शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महावितरणचा चमत्कार; जोडणी नसलेल्यास ४८ हजारांचे बिल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:42 IST

अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील एका शेतकऱ्याने नऊ वर्षांपूर्वी कृषीपंपाच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडे अर्ज केला. मात्र, अद्यापही वीजजोडणी मिळालेली नाही. असे असले तरी या शेतकºयास वीजवितरण कंपनीने तब्बल ४८ हजार २९० रुपयांचे वीजबिल पाठवले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील एका शेतकऱ्याने नऊ वर्षांपूर्वी कृषीपंपाच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडे अर्ज केला. मात्र, अद्यापही वीजजोडणी मिळालेली नाही. असे असले तरी या शेतकºयास वीजवितरण कंपनीने तब्बल ४८ हजार २९० रुपयांचे वीजबिल पाठवले आहे. त्यामुळे महावितरणचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.वाढीव मीटर रीडिंग आधारे बिल आकारणे, चुकीचे वीज बिल पाठवणे, बिलच न पाठवणे, वीजबिल दुरुस्तीसाठी ग्राहकाला वारंवार चकरा मारायला लावणे, अशा कारणांमुळे वीज ग्राहकांना अनेकदा मनस्ताप सहन करावा लागला आहे. असाच प्रकार आता दोदडगाव येथील शेतकरी धोंडीराम लहानू पांढरे यांच्यासोबत घडला आहे. पांढरे यांची दोदडगाव गट क्रमांक ७३ मध्ये सव्वा पाच एकर शेती आहे. विहिरीवरील कृषीपंपास वीज जोडणी मिळविण्यासाठी २८ एप्रिल २००९ मध्ये विद्युत विभागाच्या अंबड उपविभागीय कार्यालयात अर्ज केला होता. त्यासाठी चार हजार ८०० रुपयाचे कोटेशनही भरले होते. मात्र, नऊ वर्षे प्रतीक्षा करूनही त्यांना कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे पांढरे यांनी विहिरीवर डिझेलपंप बसवून शेतीसाठीच्या पाण्याची गरज भागवली. २००९ मध्ये भरलेल्या कोटेशनवर आता वीज जोडणी मिळणार नाही. त्यासाठी नव्याने कोटेशन भरावे लागेल, असे महावितरण कर्मचाºयांनी सांगितल्यामुळे ८ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यांनी पत्नी जिजाबाई पांढरे यांच्या नावाने सहा हजार ३०० रुपयांचे दुसरे कोटेशन भरले. दोन्ही कोटेशन भरल्याच्या पावत्या अधिकाºयांना वारंवार दाखवूनही त्यांना अद्यापही जोडणी मिळालेली नाही. केवळ ४८ हजारांचे वीज बिल देण्यात आल्यामुळे पांढरे यांना धक्का बसला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल