शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

अंगणवाडीतील अनेक पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST

कारवाईची मागणी बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात जुगाराचे डाव रंगू लागले आहेत. अनेक युवक जुगाराच्या आहारी जात असून, त्यात ...

कारवाईची मागणी

बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात जुगाराचे डाव रंगू लागले आहेत. अनेक युवक जुगाराच्या आहारी जात असून, त्यात अनेकांचे नुकसान होत आहे. जुगारासह इतर अवैध धंदे ही जोमात सुरू आहेत. ही बाब पाहता पोलीस प्रशासनाने जुगारासह इतर अवैध धंदे चालविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सुभाष देविदान यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

जालना : येथील अखिल भारतीय मारवाडी संमेलनाच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष देविदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघटनमंत्री वीरेंद्रप्रसाद धोका यांनी ही नियुक्ती केली आहे. मराठवाडा संपर्कप्रमुख चंदूलाल बियाणी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल देविदान यांचा मारवाडी युवा मंचतर्फे सत्कार करण्यात आला.

वैष्णवी गाडेकर हिचे प्रज्ञाशोध परीक्षेत यश

जालना : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. जालना शहरातील टाऊन हॉल परिसरातील सरस्वती भुवन प्रशालेची विद्यार्थिनी वैष्णवी कैलास गाडेकर हिने यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल जयश्री गाडेकर, आनंद काळे यांच्यासह आनंदी स्वामी महाराज भक्त मंडळाच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे.

रोहित नलावडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

जालना : ओबीसी मोर्चा युवक जिल्हाध्यक्षपदी रोहित नलावडे यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडपत्र आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष संतोष दानवे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, सतीश केळकर आदींनी कौतुक केले आहे.

अंबड येथे मोकाट कुत्र्यांचा चावा

अंबड : नूतन वसाहत परिसरात एका मोकाट कुत्र्याने आतापर्यंत दहा ते १५ जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. नूतन वसाहत परिसरातील मत्स्योदरी ज्ञानमंदिर शाळा परिसरात मोकाट कुत्रे दिवसरात्र फिरत आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला, लहान मुलांमध्ये भीती पसरली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

खरेदी-विक्री व्यवहार ठप्प

बदनापूर : तालुक्यात मागील महिनाभरापासून जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला इंटरनेट समस्येचे ग्रहण लागले आहे. येथील दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील इंटरनेट प्रणाली बंद झाल्याने खरेदी- विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. नागरिकांसह शेतकऱ्यांना कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. लक्ष देण्याची मागणी होत आहे.

मागण्यांचे निवेदन

बदनापूर : ग्रामपंचायत काळातील अनेक सफाई कामगार नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून तुटपुंज्या मानधनावर सेवा बजावत आहेत. अशा कामगारांना तातडीने कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन न.प. प्रशासनाला दिले.