शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अनेक कंपन्यांनी उत्पादनात केली कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:04 IST

मंदीचा फटका आता जालन्यातील उद्योगांनाही बसला आहे. आॅटोमोबाईलशी संदर्भातील जालन्यातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एनआरबीने देखील आपल्या उत्पादनात मागणीअभावी कपात केली आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मंदीचा फटका आता जालन्यातील उद्योगांनाही बसला आहे. आॅटोमोबाईलशी संदर्भातील जालन्यातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एनआरबीने देखील आपल्या उत्पादनात मागणीअभावी कपात केली आहे. तसेच रात्रीची तिसरी शिप्ट जवळपास बंद केली आहे. याचा परिणाम म्हणून हंगामी कामगारांवर -कॅज्युअल गंडांतर आले आहे. एकूणच २००८ मध्ये मंदी होती, परंतु ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर नसल्याचे सूत्रांनी सांगितले.जालन्यातील एनआरबी कंपनीला जालन्यातील उद्योग विश्वात मानाचे स्थान आहे. साधारणपणे १८८१ पासून ही कंपनी अविरत सुरू आहे. वाहनांसाठी लागणारे वेगवेगळ्या आकाराचे बेरींग्ज येथे तयार होतात. जवळपास एक हजार कामगारांना यामुळे रोजगार मिळाला आहे. परंतु सध्या देशातील आॅटोमाबईल क्षेत्रात आलेली मंदी ही मोठी असल्याचे सांगण्यात आले. वाहन उद्योगातील अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपले उत्पादन लक्षणीयरित्या घटविल्याने आम्हालाही उत्पादन कमी केल्या शिवाय पर्याय नसल्याचे कंपनीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सांगण्यात आले. या कंपनीचे बेरींग्ज हे देशासह परदेशातील अनेक बड्या वाहनांमध्ये वापरले जातात. साधारपणे एका वाहनात आठ ते दहा बेरींग्जचा उपयोग होतो. परंतु आता ही मागणी कमी झाल्याने हंगामी कामगारांना कमी करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याचे सांगण्यात आले.स्टील उद्योगातील मंदीचे सावट अद्याप हटलेले नाही. गेल्या चार महिन्यांपासून स्टीलच्या दरात कपातीचा मोठा फटका उद्योजकांना बसलेला आहे.एकीकडे पावसाने देखील पाठ फिरवल्याने स्टीलची मागणी घटली आहे. आता नवरात्रा नंतर यात काही अंशी बदल होईल अशी अपेक्षा उद्योजक ठेवून आहेत. आॅटोमोबाईलशी संदर्भातील दुसरी एक मोठी कंपनी म्हणजेच एल.जी. बालकृष्ण ही असून, या कंपनीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी लागणा-या चैनचे उत्पादन केले जाते. त्या संदर्भात सीटू औरंगाबाद मजदूर युनियनचे ज्येष्ठ कामगार नेते उध्दव भवलकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, मंदीचा कहर आहे, परंतु तो सध्या जालन्यातील बालकृष्ण कंपनीला अद्यापतरी बसलेला नाही. सध्या त्यांच्याकडे जुन्या आॅर्डर असल्याने उत्पादन जैसे थे असल्याचे भवलकर म्हणाले.आॅर्डर तयार परंतु पैसे थकलेजालन्यातील लघुउद्योगातील अनेक उद्योजकांना देशासह परदेशातून वस्तू निर्मितीच्या आॅर्डर आहेत. त्यानुसार डिझाईन करून उत्पादन तयारही केले आहे. परंतु हे उत्पादन तयार आहे, तुम्ही पैसे देऊन घेऊन जा असा संपर्क वारंवार आॅर्डर देणाऱ्यांकडे करूनही त्यांच्याकडून आता पूर्वी सारखा प्रतिसाद मिळत नाही.त्यामुळे आमची लाखो रूपयांची गुंतवणूक रखडली असून, दिलेल्या आॅर्डर आता कधी डीलेव्हर होतात. याकडेच लक्ष लागून असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीEconomyअर्थव्यवस्थाAutomobile Industryवाहन उद्योग