शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

महोत्सवातून एकतेचा संदेश- कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:28 IST

राजकारण बाजूला ठेवून जालना शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी आयोजित केलेला जालना महोत्सव हा एकतेचा संदेश देणारा आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी येथे केले. जालना महोत्सवात सोमवारी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राजकारण बाजूला ठेवून जालना शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी आयोजित केलेला जालना महोत्सव हा एकतेचा संदेश देणारा आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी येथे केले.येथील कलश सीड्स मैदानावरील स्व. शारदादेवी पित्ती नगरीत सुरू असलेल्या जालना महोत्सवात सोमवारी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी आ. राजेश टोपे हे अध्यक्षस्थानी होते.प्रारंभी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलनाचे अध्यक्ष रमेशचंद्र बंग, आ. प्रशांत बंब, सिने अभिनेता सयाजी शिंदे, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, ओमप्रकाश मंत्री, महिकोचे चेअरमन राजेंद्र बारवाले, उद्योजक संजय मुथा, उपाध्यक्ष राजेश राऊत,दीपक भुरेवाल आदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी रामदास कदम म्हणाले की, जनतेच्या विकासासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र बघण्याचा प्रसंग आपणास जालना शहरात या जालना महोत्सवात बघायला मिळत आहे. जालना शहराची संस्कृती देशभराने स्वीकारावी अशी आहे. जालनेकर राजकारण बाजूला ठेवून सांस्कृतिक कार्यक्रम घेतात, हे चित्र आनंददायी आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमातून एकतेचा संदेश दिला जातो. आपण देखील कोकणामध्ये असाच महोत्सव सुरू करणार असल्याचे कदम म्हणाले.सिने अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले की, राजकारण बाजूला सारून सर्व नेत्यांनी तसेच जनतेने पर्यावरणावर भर दिला पाहिजे. झाडे जगवून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. देश पुढे गेला तरच शेतकरी प्रगती करेल, असे ही ते म्हणाले. यावेळी रमेशचंद्र बंग म्हणाले की, आपल्या मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून विकासात्मक कार्य केले जात आहे. सर्व सामान्य व्यक्तींचा विकास हाच दृष्टीकोन समोर ठेवून फाऊंडेशन कार्य करीत आहे, असे ते म्हणाले. यावेळी अंकुश देशमुख व राजेंद्र तापडिया यांचा गौरव करण्यात आला तसेच मंगलगाणी-दंगलगाणी या कार्यक्रमाचे निर्माते अशोक हांडे यांचाही गौरव करण्यात आला. प्रारंभी जालना महोत्सवाचे स्वागताध्यक्ष बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसेच जालना महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष घनश्याम गोयल, सुदेश करवा, ब्रिजमोहन लड्डा, उमेश पंचारिया, सुनील राठी, विजय जैन आदींच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवर अतिथींचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन जोशी यांनी केले तर मनिष तवरावाला यांनी आभार मानले. यावेळी गौतम मुनोत, सुनील दायमा आदींची उपस्थिती होती. यानंतर अशोक हांडे निर्मित मंगलगाणी-दंगलगाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकRamdas Kadamरामदास कदम