शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

आमदार-खासदारांना पेन्शन हवे कशाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:59 IST

भारतात आजमितीला पन्नास कोटींवर अधिक कष्टकरी-कामकरी असून त्यांना कोणत्याही कामगार कायद्यान्वये संरक्षण उपलब्ध नाही. वृद्धांना पेन्शनची मागणी लाऊन धरली तर राज्यकर्ते म्हणतात. वृद्धांना कशाला हवे पेन्शन ? त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मुला-बाळांचीच आहे. मग आमदार-खासदारांना तरी पेन्शन कशाला हवे ? असा रोकडा सवाल ज्येष्ठ कामगार नेते - विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देजालना : डॉ. बाबा आढाव यांचा जालना दौऱ्यात रोकडा सवाल

प्रा.डॉ. रावसाहेब ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भारतात आजमितीला पन्नास कोटींवर अधिक कष्टकरी-कामकरी असून त्यांना कोणत्याही कामगार कायद्यान्वये संरक्षण उपलब्ध नाही. वृद्धांना पेन्शनची मागणी लाऊन धरली तर राज्यकर्ते म्हणतात. वृद्धांना कशाला हवे पेन्शन ? त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मुला-बाळांचीच आहे. मग आमदार-खासदारांना तरी पेन्शन कशाला हवे ? असा रोकडा सवाल ज्येष्ठ कामगार नेते - विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी उपस्थित केला.जालना येथील मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाला आज सायंकाळी डॉ. बाबा आढाव यांनी सदिच्छा भेट दिली. भारतीय संविधान आणि वर्तमान संदर्भ या परिसंवादाला प्रारंभ होण्यापूर्वी डॉ. बाबा आढाव यांना संयोजकांनी विनंती केल्याने त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कष्टकºयांच्या जाहीरनामा तयार करण्याच्या निमित्ताने डॉ. आढाव सध्या आपल्या साथीदारांसह मराठवाडा दौºयावर आलेले आहेत.भारतीय संविधानावर सध्या अप्रत्यक्षपणे खूप हल्ले चालू असून, त्याविरूद्ध जनजागृती, संघटन आणि लढे उभारण्याची गरज प्रतिपादन करून डॉ. बाबा आढाव पुढे म्हणाले की, देशात व समाजात वाढत चाललेल्या विषमतेविरूद्ध लेखणी चालविण्याचे आव्हान साहित्यिकांपुढे आहे गरीब व श्रीमंतामधील अंतर केवळ शोषणामुळेच वाढत चाललले असून आर्थिक विषमता पराकोटीला जात आहे. तलाक, सबरीमाला प्रकरणासंदर्भाने सामाजिक विषयमतेचे अनेक पदर दिसू लागले असून जन-मनातील तसेच व्यवहारातील संघर्ष साहित्यिकांनी शब्दबद्ध केला पाहिजे.म. फुले - सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांना ज्ञानरूपी तिसरा डोळा दिला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर सर्वांना एकसारखा मताचा अधिकार दिला. त्याचा योग्य वापर होतो का, यासारखे विषय ऐरणीवर घेऊन विषमता व शोषणाचे अनेक पदर साहित्याद्वारे चित्रित करण्याचे काम लेख कवींना करावे लागेल. त्यासाठी कलात्मक सृजनशीलता, चिंतनशीलता जोपासून वर्तमान प्रश्नांना भिडते आणि टोकदार तेजोमय साहित्यनिर्मिती व्हावी, अशी अपेक्षाही डॉ. बाबा आढाव यांनी यावेळी व्यक्त केली.सत्यमेव जयते हे आपले ब्रीद असून म. फुले यांनी सत्य सर्वांचे आघिर, सर्व धर्मांचे माहेर... ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंभा पेटू नका, ही रचना डॉ. बाबा आढाव यांनी शेवटी संमेलनानिमित्त सभागृहात उपस्थितांकडून सामुहिकरित्या म्हणून घेतली.

टॅग्स :JalanaजालनाAsmitadarsh Sahitya Sammelanअस्मितादर्श साहित्य संमेलन