शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

निम्न दुधनाच्या पाणी पातळीत होतेय घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST

८८ टक्के जिवंत पाणीसाठा : दोन कालव्यांतून विसर्ग सुरू परतूर : तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील कालव्याद्वारे मागील काही दिवसांपासून ...

८८ टक्के जिवंत पाणीसाठा : दोन कालव्यांतून विसर्ग सुरू

परतूर : तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील कालव्याद्वारे मागील काही दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू असून, प्रकल्पातील पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. सध्या धरणात ८८.१३ टक्के जिवंत पाणीसाठा आहे.

परतूर तालुक्यासह परिसराला वरदान ठरणारा निम्न दुधना प्रकल्प गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने १०० टक्के भरला होता. आता उन्हाळा तोंडावर आला असल्याने पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचाही भार या प्रकल्पातील पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे सध्या प्रकल्पात मुबलक पाणी असले तरी येणारे दिवस कसे असतील हे सांगणे कठीण आहे. पाण्याचा विनाकारण व अवैध उपसा यावर काही प्रमाणात निर्बंध असणे आवश्यकच असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. सध्या धरणात २४२.२००६ दलघमी पाणीसाठा आहे. म्हणजे जिवंत पाणीसाठा ८८.१३ टक्के आहे. मागील दहा ते बारा दिवसांपासून धरणाच्या खालील रब्बी पिकांना कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. ही पाण्याची दुसरी पाळी आहे. यात डाव्या कालव्यातून १०१ क्युसेक तर उजव्या कालव्यातून ०१० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी २६ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या धरणावर परतूर, सेलू मंठा यासह इतर गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे भविष्यात धरणातील पाण्याचा वापर काटकसरीनेच करणे गरजेचे आहे.

चौकट

गतवर्षी निम्न दुधना प्रकल्प १०० टक्के भरल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी धरणाच्या बॅक वॉटरवरून पाइपलाइन करून उसासह इतर बागायती पिके घेतली आहेत. धरणातील पाणी पातळी घटली की, बॅक वॉटरमध्येही घट होते. दरम्यान, पाणी अटल्यास शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून केलेल्या पाइपलाइनचा काहीच उपयोग होत नाही. एकूणच वाढत असलेले बागायती क्षेत्र व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ नये, यासाठी धरणातील पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे.