शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरलाच हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:39 IST

मराठी विद्यापीठ मुंबईला स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तो रद्द करून रिद्धपूर येथेच मराठी विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी महंत प्रज्ञासागरबाबा महानुभाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठी भाषेच्या या वैभवशाली अस्मितेचा व स्वाभिमानाचा पाया सर्वप्रथम श्री चक्रधर स्वामींनी व त्यांच्या महानुभाव पंथाने रचला आहे. याला इतिहास साक्ष आहे. या मराठी वाड.मयाचे उगमस्थान अर्थातच लीळाचरित्राचे लेखनस्थळ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे आहे. त्यामुळे मराठी विद्यापीठ येथे होणे गरजेचे आहे. परंतु मुख्यमंत्री हे विद्यापीठ मुंबईला स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तो रद्द करून रिद्धपूर येथेच मराठी विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी महंत प्रज्ञासागरबाबा महानुभाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.महंत प्रज्ञासागरबाबा महानुभाव म्हणाले की, वडोदरा येथे नुकत्याच झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांना मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथेच स्थापन करण्याची मागणी आम्ही केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही मागणी रास्त असल्याचेही सांगून राज्य सरकार याचा सकारात्मक विचार करेल, असा शब्द आपल्या भाषणातून दिला होता. परंतु आता हे विद्यापीठ मुंबईत स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. श्रीनागदेवाचार्य, श्रीम्हार्इंभट्ट, आद्य कवयित्री महदंबा आदी महानुभावांनी मराठी भाषेत विविध विषयांवर ६५०० ग्रंथ लिहिल्याची इतिहासात नोंद आहे. मराठी भाषेच्या या वैभवशाली अस्मितेचा व स्वाभिमानाचा पाया सर्वप्रथम श्रीचक्रधर स्वामींनी व त्यांच्या महानुभाव पंथाने रचला आहे. ज्याप्रमाणे हिंदी भाषेचे विद्यापीठ महात्मा गांधीजींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वर्धा येथे स्थापन करुन हिंदी भाषेचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे रिद्धपूर येथे श्रीचक्रधर स्वामी मराठी विद्यापीठ स्थापन करुन राज्य शासनाने मराठी भाषेचा गौरव करावा, अशी मागणी महंत प्रज्ञासागरबाबा यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेस उद्धवराज प्रज्ञासागर महानुभाव, अर्लकमुनी प्रज्ञासागर महानुभाव आदी उपस्थित होते.