शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

मनाची, बुद्धीची भूक महोत्सवात पूर्ण होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मनाची व बुद्धीची भूक ही सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या महोत्सवातून पूर्ण होत असते, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.कलश सिड्स मैदानावरील स्व. शारदादेवी पित्ती नगरीत आयोजित जालना महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची तर प्रमुख ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मनाची व बुद्धीची भूक ही सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या महोत्सवातून पूर्ण होत असते, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.कलश सिड्स मैदानावरील स्व. शारदादेवी पित्ती नगरीत आयोजित जालना महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची तर प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, ललित गांधी, ओमप्रकाश शेटे, राधेशाम चांडक, विशाल अग्रवाल, द्वारकादास सोनी, भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, भावेश पटेल आदींची उपस्थिती होती.यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, १९८० पासून आपला व जालना शहराचा संपर्क आहे. अ. भा. विद्यार्थी परिषदेच्या अभ्यासवर्गाला जालना येथे आपण आलो होतो. या जिल्ह्याविषयी आपली आपुलकी आहे. शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींशी आपला संपर्क आला. महाविद्यालयीन जीवनापासून कार्यकर्ता असल्याने समाजाचे प्रश्न व समस्या जाणतो. व्यक्तीचा विकास होणे आज गरजेचे असून, राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे झाली असल्याचे सांगून, शहरात जालना महोत्सवासारखे विविध कार्यक्रम, उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी महोत्सव समितीचे कौतुक केले.यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल म्हणाल्या, जालना महोत्सव हा स्तुत्य उपक्रम आहे. शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय समारोपप्रसंगी पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, महोत्सवा दरम्यान झालेल्या उपक्रमाबद्दल माहिती देऊन महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. यावेळी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, श्रीपती पळसुळे, गुणवंत, ब्रिजमोहन लड्डा, सुभाषचंद्र देविदान, गोविंदप्रसाद मुंदडा, मनिष तवरावाला, डॉ. नीता जैन, विजय जैन, पवन जोशी, उमेश पंचारिया, सुनील राठी, सुनील दायमा आदींची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर कवी सुरेंद्र शर्मा, अरूण जेमिनी, महेंद्र अजनबी, संपत सरळ, आजकरण अटल, वेदप्रकाश, मनोहर माथूर आदींच्या उपस्थितीत महामूर्ख कविसंमेलन पार पडले.स्मरणिकेचे प्रकाशन : प्राईड आॅफ जालनाया जालना महोत्सवानिमित्त डॉ. रावसाहेब ढवळे यांच्या संपादनाखाली काढण्यात आलेल्या ‘प्राईड आॅफ जालना’ या स्मरणिकेचे प्रकाशन चंद्रकांत पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आहे.यावेळी जिल्ह्यात विविध क्षेत्रांत नावलौकिक कमावलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमंत्री वीरेंद्रप्रकाश धोका यांनी केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकchandrakant patilचंद्रकांत पाटील