलावंतांना शाल, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम रु. ५ हजार देण्याची सुरूवात करण्यात आली व पहिला बालाजी नाईक चव्हाण कलाश्री युवा पुरस्कार औरंगाबाद येथील ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ फेम गायक सचिन नेवपूरकर यांना जालना नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन नार्वेकर यांच्या हस्ते त्यांच्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याची घेतली गेलेली दखल तसेच नव्याने येऊन पडलेली जबाबदारी असे भावोद्गार सत्कारमूर्ती सचिन नेवपूरकर यांनी काढले.

टॅग्स :musicसंगीतartकलाcultureसांस्कृतिकBhimsen Joshiभीमसेन जोशी