शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पाच पंचायत समितीत महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 01:31 IST

जालना जिल्ह्यातील आठ पैकी पाच पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षणाची सोडत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील आठ पैकी पाच पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षणाची सोडत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यात आठ पैकी पाच पंचायत समितीचे सभापती पद हे महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे पंचायत समितीत महिला राज येणार हे निश्चित झाले आहे.सकाळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. आपल्या तालुक्यासाठी कुठली सोडत सुटते, हे ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी ही सोडत काढल्यावर त्यात जालना अनुसूचित जाती महिला, परतूर नागरिकांचा मागासवर्ग महिला, जाफराबाद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, बदनापूर, भोकरदन आणि मंठा येथील पंचायत समितीच्या सभापतीसाठी सर्व साधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवले असल्याचे पुढे आले.अंबड आणि घनसावंगी येथील पंचायत समितीचे सभापतीचे आरक्षण हे सर्वसाधारण गटासाठी सुटले आहे. ही प्रक्रिया पार पडल्यावर आता लवकरच या नवीन सोडती प्रमाणे पंचायत समितीच्या सभापतीसाठीची निवड प्रक्रिया होणार आहे. सभापती म्हणून कोणाची वर्णी लागते, याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. सभापती पदावर वर्णी लागावी म्हणून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्याने आधी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नंतर या सभापतींना जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना मतदार करता येणार आहे.त्यामुळे पंचायत समितीच्या सभापतीसाठी रस्सीखेच राहणार यात शंका नाही. त्यातच बहुतांश पंचायत समिती या भाजप आणि शिवसेनेच्या ताब्यात होत्या. केवळ अपवाद ही घनसावंगी तालुक्यातील देता येणार आहे. परंतु आता नवीन राजकीय समीकरणानुसार शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे राज्य सरकारमध्ये महाविकास आघाडी करून एकत्रित आले आहेत. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरील राजकीय नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे. इच्छुकांनी आपापल्या पध्दतीने वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे.जालना जिल्हा परिषदेत आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षासाठी निवड होणार आहे. त्यात अध्यक्षपद हे राखीव प्रवर्गातील सुटले आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान जिल्हा परिदेच्या राजकारणात विद्यमान अध्यक्ष अनिरूध्द खोतकर आणि उपाध्यक्ष सतीश टोपे यांचे वर्चस्व राहिले आहे.त्यामुळे आता उपाध्यक्षपदासाठी देखील या दोघांमधूनच वर्णी लागणार असल्याच काँग्रेस तसेच अन्य काही जिल्हा परिषद सदस्य हे वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे भाजप देखील ही महत्वाची जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीWomenमहिलाElectionनिवडणूक