शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

केंद्रातील मंत्रीपदाबाबत दानवेंची सावध भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 01:13 IST

पुन्हा केंद्रात मोदी सरकार आल्यावर तुम्हांला केंद्रीय ग्राम अथवा कृषी खाते मिळेल काय, या प्रश्नावर दानवेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. अरे भाई कल किसने देखा..असे सांगून या मुद्याला त्यांनी बगल दिली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या पाच वर्षापासून यशस्वी प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली संपूर्ण देशात ओळख झाली आहे, जोड-जमाव करून विजयश्री खेचून आणल्याने पक्षाचा मोठा विश्वास तुमच्यावर आहे, त्यामुळे आता जर पुन्हा केंद्रात मोदी सरकार आल्यावर तुम्हांला केंद्रीय ग्राम अथवा कृषी खाते मिळेल काय, या प्रश्नावर दानवेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. अरे भाई कल किसने देखा..असे सांगून या मुद्याला त्यांनी बगल दिली. एकूणच महाराष्ट्रात युतीचेच सर्वात जास्त खासदार विजयी होणार असून, विधानसभेतही भाजप-शिवसेना युती कायम राहणार असल्याचे ते म्हणाले.दानवेंची प्रकृती निवडणुकीपासून पाहिजे तेवढी ठणठणीत नव्हती, त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. दानवेंना चेन्नईला हलवले, दानवें उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहेत, अशा एक ना अनेक अफवा होत्या. त्या अफवांना गुरूवारी खुद्द दानवेंनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करून खोडून काढले. आपली प्रकृती ठणठणीत असून, कोणाशीही कुस्ती लढण्यास तयार असल्याचा टोला त्यांनी लगावला. अंबड येथील एका सभेत उन्हामुळे प्रचंड त्रास झाला होता, त्यामुळे डॉक्टरांनी सक्तीचा आराम करण्यास सांगितले होते. त्यानंतर आता मी तुमच्यासमोर उभा आहे. असे सांगून, देश तसेच राज्यातील निवडणुकीवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. महाराष्ट्रात काही ठिकाणी निसटता विजय तर काही ठिकाणी घसरण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. युतीचे ३५ पेक्षा अधिक खासदार विजयी होतील असे सांगून, काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे, परंतु हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात १२ पेक्षा अधिकचा आकडा ओलांडू शकत नाहीत, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक