शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

मनाची, बुद्धीची भूक महोत्सवात पूर्ण होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मनाची व बुद्धीची भूक ही सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या महोत्सवातून पूर्ण होत असते, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.कलश सिड्स मैदानावरील स्व. शारदादेवी पित्ती नगरीत आयोजित जालना महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची तर प्रमुख ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मनाची व बुद्धीची भूक ही सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या महोत्सवातून पूर्ण होत असते, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.कलश सिड्स मैदानावरील स्व. शारदादेवी पित्ती नगरीत आयोजित जालना महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची तर प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, ललित गांधी, ओमप्रकाश शेटे, राधेशाम चांडक, विशाल अग्रवाल, द्वारकादास सोनी, भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, भावेश पटेल आदींची उपस्थिती होती.यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, १९८० पासून आपला व जालना शहराचा संपर्क आहे. अ. भा. विद्यार्थी परिषदेच्या अभ्यासवर्गाला जालना येथे आपण आलो होतो. या जिल्ह्याविषयी आपली आपुलकी आहे. शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींशी आपला संपर्क आला. महाविद्यालयीन जीवनापासून कार्यकर्ता असल्याने समाजाचे प्रश्न व समस्या जाणतो. व्यक्तीचा विकास होणे आज गरजेचे असून, राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे झाली असल्याचे सांगून, शहरात जालना महोत्सवासारखे विविध कार्यक्रम, उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी महोत्सव समितीचे कौतुक केले.यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल म्हणाल्या, जालना महोत्सव हा स्तुत्य उपक्रम आहे. शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय समारोपप्रसंगी पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, महोत्सवा दरम्यान झालेल्या उपक्रमाबद्दल माहिती देऊन महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. यावेळी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, श्रीपती पळसुळे, गुणवंत, ब्रिजमोहन लड्डा, सुभाषचंद्र देविदान, गोविंदप्रसाद मुंदडा, मनिष तवरावाला, डॉ. नीता जैन, विजय जैन, पवन जोशी, उमेश पंचारिया, सुनील राठी, सुनील दायमा आदींची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर कवी सुरेंद्र शर्मा, अरूण जेमिनी, महेंद्र अजनबी, संपत सरळ, आजकरण अटल, वेदप्रकाश, मनोहर माथूर आदींच्या उपस्थितीत महामूर्ख कविसंमेलन पार पडले.स्मरणिकेचे प्रकाशन : प्राईड आॅफ जालनाया जालना महोत्सवानिमित्त डॉ. रावसाहेब ढवळे यांच्या संपादनाखाली काढण्यात आलेल्या ‘प्राईड आॅफ जालना’ या स्मरणिकेचे प्रकाशन चंद्रकांत पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आहे.यावेळी जिल्ह्यात विविध क्षेत्रांत नावलौकिक कमावलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमंत्री वीरेंद्रप्रकाश धोका यांनी केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकchandrakant patilचंद्रकांत पाटील