शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त कार्यालयाकडून पालिकेची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:48 IST

जालना पालिकेतील गेल्या पाच वर्षांत झालेल्या विविध विकास कामांची चौकशी करण्यासाठीची तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आल्याने त्यांच्या कार्यालयाकडून आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पालिकेतील गेल्या पाच वर्षांत झालेल्या विविध विकास कामांची चौकशी करण्यासाठीची तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आल्याने त्यांच्या कार्यालयाकडून आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी पाच अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले होते. यावेळी चौकशी समितीकडे अनेकांनी आपल्याला येणा-या अडचणीं संदर्भातील निवेदनही सादर केले आहे.जालना पािलकेत काँग्रेसची सत्ता असल्याने युतीकडून हे चौकशीचे राजकारण करून पालिकेला बदनाम करण्याचे उद्योग सुरू असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी आठवडाभपूर्वीच पत्रकार परिषदेत केला होता. परंतु आता मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच ही चौकशी प्रस्तावित करण्यात आल्याने ती करण्या शिवाय प्रशासनासमोर गत्यंतर नाही. शुक्रवारी औरंगाबाद येथील अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, विभागीय प्रादेशिक संचालक अ‍ॅलिस पोरे, लेखाधिकारी वैजनाथ शेळके, जीवन प्राधिकरणचे अभियंता डी. डी. मालेकर आणि लेखाधिकारी संजय धीवर यांचा या चौकशी समितीत सहभाग आहे.यावेळी समितीने पालिकेतील त्यांना हवे असलेले रेकॉर्ड मागवून घेतले होते. यावेळी बंदव्दार चौकशी दरम्यान मुख्याधिकारी नितिन नार्वेकर, अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे तसेच विविध विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते. दरम्यान यावेळी समिती जालन्यात दाखल झाल्याची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी त्या समितीची भेट घेऊन निवेदन दिल्याचे सांगण्यात आले. त्यात पालिका फंडातून करण्यात आलेल्या दोन कोटींच्या रस्ते कामाची चौकशी करण्याची मागणी नगरसेविका संध्या देठे यांनी निवेदनाव्दारे केली. तर ए.आर. पाटील यांनी देखील निवेदन दिले आहे. गणेश विसर्जन करतांना मोती तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलाच्या परिवारानेही समितीची भेट घेऊन निवेदन दिले.अंदाज समितीनंतर दुसरी चौकशीतीन वर्षांपूर्वी अंदाज समितीचे तत्कालीन अध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पालिकेला भेट देऊन चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानुसार याची चौकशीही झाली; परंतु त्या चौकशीत नेमका कोणावर ठपका ठेवला या बाबतचा अहवाल अद्यापही जनतेसमोर आला नाही.दबक्या आवाजात अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर या अंदाज समितीने ठपका ठेवल्याचे बोलले जात आहे; परंतु तो अहवाल जनतेसाठी खुला करून जनेतलाही दूध का दूध आणि पाणी..का पाणी.. समोर आले पाहजे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान यावेळी शिवसंग्राम संघटनेनेही आपल्या मागण्यांचे निवेदन समितीला सादर केले आहे.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयJalana Muncipalityजालना नगरपरिषद