शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत पक्षश्रेष्ठींना भेटले जालना जिल्हा काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:37 IST

जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी सभापती तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य भीमराव डोंगरे यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी जालन्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या पार्लमेंटरी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे लेखी अर्जाव्दारे केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आगामी लोकसभा निवडणुकीत जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी सभापती तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य भीमराव डोंगरे यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी जालन्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या पार्लमेंटरी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे लेखी अर्जाव्दारे केली. ही भेट गुरूवारी दुपारी मुंबईत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.जालना लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचा उमेदवार कोण या बाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे असताना उमेदवारी कोणाला द्यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडे पक्ष श्रेष्ठींनी नावे मागितली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिका-यांनी मुंबईत जाऊन ही मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केली. यावेळी काँग्रेस भवनमध्ये प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या समक्ष लेखी अर्ज सादर केला.यावेळी जालना जिल्ह्यातीलच उमेदवाराला उमेदवारी देण्याबाबत काँग्रेसने विचार करावा अशी मागणी केली. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यात जातीय समीकरणांचाही विचार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. आ. कल्याण काळे यांनी निवडणूक लढावावी अशी विनंती त्यांना यापूर्वीच केली होती, मात्र त्यांची यावेळी लढण्याची इच्छा नसल्याने त्यांच्या ऐवजी भीमराव डोंगरे यांना उमेदवारी देण्याची मागणी गुरूवारी शिष्टमंडळाने केली.या शिष्टमंडळात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आ. कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य कल्याण दळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद,मनोज पाटील यांच्यासह अन्य पदाधिका-यांची उपस्थिती होती. पुढील आठवड्यात काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. जिल्हा काँग्रेस समितीने दिलेला अर्ज हा दिल्लीतील हाय कमांडकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतरच उमेदवाराचा निर्णय होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस