शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी ठाकरे बंधू मोर्चास्थळी निघाले; आदित्य-अमित ठाकरेही सोबत आले
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
4
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
5
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
6
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
7
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
8
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
9
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
10
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
11
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
12
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
13
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
14
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
15
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
16
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
17
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
18
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
19
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
20
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?

मुंबईत पक्षश्रेष्ठींना भेटले जालना जिल्हा काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:37 IST

जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी सभापती तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य भीमराव डोंगरे यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी जालन्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या पार्लमेंटरी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे लेखी अर्जाव्दारे केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आगामी लोकसभा निवडणुकीत जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी सभापती तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य भीमराव डोंगरे यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी जालन्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या पार्लमेंटरी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे लेखी अर्जाव्दारे केली. ही भेट गुरूवारी दुपारी मुंबईत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.जालना लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचा उमेदवार कोण या बाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे असताना उमेदवारी कोणाला द्यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडे पक्ष श्रेष्ठींनी नावे मागितली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिका-यांनी मुंबईत जाऊन ही मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केली. यावेळी काँग्रेस भवनमध्ये प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या समक्ष लेखी अर्ज सादर केला.यावेळी जालना जिल्ह्यातीलच उमेदवाराला उमेदवारी देण्याबाबत काँग्रेसने विचार करावा अशी मागणी केली. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यात जातीय समीकरणांचाही विचार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. आ. कल्याण काळे यांनी निवडणूक लढावावी अशी विनंती त्यांना यापूर्वीच केली होती, मात्र त्यांची यावेळी लढण्याची इच्छा नसल्याने त्यांच्या ऐवजी भीमराव डोंगरे यांना उमेदवारी देण्याची मागणी गुरूवारी शिष्टमंडळाने केली.या शिष्टमंडळात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आ. कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य कल्याण दळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद,मनोज पाटील यांच्यासह अन्य पदाधिका-यांची उपस्थिती होती. पुढील आठवड्यात काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. जिल्हा काँग्रेस समितीने दिलेला अर्ज हा दिल्लीतील हाय कमांडकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतरच उमेदवाराचा निर्णय होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस