शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

नेहरू रोड, कादराबाद भागातील रहिवाशांना पालिकेच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:59 IST

दोन दिवसांपूर्वी नेहरुरोडसह कादराबाद भागातील रहिवाशांना नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील अत्यंत महत्त्वाची व्यापारपेठ असलेल्या नेहरु रोड आणि कादराबाद भागातील रस्ते रूंद केल्यास त्याचा आणखी लाभ व्यापाऱ्यांना होणार असून, नियमित होणारी वाहतुकीची कोंडी या निमित्ताने दूर होण्यास मदत मिळणार आहे. यासाठी जालना पालिकेने पुढाकार घेतला असून, दोन दिवसांपूर्वी नेहरुरोडसह कादराबाद भागातील रहिवाशांना नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.जालन्यातील मुख्य सराफा बाजारपेठ म्हणून नेहरूरोडची ख्याती आहे. हा रस्ता आताच्या वाढत्या लोकसंख्यमुळे अपुरा पडत आहे. वाढलेली वाहनांची संख्या, पार्किंगचा निर्माण होणारा प्रश्न, वेळावेळी होणारी वाहतूकीची कोंडी यामुळे येथील व्यापारी तसेच खेरदीसाठी आलेले ग्राहकही वैतागले आहेत. यावर उपाय म्हणून या भागाचे मास्टर प्लॅन अर्थात रस्ता रूंदीकरण करण्यासाठीची चर्चा यापूर्वीच विद्यमान केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन केली होती. त्यात काही व्यापा-यांनी याला सकारात्मकता दर्शवली होती, तर काहींनी याला विरोध केला होता.आज शहराची व्याप्ती वाढत असून, शहरात आता नवनवीन संस्था उभारल्या जाणार असल्याने त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लाभ हा जालेकरांनाच होणार आहे.परंतु अन्य शहरांच्या तुलेनेने जालन्यातील बाजाराचा टक्का आणि उलाढाल ही मोठ्या प्रमाणावर आहे. ती पूर्वापार असली तरी, आताची बाजारपेठ ही अपुरी पडत आहे. त्यामुळे अरूंद रस्ते रूंद करून ते दोन पदरी करण्याचा विचार पुढे आला. यामुळे एक सर्वेक्षण म्हणून नागरिकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांना नोटीस पाठविल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.या नोटीसा केवळ एक प्राथमिक पातळीवर उपाय आहे, यात नंतर कोणत्या घराचा किती भाग जाणार आहे, हे मोजणी नंतरच पुढे येणार आहे.ही अतिक्रमण काढण्याची मोहीम नसून, ही रस्ता रूंदीकरणाची मोहीम आहे. त्यात ज्यांच्या घराचा जेवढा परिसर जाईल तेवढा मावेजा त्यांना शासनाच्या प्रचलित नियमानुसार देण्यात येणार आहे. दरम्यान, या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.मास्टर प्लॅनजुना जालना भागात गांधीचमन ते काळी मशीद दरम्यान १९८२ ते १९८८ दरम्यान झाले होते. त्यामुळे आज गांधीचमन ते कचेरीरोड हा रस्ता बराच रूंद आहे. त्यावेळी त्या भागातील नागरिकांना जो मावेजा मिळाला होता, तो अत्यंत कमी होता. परंतु आजचे भाव हे त्यावेळच्या तुलनेने वाढले आहेत. त्यामुळे आजच्या बाजार भावाप्रमाणे नागरिकांना त्यांचा मावेजा मिळू शकतो.आज केवळ नोटीसा बजावल्या असून, त्यावर हरकती, सूचना मागवून नंतर स्वतंत्र आराखडा तयार करून तो राज्य सरकारच्या नगर विकास मंत्रालयाकडे मंजूरीसाठी पाठवण्यात येऊन नंतरच हे रस्ता रूंदीकरण सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदroad transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडी