शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

बहुतांश तरूण ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:30 IST

भोकरदन : एकीकडे ग्रामीण भागात गुलाबी थंडीचा जोर वाढत असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने अचानक जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमाने ...

भोकरदन : एकीकडे ग्रामीण भागात गुलाबी थंडीचा जोर वाढत असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने अचानक जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमाने सध्या गावागावात गप्पांचे फड रंगू लागले आहेत. तहसील कार्यालयात आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. तर पॅनल प्रमुखांना उमेदवार निवडताना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय तरुणाई देखील यावेळी राजकीय आखड्यात उतरल्याने अनेक जुन्या उमेदवारांना घरी बसावे लागत आहे.

आधीचे आरक्षण रद्द करून निवडणुकीनंतर नव्याने आरक्षण करण्याच्या घोषणेने सरपंचपदाची तयारी केलेल्या अनेकांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार असून, १८ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. यापूर्वी सरपंचाची आरक्षण प्रक्रिया निवडणूक अगोदर व्हायची. त्यामुळे सरपंच पदाचे जे आरक्षण असेल त्या प्रवर्गाचे अनेक उमेदवार रिंगणात असायचे. त्यामुळे निवडणुका चुरशीच्या व्हायच्या. परंतु, शासनाने यावेळी निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पॅनल प्रमुखांची उमेदवारांसाठी भागमभाग सुरू आहे. एकीकडे थंडीचा जोर वाढला आहे तर दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण तापत चालले आहे. तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव रेणुकाई येथे सध्या दोन गटात सरळ लढत होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील ७२ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात होत्या. मात्र, यावेळी राज्यात सत्तांतर झालेले आहे. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांनी जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

शासन निर्णयाने उमेदवारात चुरस वाढली

यापूर्वी निवडणूक अगोदर सोडत पद्धतीने सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे अनेक उमेदवारांनी ही निवडणूक सहज घेतली होती. आता मात्र, शासनाने निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याने प्रत्येक उमेदवार आता भावी सरपंच आपणच असे समजून रिंगणात उतरत आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढत आहे.