शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

आमदार-खासदारांना पेन्शन हवे कशाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:59 IST

भारतात आजमितीला पन्नास कोटींवर अधिक कष्टकरी-कामकरी असून त्यांना कोणत्याही कामगार कायद्यान्वये संरक्षण उपलब्ध नाही. वृद्धांना पेन्शनची मागणी लाऊन धरली तर राज्यकर्ते म्हणतात. वृद्धांना कशाला हवे पेन्शन ? त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मुला-बाळांचीच आहे. मग आमदार-खासदारांना तरी पेन्शन कशाला हवे ? असा रोकडा सवाल ज्येष्ठ कामगार नेते - विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देजालना : डॉ. बाबा आढाव यांचा जालना दौऱ्यात रोकडा सवाल

प्रा.डॉ. रावसाहेब ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भारतात आजमितीला पन्नास कोटींवर अधिक कष्टकरी-कामकरी असून त्यांना कोणत्याही कामगार कायद्यान्वये संरक्षण उपलब्ध नाही. वृद्धांना पेन्शनची मागणी लाऊन धरली तर राज्यकर्ते म्हणतात. वृद्धांना कशाला हवे पेन्शन ? त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मुला-बाळांचीच आहे. मग आमदार-खासदारांना तरी पेन्शन कशाला हवे ? असा रोकडा सवाल ज्येष्ठ कामगार नेते - विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी उपस्थित केला.जालना येथील मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाला आज सायंकाळी डॉ. बाबा आढाव यांनी सदिच्छा भेट दिली. भारतीय संविधान आणि वर्तमान संदर्भ या परिसंवादाला प्रारंभ होण्यापूर्वी डॉ. बाबा आढाव यांना संयोजकांनी विनंती केल्याने त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कष्टकºयांच्या जाहीरनामा तयार करण्याच्या निमित्ताने डॉ. आढाव सध्या आपल्या साथीदारांसह मराठवाडा दौºयावर आलेले आहेत.भारतीय संविधानावर सध्या अप्रत्यक्षपणे खूप हल्ले चालू असून, त्याविरूद्ध जनजागृती, संघटन आणि लढे उभारण्याची गरज प्रतिपादन करून डॉ. बाबा आढाव पुढे म्हणाले की, देशात व समाजात वाढत चाललेल्या विषमतेविरूद्ध लेखणी चालविण्याचे आव्हान साहित्यिकांपुढे आहे गरीब व श्रीमंतामधील अंतर केवळ शोषणामुळेच वाढत चाललले असून आर्थिक विषमता पराकोटीला जात आहे. तलाक, सबरीमाला प्रकरणासंदर्भाने सामाजिक विषयमतेचे अनेक पदर दिसू लागले असून जन-मनातील तसेच व्यवहारातील संघर्ष साहित्यिकांनी शब्दबद्ध केला पाहिजे.म. फुले - सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांना ज्ञानरूपी तिसरा डोळा दिला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर सर्वांना एकसारखा मताचा अधिकार दिला. त्याचा योग्य वापर होतो का, यासारखे विषय ऐरणीवर घेऊन विषमता व शोषणाचे अनेक पदर साहित्याद्वारे चित्रित करण्याचे काम लेख कवींना करावे लागेल. त्यासाठी कलात्मक सृजनशीलता, चिंतनशीलता जोपासून वर्तमान प्रश्नांना भिडते आणि टोकदार तेजोमय साहित्यनिर्मिती व्हावी, अशी अपेक्षाही डॉ. बाबा आढाव यांनी यावेळी व्यक्त केली.सत्यमेव जयते हे आपले ब्रीद असून म. फुले यांनी सत्य सर्वांचे आघिर, सर्व धर्मांचे माहेर... ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंभा पेटू नका, ही रचना डॉ. बाबा आढाव यांनी शेवटी संमेलनानिमित्त सभागृहात उपस्थितांकडून सामुहिकरित्या म्हणून घेतली.

टॅग्स :JalanaजालनाAsmitadarsh Sahitya Sammelanअस्मितादर्श साहित्य संमेलन