शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रुग्णांच्या जिवाशी मुन्नाभार्इंचा खेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:16 IST

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये योग्य वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना गावात येणा-या बोगस डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागत आहेत.

जालना : ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये योग्य वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना गावात येणा-या बोगस डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागत आहेत. कुठलीही वैद्यकीय पदवी नसणारे हे मुन्नाभाई केवळ अनुभवाच्या आधारे रुग्णांवर उपचार करून रुग्णांच्या जिवाशी खेळत आहेत. या प्रकाराकडे आरोग्य विभागाने कानाडोळा केला आहे.डॉक्टर हे परमेश्वराचे रूप आहे, असे मानून सर्वसामान्य व्यक्ती विश्वासाने डॉक्टरांकडून उपचार घेतात. डॉक्टर जे देईल, ते औषध घेतात. परंतु बोगस डॉक्टरांकडून घेतलेल्या उपचारांमुळे ग्रामीण भागात अनेकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याचे प्रकार समोर येत आहेत. जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार मिळत नसल्याने या केंद्राच्या आजूबाजूच्या गावांमध्ये बोगस डॉक्टरांचे प्रमाण अधिक आहे. रेवगाव येथील एका डॉक्टरला गुरुवारी तालुका आरोग्य अधिका-यांनी नोटीस बजावल्याचे सूत्रांनी सांगितले. अशीच स्थिती अन्य तालुक्यांमध्येही आहे. कुठलीही अधिकृत वैद्यकीय पदवी नसणारे हे डॉक्टर ग्रामीण भागात हातातील सुटकेसमध्ये काही औषध-गोळ्या, गळ्यात स्टेथॅस्कोप घालून फिरताना दिसतात. ग्रामीण भागातील रुग्णांवर आपली पोळी भाजता येईल, हे ठाऊक असल्याने बोगस डॉक्टर रुग्णांकडून कधी पैसे तर कधी धान्य, भाजीपाला, डाळ इ. साहित्य घेऊन उपचार करतात. मात्र, या बदल्यात केले जाणारे उपचार आपल्या आरोग्यास हितकारक नाही तर अपायकारक आहे याची जाणीव ग्रामीण भागातील नागरिकांना अज्ञानापोटी नसते. परिणामी आरोग्यावर दीर्घकालीन विपरित परिणाम होतात. बाजार गावांमध्ये छोटेसे रुग्णालय थाटून बसणारे काही बोगस डॉक्टर एखादा गंभीर आजाराही आपण बरा करून, असा दावा करतात. या डॉक्टरांच्या खोट्या दाव्यांना बळी पडून काही सुशिक्षित आपल्या आजाराला कंटाळून सारासार विचार न करता अशा बोगस डॉक्टरांच्या नादाला लागतात. मात्र, हे बोगस डॉक्टर रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मूर्ख बनविण्याचे काम करतात. साधा ताप किंवा सर्दी झालेली असेल तरी चार-पाच तपासण्या करून त्यांच्याकडून पैसे उकळतात. वैद्यकीय क्षेत्राचे पुरेसे ज्ञान नसल्याने त्या व्यक्तीला नेमका कोणता आजार जडला आहे, हे ते सांगू शकत नाहीत. अशा वेळी नको ते औषध देऊन वेळकाढूपणा केला जातो. या दरम्यान रुग्णाची प्रकृती खालावल्यानंतर बोगस डॉक्टर रुग्णाला शहरी भागातल्या ओळखीच्या डॉक्टरांचा पत्ता देऊन भरती होण्याचे सांगतात, ही एका प्रकारची साखळी पद्धत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एखाद्या वेळस उपचारास उशीर झाल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने झालेल्या उपचारांमुळे रुग्णाचा मृत्यू होतो. अशा बोगस डॉक्टरांमध्ये वैद्यकीय क्षेत्राबाबत लोकांची विश्वासार्हता ढासळत असून, प्रामाणिकपणे काम करणाºया डॉक्टरांना बसत असून त्यांना नाहक बदनामीला सामोरे जावे लागत आहे.---------------