शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनेक कंपन्यांनी उत्पादनात केली कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:04 IST

मंदीचा फटका आता जालन्यातील उद्योगांनाही बसला आहे. आॅटोमोबाईलशी संदर्भातील जालन्यातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एनआरबीने देखील आपल्या उत्पादनात मागणीअभावी कपात केली आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मंदीचा फटका आता जालन्यातील उद्योगांनाही बसला आहे. आॅटोमोबाईलशी संदर्भातील जालन्यातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एनआरबीने देखील आपल्या उत्पादनात मागणीअभावी कपात केली आहे. तसेच रात्रीची तिसरी शिप्ट जवळपास बंद केली आहे. याचा परिणाम म्हणून हंगामी कामगारांवर -कॅज्युअल गंडांतर आले आहे. एकूणच २००८ मध्ये मंदी होती, परंतु ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर नसल्याचे सूत्रांनी सांगितले.जालन्यातील एनआरबी कंपनीला जालन्यातील उद्योग विश्वात मानाचे स्थान आहे. साधारणपणे १८८१ पासून ही कंपनी अविरत सुरू आहे. वाहनांसाठी लागणारे वेगवेगळ्या आकाराचे बेरींग्ज येथे तयार होतात. जवळपास एक हजार कामगारांना यामुळे रोजगार मिळाला आहे. परंतु सध्या देशातील आॅटोमाबईल क्षेत्रात आलेली मंदी ही मोठी असल्याचे सांगण्यात आले. वाहन उद्योगातील अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपले उत्पादन लक्षणीयरित्या घटविल्याने आम्हालाही उत्पादन कमी केल्या शिवाय पर्याय नसल्याचे कंपनीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सांगण्यात आले. या कंपनीचे बेरींग्ज हे देशासह परदेशातील अनेक बड्या वाहनांमध्ये वापरले जातात. साधारपणे एका वाहनात आठ ते दहा बेरींग्जचा उपयोग होतो. परंतु आता ही मागणी कमी झाल्याने हंगामी कामगारांना कमी करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याचे सांगण्यात आले.स्टील उद्योगातील मंदीचे सावट अद्याप हटलेले नाही. गेल्या चार महिन्यांपासून स्टीलच्या दरात कपातीचा मोठा फटका उद्योजकांना बसलेला आहे.एकीकडे पावसाने देखील पाठ फिरवल्याने स्टीलची मागणी घटली आहे. आता नवरात्रा नंतर यात काही अंशी बदल होईल अशी अपेक्षा उद्योजक ठेवून आहेत. आॅटोमोबाईलशी संदर्भातील दुसरी एक मोठी कंपनी म्हणजेच एल.जी. बालकृष्ण ही असून, या कंपनीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी लागणा-या चैनचे उत्पादन केले जाते. त्या संदर्भात सीटू औरंगाबाद मजदूर युनियनचे ज्येष्ठ कामगार नेते उध्दव भवलकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, मंदीचा कहर आहे, परंतु तो सध्या जालन्यातील बालकृष्ण कंपनीला अद्यापतरी बसलेला नाही. सध्या त्यांच्याकडे जुन्या आॅर्डर असल्याने उत्पादन जैसे थे असल्याचे भवलकर म्हणाले.आॅर्डर तयार परंतु पैसे थकलेजालन्यातील लघुउद्योगातील अनेक उद्योजकांना देशासह परदेशातून वस्तू निर्मितीच्या आॅर्डर आहेत. त्यानुसार डिझाईन करून उत्पादन तयारही केले आहे. परंतु हे उत्पादन तयार आहे, तुम्ही पैसे देऊन घेऊन जा असा संपर्क वारंवार आॅर्डर देणाऱ्यांकडे करूनही त्यांच्याकडून आता पूर्वी सारखा प्रतिसाद मिळत नाही.त्यामुळे आमची लाखो रूपयांची गुंतवणूक रखडली असून, दिलेल्या आॅर्डर आता कधी डीलेव्हर होतात. याकडेच लक्ष लागून असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीEconomyअर्थव्यवस्थाAutomobile Industryवाहन उद्योग