शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

केंद्रातील मंत्रीपदाबाबत दानवेंची सावध भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 01:13 IST

पुन्हा केंद्रात मोदी सरकार आल्यावर तुम्हांला केंद्रीय ग्राम अथवा कृषी खाते मिळेल काय, या प्रश्नावर दानवेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. अरे भाई कल किसने देखा..असे सांगून या मुद्याला त्यांनी बगल दिली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या पाच वर्षापासून यशस्वी प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली संपूर्ण देशात ओळख झाली आहे, जोड-जमाव करून विजयश्री खेचून आणल्याने पक्षाचा मोठा विश्वास तुमच्यावर आहे, त्यामुळे आता जर पुन्हा केंद्रात मोदी सरकार आल्यावर तुम्हांला केंद्रीय ग्राम अथवा कृषी खाते मिळेल काय, या प्रश्नावर दानवेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. अरे भाई कल किसने देखा..असे सांगून या मुद्याला त्यांनी बगल दिली. एकूणच महाराष्ट्रात युतीचेच सर्वात जास्त खासदार विजयी होणार असून, विधानसभेतही भाजप-शिवसेना युती कायम राहणार असल्याचे ते म्हणाले.दानवेंची प्रकृती निवडणुकीपासून पाहिजे तेवढी ठणठणीत नव्हती, त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. दानवेंना चेन्नईला हलवले, दानवें उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहेत, अशा एक ना अनेक अफवा होत्या. त्या अफवांना गुरूवारी खुद्द दानवेंनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करून खोडून काढले. आपली प्रकृती ठणठणीत असून, कोणाशीही कुस्ती लढण्यास तयार असल्याचा टोला त्यांनी लगावला. अंबड येथील एका सभेत उन्हामुळे प्रचंड त्रास झाला होता, त्यामुळे डॉक्टरांनी सक्तीचा आराम करण्यास सांगितले होते. त्यानंतर आता मी तुमच्यासमोर उभा आहे. असे सांगून, देश तसेच राज्यातील निवडणुकीवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. महाराष्ट्रात काही ठिकाणी निसटता विजय तर काही ठिकाणी घसरण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. युतीचे ३५ पेक्षा अधिक खासदार विजयी होतील असे सांगून, काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे, परंतु हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात १२ पेक्षा अधिकचा आकडा ओलांडू शकत नाहीत, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक