शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पाच पंचायत समितीत महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 01:31 IST

जालना जिल्ह्यातील आठ पैकी पाच पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षणाची सोडत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील आठ पैकी पाच पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षणाची सोडत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यात आठ पैकी पाच पंचायत समितीचे सभापती पद हे महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे पंचायत समितीत महिला राज येणार हे निश्चित झाले आहे.सकाळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. आपल्या तालुक्यासाठी कुठली सोडत सुटते, हे ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी ही सोडत काढल्यावर त्यात जालना अनुसूचित जाती महिला, परतूर नागरिकांचा मागासवर्ग महिला, जाफराबाद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, बदनापूर, भोकरदन आणि मंठा येथील पंचायत समितीच्या सभापतीसाठी सर्व साधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवले असल्याचे पुढे आले.अंबड आणि घनसावंगी येथील पंचायत समितीचे सभापतीचे आरक्षण हे सर्वसाधारण गटासाठी सुटले आहे. ही प्रक्रिया पार पडल्यावर आता लवकरच या नवीन सोडती प्रमाणे पंचायत समितीच्या सभापतीसाठीची निवड प्रक्रिया होणार आहे. सभापती म्हणून कोणाची वर्णी लागते, याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. सभापती पदावर वर्णी लागावी म्हणून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्याने आधी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नंतर या सभापतींना जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना मतदार करता येणार आहे.त्यामुळे पंचायत समितीच्या सभापतीसाठी रस्सीखेच राहणार यात शंका नाही. त्यातच बहुतांश पंचायत समिती या भाजप आणि शिवसेनेच्या ताब्यात होत्या. केवळ अपवाद ही घनसावंगी तालुक्यातील देता येणार आहे. परंतु आता नवीन राजकीय समीकरणानुसार शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे राज्य सरकारमध्ये महाविकास आघाडी करून एकत्रित आले आहेत. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरील राजकीय नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे. इच्छुकांनी आपापल्या पध्दतीने वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे.जालना जिल्हा परिषदेत आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षासाठी निवड होणार आहे. त्यात अध्यक्षपद हे राखीव प्रवर्गातील सुटले आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान जिल्हा परिदेच्या राजकारणात विद्यमान अध्यक्ष अनिरूध्द खोतकर आणि उपाध्यक्ष सतीश टोपे यांचे वर्चस्व राहिले आहे.त्यामुळे आता उपाध्यक्षपदासाठी देखील या दोघांमधूनच वर्णी लागणार असल्याच काँग्रेस तसेच अन्य काही जिल्हा परिषद सदस्य हे वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे भाजप देखील ही महत्वाची जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीWomenमहिलाElectionनिवडणूक