शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

Manoj Jarange Patil : "...तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार, तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार"

By विजय मुंडे  | Updated: June 8, 2024 11:23 IST

"विषय मार्गी काढावा, अन्यथा विधानसभेत उमेदवार देणार," मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

जालना : "राजकारण माझा मार्ग नाही आणि मला त्यात जायचेही नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच मागणी असून, ती पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करणार आहे. सरकारने तातडीने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. मागणीनुसार प्रमाणपत्र द्यावे. मागणी मान्य झाली नाही तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार आणि तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शनिवारी ८ जून रोजी अन्नपाण्याचा त्याग करून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. "सरकार आंदोलन मोडीत काढण्याचा डाव टाकत आहे. त्यामुळेच काहीजण निवेदने देत आहेत. परंतु, आचारसंहिता असतानाही अनेक उपोषणे सुरू होती. आम्ही आचारसंहितेचा आदर करीत ४ जून चे उपोषण ८ जून रोजी सुरू केले आहे. आम्ही आमच्या मागणीसाठी उपोषण करतोय तेव्हा जातीवाद वाटतोय. मग सकल मराठा समाजाचे मोर्चे निघाले तेव्हा प्रतिमोर्चे निघाले. आमच्या सभा झाल्या त्यावेळी त्यांनी राज्यभर सभा घेतल्या तो जातीवाद नाही का असा सवाल त्यांनी केला. शांततेत आंदोलन करण्याचा लोकशाहीने अधिकार दिला असून, मी ते करीत आहे. कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे ती त्यांनी पार पाडावी. आपण मागण्यांबाबत सरकारशी चर्चा करण्यास तयार आहोत," असे ते म्हणाले. 

शेती कसा, अंतरवालीकडे येवू नका 

"सर्वांना वाटत होते मराठ्यांची एकजूट होणार नाही, मतात रूपांतर होणार नाही. परंतु, मराठ्यांची एकजूट लोकसभा निवडणुकीत दिसून आलेली आहे. आपली उपजिविका शेतीवर भागते. त्यामुळे अगोदर कसा आणि नंतर इकडे या. राज्यात कोठेही उपोषणे, आंदोलने होणार नाहीत," असेही जरांगे पाटील म्हणाले. 

मुलींना मोफत शिक्षण द्या, ओबीसीचा पर्याय खुला करा 

"प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे घेतलेल्या निर्णयानुसार मुलींना मोफत शिक्षण द्यावे. जीआरची अंमलबजावणी करावी. याबरोबरच एसीबीसीतून नोकरभरती, शिक्षणासाठी अर्ज भरलेल्या आणि ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना ओबीसीतून अर्ज भरण्याचा पर्याय खुला करावा," अशी मागणी त्यांनी केली. 

सर्व आमदारांनी प्रश्न मांडावा 

आमचे उपोषण सुरू झाले की काही आमदार ओरडतात. त्यामुळे भाजप-सेनेच्याच नव्हे तर सर्वपक्षीय आमदारांनी आपल्या नेत्यांकडे मराठा आरक्षणाचा विषय मांडून तो तातडीने मार्गी काढण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आवाहन जरांगेंनी केलं.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण