शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आमदार-खासदारांना पेन्शन हवे कशाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:59 IST

भारतात आजमितीला पन्नास कोटींवर अधिक कष्टकरी-कामकरी असून त्यांना कोणत्याही कामगार कायद्यान्वये संरक्षण उपलब्ध नाही. वृद्धांना पेन्शनची मागणी लाऊन धरली तर राज्यकर्ते म्हणतात. वृद्धांना कशाला हवे पेन्शन ? त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मुला-बाळांचीच आहे. मग आमदार-खासदारांना तरी पेन्शन कशाला हवे ? असा रोकडा सवाल ज्येष्ठ कामगार नेते - विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देजालना : डॉ. बाबा आढाव यांचा जालना दौऱ्यात रोकडा सवाल

प्रा.डॉ. रावसाहेब ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भारतात आजमितीला पन्नास कोटींवर अधिक कष्टकरी-कामकरी असून त्यांना कोणत्याही कामगार कायद्यान्वये संरक्षण उपलब्ध नाही. वृद्धांना पेन्शनची मागणी लाऊन धरली तर राज्यकर्ते म्हणतात. वृद्धांना कशाला हवे पेन्शन ? त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मुला-बाळांचीच आहे. मग आमदार-खासदारांना तरी पेन्शन कशाला हवे ? असा रोकडा सवाल ज्येष्ठ कामगार नेते - विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी उपस्थित केला.जालना येथील मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाला आज सायंकाळी डॉ. बाबा आढाव यांनी सदिच्छा भेट दिली. भारतीय संविधान आणि वर्तमान संदर्भ या परिसंवादाला प्रारंभ होण्यापूर्वी डॉ. बाबा आढाव यांना संयोजकांनी विनंती केल्याने त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कष्टकºयांच्या जाहीरनामा तयार करण्याच्या निमित्ताने डॉ. आढाव सध्या आपल्या साथीदारांसह मराठवाडा दौºयावर आलेले आहेत.भारतीय संविधानावर सध्या अप्रत्यक्षपणे खूप हल्ले चालू असून, त्याविरूद्ध जनजागृती, संघटन आणि लढे उभारण्याची गरज प्रतिपादन करून डॉ. बाबा आढाव पुढे म्हणाले की, देशात व समाजात वाढत चाललेल्या विषमतेविरूद्ध लेखणी चालविण्याचे आव्हान साहित्यिकांपुढे आहे गरीब व श्रीमंतामधील अंतर केवळ शोषणामुळेच वाढत चाललले असून आर्थिक विषमता पराकोटीला जात आहे. तलाक, सबरीमाला प्रकरणासंदर्भाने सामाजिक विषयमतेचे अनेक पदर दिसू लागले असून जन-मनातील तसेच व्यवहारातील संघर्ष साहित्यिकांनी शब्दबद्ध केला पाहिजे.म. फुले - सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांना ज्ञानरूपी तिसरा डोळा दिला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर सर्वांना एकसारखा मताचा अधिकार दिला. त्याचा योग्य वापर होतो का, यासारखे विषय ऐरणीवर घेऊन विषमता व शोषणाचे अनेक पदर साहित्याद्वारे चित्रित करण्याचे काम लेख कवींना करावे लागेल. त्यासाठी कलात्मक सृजनशीलता, चिंतनशीलता जोपासून वर्तमान प्रश्नांना भिडते आणि टोकदार तेजोमय साहित्यनिर्मिती व्हावी, अशी अपेक्षाही डॉ. बाबा आढाव यांनी यावेळी व्यक्त केली.सत्यमेव जयते हे आपले ब्रीद असून म. फुले यांनी सत्य सर्वांचे आघिर, सर्व धर्मांचे माहेर... ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंभा पेटू नका, ही रचना डॉ. बाबा आढाव यांनी शेवटी संमेलनानिमित्त सभागृहात उपस्थितांकडून सामुहिकरित्या म्हणून घेतली.

टॅग्स :JalanaजालनाAsmitadarsh Sahitya Sammelanअस्मितादर्श साहित्य संमेलन