शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

मराठा आरक्षण ही भीक नव्हे प्रतिनिधीत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:52 IST

आरक्षण मागणे म्हणजे भीक मागणे हे समजणे चुकीचे त्या जातीचे प्रतिनिधित्व नोकरी, व्यवसायात असण्यासाठी वंचित समाजाला आरक्षण मिळलेच पाहिजे असे प्रतिपादन पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शनिवारी सायंकाळी येथील मराठा फाऊंडेशनच्या दुष्काळ आणि आरक्षण परिषदेत बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आरक्षण मागणे म्हणजे भीक मागणे हे समजणे चुकीचे त्या जातीचे प्रतिनिधित्व नोकरी, व्यवसायात असण्यासाठी वंचित समाजाला आरक्षण मिळलेच पाहिजे असे प्रतिपादन पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शनिवारी सायंकाळी येथील मराठा फाऊंडेशनच्या दुष्काळ आणि आरक्षण परिषदेत बोलताना केले.हार्दिक पटेल यांनी केंद्र आणि राज्यातील युती सरकारवर तोफ डागली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना त्यावर ठोस असे उपाय न करता केवळ दुष्काळी जाहीर करून सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. दुष्काळात करावयाच्या उपायोजना केवळ कागदावरच असल्याचे पटेल म्हणाले. समाजातील लोकांनी चुकीच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिल्याने आता त्यांच्यावर नाराज होऊन चालणार नाही. भविष्यात याकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पटेल यांनी जगण्यासाठी मोबाईलची गरज नाही, परंतु पोटाला पुरसे अन्न आवश्यक आहे. मात्र सध्या सरकार याकडे लक्ष देण्याएैवजी अंबानी-अदानी या उद्योगपतींचे भले कसे होईल अशाच योजना राबवित असल्याचाआरोपही केला.केंद्र सरकार शेतकºयांच्या आत्महत्येची खरी आकडेवारी समोर येऊ देत नाही. गुजरातमध्ये एक हजार ३०० शेतकºयांनी आत्महत्या केल्या असून, महाराष्ट्रात पाच हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र सरकार हे क्रिकेटच्या मॅच सारखे हा आकडेवारीचा खेळ करून आमच्या काळात एवढ्या कमी आत्महत्या झाल्या हे भासवित आहे. हे सरकारचे धोरण चुकीचे असल्याचेही यावेळी ते म्हणाले. सरकारला जाब विचारण्याची ताकद ठेवली पाहिजे तरच आपले प्रश्न सुटतील असे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षणा संदर्भातील अहवाल सादर झाला असून, त्यावर सकारात्मक निर्णय होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक संयोजक अविनाश कव्हळे यांनी केले.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलMaratha Reservationमराठा आरक्षण