शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरलाच हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:39 IST

मराठी विद्यापीठ मुंबईला स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तो रद्द करून रिद्धपूर येथेच मराठी विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी महंत प्रज्ञासागरबाबा महानुभाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठी भाषेच्या या वैभवशाली अस्मितेचा व स्वाभिमानाचा पाया सर्वप्रथम श्री चक्रधर स्वामींनी व त्यांच्या महानुभाव पंथाने रचला आहे. याला इतिहास साक्ष आहे. या मराठी वाड.मयाचे उगमस्थान अर्थातच लीळाचरित्राचे लेखनस्थळ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे आहे. त्यामुळे मराठी विद्यापीठ येथे होणे गरजेचे आहे. परंतु मुख्यमंत्री हे विद्यापीठ मुंबईला स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तो रद्द करून रिद्धपूर येथेच मराठी विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी महंत प्रज्ञासागरबाबा महानुभाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.महंत प्रज्ञासागरबाबा महानुभाव म्हणाले की, वडोदरा येथे नुकत्याच झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांना मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथेच स्थापन करण्याची मागणी आम्ही केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही मागणी रास्त असल्याचेही सांगून राज्य सरकार याचा सकारात्मक विचार करेल, असा शब्द आपल्या भाषणातून दिला होता. परंतु आता हे विद्यापीठ मुंबईत स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. श्रीनागदेवाचार्य, श्रीम्हार्इंभट्ट, आद्य कवयित्री महदंबा आदी महानुभावांनी मराठी भाषेत विविध विषयांवर ६५०० ग्रंथ लिहिल्याची इतिहासात नोंद आहे. मराठी भाषेच्या या वैभवशाली अस्मितेचा व स्वाभिमानाचा पाया सर्वप्रथम श्रीचक्रधर स्वामींनी व त्यांच्या महानुभाव पंथाने रचला आहे. ज्याप्रमाणे हिंदी भाषेचे विद्यापीठ महात्मा गांधीजींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वर्धा येथे स्थापन करुन हिंदी भाषेचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे रिद्धपूर येथे श्रीचक्रधर स्वामी मराठी विद्यापीठ स्थापन करुन राज्य शासनाने मराठी भाषेचा गौरव करावा, अशी मागणी महंत प्रज्ञासागरबाबा यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेस उद्धवराज प्रज्ञासागर महानुभाव, अर्लकमुनी प्रज्ञासागर महानुभाव आदी उपस्थित होते.