शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

परतूर आगाराला वर्षात १९ लाखांचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:46 IST

परतूर येथील बस आगाराला यावर्षी मार्च अखेर १९ लाखांचा तोटा आला असून, मार्ग तपासणी पथकाचे दुर्लक्ष व अवैध प्रवासी वाहतुकीने या आगाराचे उत्पन्न बुडाल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : येथील बस आगाराला यावर्षी मार्च अखेर १९ लाखांचा तोटा आला असून, मार्ग तपासणी पथकाचे दुर्लक्ष व अवैध प्रवासी वाहतुकीने या आगाराचे उत्पन्न बुडाल्याचे दिसून येत आहे. भरारी पथकाने योग्य वेळी अवैध वाहतूक बंद केली असती तर तोट्यात जाणारे हे आगार निश्चितच फायद्यात राहिले असते, असा सूर प्रवाशांतून उमटत आहे.परतूरच्या आगारातील समस्यां कडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. बस, चालक, वाहक यांची कमतरता. इतर अडचणींना तोंड देत या आगाराचा कारभार सुरू आहे. यावर्षी या आगाराचे उत्पन्न ३४ कोटी ७० लाख एवढे झाले. मात्र खर्च यापेक्षा अधिक झाला आहे. प्रती कि़ मी. उत्पन्न २३. ७२ रू. तर ३५.७१ रू. खर्च आहे. त्यामुळे मार्च अखेर हे आगार १९ लाख ४ हजार रू. तोट्यात आहे. या आगाराच्या उत्पन्न वाढीकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. या आगारातून धावणाऱ्या बसेसची तपासणी मार्ग तपासणी पथकाकडून काटेकोरपणे होत नाही. ही तपासणी कधीतरी होत असल्याने फुकट्या प्रवाशांचे फावते. त्यामुळे ही तपासणी सातत्याने होत राहिल्यास मोठा फरक पडू शकतो. तसेच तालुक्यातील सर्वच मार्गावर अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. बसच्या वेळात व याच बसच्या थांब्यावर ही अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने बसचे प्रवासी आपल्या वाहनात क्षमतेच्या तिप्पट बसवून वाहने चालवतात. यातच परतूर शहरातील मु्ख्य रोडचे काम, भूमिगत गटार योजना तसचे शहराबाहेर सुरू असलेले दिंडी मार्गाचे काम यामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे. बसलाच थांबायला जागा नाही. थांबे व वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या आगराच्या उत्पन्न वाढीसाठी मार्ग तपासणी पथक, पोलीस, महामंडळाचे भरारी पथकाने संयुक्त कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळTravelप्रवास