शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

महोत्सवातून एकतेचा संदेश- कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:28 IST

राजकारण बाजूला ठेवून जालना शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी आयोजित केलेला जालना महोत्सव हा एकतेचा संदेश देणारा आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी येथे केले. जालना महोत्सवात सोमवारी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राजकारण बाजूला ठेवून जालना शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी आयोजित केलेला जालना महोत्सव हा एकतेचा संदेश देणारा आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी येथे केले.येथील कलश सीड्स मैदानावरील स्व. शारदादेवी पित्ती नगरीत सुरू असलेल्या जालना महोत्सवात सोमवारी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी आ. राजेश टोपे हे अध्यक्षस्थानी होते.प्रारंभी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलनाचे अध्यक्ष रमेशचंद्र बंग, आ. प्रशांत बंब, सिने अभिनेता सयाजी शिंदे, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, ओमप्रकाश मंत्री, महिकोचे चेअरमन राजेंद्र बारवाले, उद्योजक संजय मुथा, उपाध्यक्ष राजेश राऊत,दीपक भुरेवाल आदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी रामदास कदम म्हणाले की, जनतेच्या विकासासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र बघण्याचा प्रसंग आपणास जालना शहरात या जालना महोत्सवात बघायला मिळत आहे. जालना शहराची संस्कृती देशभराने स्वीकारावी अशी आहे. जालनेकर राजकारण बाजूला ठेवून सांस्कृतिक कार्यक्रम घेतात, हे चित्र आनंददायी आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमातून एकतेचा संदेश दिला जातो. आपण देखील कोकणामध्ये असाच महोत्सव सुरू करणार असल्याचे कदम म्हणाले.सिने अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले की, राजकारण बाजूला सारून सर्व नेत्यांनी तसेच जनतेने पर्यावरणावर भर दिला पाहिजे. झाडे जगवून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. देश पुढे गेला तरच शेतकरी प्रगती करेल, असे ही ते म्हणाले. यावेळी रमेशचंद्र बंग म्हणाले की, आपल्या मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून विकासात्मक कार्य केले जात आहे. सर्व सामान्य व्यक्तींचा विकास हाच दृष्टीकोन समोर ठेवून फाऊंडेशन कार्य करीत आहे, असे ते म्हणाले. यावेळी अंकुश देशमुख व राजेंद्र तापडिया यांचा गौरव करण्यात आला तसेच मंगलगाणी-दंगलगाणी या कार्यक्रमाचे निर्माते अशोक हांडे यांचाही गौरव करण्यात आला. प्रारंभी जालना महोत्सवाचे स्वागताध्यक्ष बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसेच जालना महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष घनश्याम गोयल, सुदेश करवा, ब्रिजमोहन लड्डा, उमेश पंचारिया, सुनील राठी, विजय जैन आदींच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवर अतिथींचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन जोशी यांनी केले तर मनिष तवरावाला यांनी आभार मानले. यावेळी गौतम मुनोत, सुनील दायमा आदींची उपस्थिती होती. यानंतर अशोक हांडे निर्मित मंगलगाणी-दंगलगाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकRamdas Kadamरामदास कदम