शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नेहरू रोड, कादराबाद भागातील रहिवाशांना पालिकेच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:59 IST

दोन दिवसांपूर्वी नेहरुरोडसह कादराबाद भागातील रहिवाशांना नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील अत्यंत महत्त्वाची व्यापारपेठ असलेल्या नेहरु रोड आणि कादराबाद भागातील रस्ते रूंद केल्यास त्याचा आणखी लाभ व्यापाऱ्यांना होणार असून, नियमित होणारी वाहतुकीची कोंडी या निमित्ताने दूर होण्यास मदत मिळणार आहे. यासाठी जालना पालिकेने पुढाकार घेतला असून, दोन दिवसांपूर्वी नेहरुरोडसह कादराबाद भागातील रहिवाशांना नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.जालन्यातील मुख्य सराफा बाजारपेठ म्हणून नेहरूरोडची ख्याती आहे. हा रस्ता आताच्या वाढत्या लोकसंख्यमुळे अपुरा पडत आहे. वाढलेली वाहनांची संख्या, पार्किंगचा निर्माण होणारा प्रश्न, वेळावेळी होणारी वाहतूकीची कोंडी यामुळे येथील व्यापारी तसेच खेरदीसाठी आलेले ग्राहकही वैतागले आहेत. यावर उपाय म्हणून या भागाचे मास्टर प्लॅन अर्थात रस्ता रूंदीकरण करण्यासाठीची चर्चा यापूर्वीच विद्यमान केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन केली होती. त्यात काही व्यापा-यांनी याला सकारात्मकता दर्शवली होती, तर काहींनी याला विरोध केला होता.आज शहराची व्याप्ती वाढत असून, शहरात आता नवनवीन संस्था उभारल्या जाणार असल्याने त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लाभ हा जालेकरांनाच होणार आहे.परंतु अन्य शहरांच्या तुलेनेने जालन्यातील बाजाराचा टक्का आणि उलाढाल ही मोठ्या प्रमाणावर आहे. ती पूर्वापार असली तरी, आताची बाजारपेठ ही अपुरी पडत आहे. त्यामुळे अरूंद रस्ते रूंद करून ते दोन पदरी करण्याचा विचार पुढे आला. यामुळे एक सर्वेक्षण म्हणून नागरिकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांना नोटीस पाठविल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.या नोटीसा केवळ एक प्राथमिक पातळीवर उपाय आहे, यात नंतर कोणत्या घराचा किती भाग जाणार आहे, हे मोजणी नंतरच पुढे येणार आहे.ही अतिक्रमण काढण्याची मोहीम नसून, ही रस्ता रूंदीकरणाची मोहीम आहे. त्यात ज्यांच्या घराचा जेवढा परिसर जाईल तेवढा मावेजा त्यांना शासनाच्या प्रचलित नियमानुसार देण्यात येणार आहे. दरम्यान, या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.मास्टर प्लॅनजुना जालना भागात गांधीचमन ते काळी मशीद दरम्यान १९८२ ते १९८८ दरम्यान झाले होते. त्यामुळे आज गांधीचमन ते कचेरीरोड हा रस्ता बराच रूंद आहे. त्यावेळी त्या भागातील नागरिकांना जो मावेजा मिळाला होता, तो अत्यंत कमी होता. परंतु आजचे भाव हे त्यावेळच्या तुलनेने वाढले आहेत. त्यामुळे आजच्या बाजार भावाप्रमाणे नागरिकांना त्यांचा मावेजा मिळू शकतो.आज केवळ नोटीसा बजावल्या असून, त्यावर हरकती, सूचना मागवून नंतर स्वतंत्र आराखडा तयार करून तो राज्य सरकारच्या नगर विकास मंत्रालयाकडे मंजूरीसाठी पाठवण्यात येऊन नंतरच हे रस्ता रूंदीकरण सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदroad transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडी